शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

"काँग्रेसनं ७० वर्षांत काहीच केलं नाही, तर मग तुम्ही काय विकताय?"

By कुणाल गवाणकर | Updated: September 21, 2020 15:02 IST

काँग्रेस नेत्या नगमा यांचा मोदी सरकारला अप्रत्यक्ष टोला

नवी दिल्ली: गेल्या काही महिन्यांपासून देशात खासगीकरणाचा सपाटा सुरू आहे. विमानतळं, रेल्वे गाड्यांचं खासगीकरण करण्याचे निर्णय मोदी सरकारनं घेतले आहेत. देशाची अर्थव्यवस्था संकटात सापडल्यानं सरकारी कंपन्यांचं खासगीकरण करण्याचा धडाका लावण्यात आला आहे. यावरून विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांना लक्ष्य केलं जात आहे. सरकारी कंपन्यांना खासगी हातांमध्ये सोपवण्याची आवश्यकता काय, असे प्रश्न सत्ताधाऱ्यांना विचारले जात आहेत.काँग्रेस नेत्या नगमा यांनी खासगीकरणावरून सरकारला जोरदार टोला लगावला आहे. 'काँग्रेसनं ७० वर्षांत काही केलेलंच नाही. मग तुम्ही जे विकताय ते काय तुमच्या आजीनं हुंड्यात आणलं होतं का?,' असा सवाल त्यांनी विचारला आहे. नगमा यांनी त्यांच्या ट्विटमध्ये कोणाच्याही नावाचा उल्लेख केलेला नाही. मात्र त्यांचा निशाणा मोदी सरकारवर असल्याचं स्पष्ट आहे.  गेल्या काही महिन्यांपासून अर्थव्यवस्था संकटात आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशात लॉकडाऊन जाहीर केला. त्यामुळे कित्येक दिवस देशाच्या अर्थव्यवस्था ठप्प झाली. सरकारला मिळणारा महसूल आटला. मात्र त्याचवेळी आरोग्य व्यवस्थेवरील खर्च मोठ्या प्रमाणात वाढला. आता देश अनलॉकमधून जात असला, तरी देशाची अर्थव्यवस्था रुळावर आलेली नाही. कोरोना संकट येण्यापूर्वीही देशाची अर्थव्यवस्था मंदीसदृश्य स्थितीतूनच जात होती.शेतकरी मुद्द्यावर विरोधक फसणार? सरकार महिनाभर आधीच रब्बीच्या एमएसपीची घोषणा करणारसरकार मिळणारा महसूल कमी झाल्यानं खासगीकरणाचा सपाटा सुरू आहे. जवळपास १५० गाड्यांचं खासगीकरण करण्याचा सरकारचा मानस आहे. त्यासाठी सरकारनं निविदा मागवल्या आहेत. यानंतर जीएमआर इन्फ्रा आणि अदानी एंटरप्रायजेस सारख्या कंपन्यांनी निविदा दाखल केल्या आहेत. रेल्वे गाड्यांचं खासगीकरण झाल्यानंतर तिकिटांचे दर ठरवण्याचा पूर्ण अधिकार त्यांना असेल. त्यामुळे सर्वसामान्यांच्या अडचणी वाढतील. देशात रेल्वे तिकिटांचे दर हा अतिशय संवेदनशील मुद्दा मानला जातो. त्यामुळे याचा फटका सरकारलाही बसू शकतो."लोकशाही देशाला गप्प बसवणं सुरूच, आधी आवाज दाबला आणि आता...", राहुल गांधी संतापले

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीcongressकाँग्रेसIndian Railwayभारतीय रेल्वे