शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
2
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
3
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
4
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
5
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
6
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
7
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
8
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
9
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
10
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
11
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
12
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
13
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
14
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
15
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
16
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
17
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
18
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
19
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं

उन्नावमध्ये शेतकऱ्यांवर लाठीमार, प्रियंका गांधींचा योगी सरकारवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2019 19:46 IST

शनिवारी संतप्त शेतकऱ्यांना पांगविण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला.

नवी दिल्ली : शेतकऱ्यांवर पोलिसांनी लाठीमार केल्यामुळे काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांनी उत्तर प्रदेशातील मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सरकारवर निशाणा साधला आहे. यावेळी प्रियंका गांधी यांनी ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर केला असून यामध्ये पोलीस शेतकऱ्यांना मारहाण करत असल्याचे दिसून येत आहे.

या व्हिडीओसोबत प्रियंका गांधी यांनी योगी सरकारवर हल्लाबोल केला आहे. त्या म्हणाल्या, "उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आता गोरखपूरमधील शेतकऱ्यांविषयी मोठ-मोठ्या गोष्टी करत आहे. मात्र, त्यांच्या पोलिसांचे कृत्य पाहा. उन्नावमध्ये एक शेतकरी पोलिसांच्या लाठीने अर्धमेला झाला आहे, तरी सुद्धा त्याला पोलीस मारहाण करीत आहेत. डोळे लाजेने खाली गेले पाहिजेत. जे आपल्यासाठी अन्न उपलब्ध करून देतात, त्यांच्यासोबतच अशी निर्दयता?"

याआधी प्रियंका गांधी यांनी शनिवारी ट्विट करून या घटनेचा उल्लेख केला होता. यावेळीही प्रियंका गांधी यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर निशाणा साधला होता. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे फक्त शेतकऱ्यांवर भाषण करतात, असे प्रियंका गांधी यांनी म्हटले आहे. भाजपा सरकारमध्ये शेतकऱ्यांचा अपमान होत आहे. उन्नावमध्ये जमिनीची नुकसान भरपाई मागणाऱ्या शेतकऱ्यांना पोलिसांनी बेदम मारहाण केली. शेतकऱ्यांची जमीन घेतली आहे, तर त्यांना नुकसान भरपाई द्यायलाच हवी, असेही प्रियंका गांधी यांनी म्हटले आहे.

शनिवारी संतप्त शेतकऱ्यांना पांगविण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला. यावेळी आंदोलक शेतकऱ्यांनी पोलिसांवर दगडफेक केली. आंदोलक शेतकऱ्यांची मागणी होती की, जमिनीचा दर हा सध्याच्या जमिनीच्या भावानुसार द्यावा. दरम्यान, जिल्हाधिकारी देवेंद्र पांडेय यांनी याप्रकरणी सांगितले होते की, शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात आली आहे. प्रशासनाकडे शेतकऱ्यांची कोणतीही थकबाकी शिल्लक नाही. 

टॅग्स :Priyanka Gandhiप्रियंका गांधीyogi adityanathयोगी आदित्यनाथFarmerशेतकरीUttar Pradeshउत्तर प्रदेश