शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

पंतप्रधान मोदींपासून अडचण काय? राहुल गांधी म्हणाले, "अशा व्यक्तीमुळे काही ना काही..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2024 14:44 IST

विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींविषयी बोलत असताना त्यांच्याबद्दलच्या अडचणी सांगितल्या आहेत.

Rahul Gandhi in Srinagar : गेल्या आठवड्यात विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे माजी खासदार राहुल गांधी हे जम्मू काश्मीर दौऱ्यावर होते. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तिथल्या लोकांची राहुल गांधी हे भेट घेत विविध मुद्द्यांवर चर्चा करत आहेत. अशातच श्रीनगरमध्ये काश्मिरी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना राहुल गांधी यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. यावेळी बोलताना पंतप्रधान मोदींविषयी नेमकं काय वाटतं याबाबत राहुल गांधी यांनी सांगितले आहे. राहुल गांधी यांनी केलेल्या या विधानाची चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरु झालीय.

गेल्या आठवड्यात काँग्रेसचे खासदार जम्मू-काश्मीरच्या दौऱ्यावर असताना राहुल गांधी यांनी या विद्यार्थिनींसमोर विविध प्रश्नांवर आपली मते मांडली. या मुलाखतीचा व्हिडीओ राहुल गांधी यांनी त्यांच्या युट्यूब चॅनेलवर पोस्ट केला आहे. या मुलाखतीमध्ये राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी नेमकी अडचण काय आहे याबाबत भाष्य केलं. तसेच राहुल गांधी यांनी त्यांच्या लग्नाविषयीसुद्धा प्रतिक्रिया दिली.

काश्मिरी विद्यार्थिनींनी राहुल गांधी यांना तुमचा लग्नाचा काय विचार आहे असं विचारलं. “मी लग्नाची योजना आखत नाही, पण तसे झाले तर ते (चांगले) आहे. २०-३० वर्षांपूर्वीच लग्नाच्या दबावातून मी बाहेर आलो आहे, असं राहुल गांधी यांनी म्हटलं. राहुल गांधी यांनी त्या मुलींना आपल्या लग्नात बोलावणार असल्याचेही सांगितले.

यावेळी राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींबाबत असलेल्या दोन अडचणींबाबतही सांगितले. "मला काश्मीरमधील माध्यम स्वातंत्र्याची मोठी अडचण दिसते आहे आणि देशभरात हेच चित्र आहे.पंतप्रधानांबाबत माझं मत आहे किंवा माझी त्यांच्याबाबत अडचण ही आहे की ते कुणाचंच ऐकत नाहीत. सुरुवातीपासूनच आपण बरोबर असल्याचे गृहीत धरणाऱ्या कोणत्याही व्यक्तीची मला समस्या आहे. त्यांना जरी सारंकाही दिसत असलं, कुणी त्यांना सांगत असलं की ते जे बोलत आहेत ते चुकीचं आहे तरी ते ही बाब मान्य करणार नाहीत. त्यामुळे या प्रकारची व्यक्ती नेहमीच काही ना काही समस्या निर्माण करते. हे असुरक्षिततेतून येते, ते सामर्थ्याने येत नाही. ते दुर्बलतेतून येते,” असं राहुल गांधी म्हणाले.  

यावेळी राहुल गांधी यांनी जम्मू आणि काश्मीरमधील आगामी विधानसभा निवडणुकांबद्दलही भाष्य केलं. "भारतीय इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या राज्याचा पूर्ण राज्याचा दर्जा काढून घेतला गेला आहे. आम्हाला हे काम आवडले नाही. पण, आता आमच्यासाठी राज्याचा दर्जा परत मिळवणे हे तत्त्व आहे आणि त्यात जम्मू-काश्मीर आणि लडाखच्या लोकांचे प्रतिनिधित्व समाविष्ट आहे. दिल्लीतून हे राज्य चालवण्यात अर्थ नाही," असेही राहुल गांधी म्हणाले.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीcongressकाँग्रेसJammu Kashmirजम्मू-काश्मीर