शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
2
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
3
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
4
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
5
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
6
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
7
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
8
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
9
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
10
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
11
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
12
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
13
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
14
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
15
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
16
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
17
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
18
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
19
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
20
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?

"काँग्रेसनं ७० वर्षांत काहीच केलं नाही, तर मग तुम्ही काय विकताय?"

By कुणाल गवाणकर | Updated: September 21, 2020 15:02 IST

काँग्रेस नेत्या नगमा यांचा मोदी सरकारला अप्रत्यक्ष टोला

नवी दिल्ली: गेल्या काही महिन्यांपासून देशात खासगीकरणाचा सपाटा सुरू आहे. विमानतळं, रेल्वे गाड्यांचं खासगीकरण करण्याचे निर्णय मोदी सरकारनं घेतले आहेत. देशाची अर्थव्यवस्था संकटात सापडल्यानं सरकारी कंपन्यांचं खासगीकरण करण्याचा धडाका लावण्यात आला आहे. यावरून विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांना लक्ष्य केलं जात आहे. सरकारी कंपन्यांना खासगी हातांमध्ये सोपवण्याची आवश्यकता काय, असे प्रश्न सत्ताधाऱ्यांना विचारले जात आहेत.काँग्रेस नेत्या नगमा यांनी खासगीकरणावरून सरकारला जोरदार टोला लगावला आहे. 'काँग्रेसनं ७० वर्षांत काही केलेलंच नाही. मग तुम्ही जे विकताय ते काय तुमच्या आजीनं हुंड्यात आणलं होतं का?,' असा सवाल त्यांनी विचारला आहे. नगमा यांनी त्यांच्या ट्विटमध्ये कोणाच्याही नावाचा उल्लेख केलेला नाही. मात्र त्यांचा निशाणा मोदी सरकारवर असल्याचं स्पष्ट आहे.  गेल्या काही महिन्यांपासून अर्थव्यवस्था संकटात आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशात लॉकडाऊन जाहीर केला. त्यामुळे कित्येक दिवस देशाच्या अर्थव्यवस्था ठप्प झाली. सरकारला मिळणारा महसूल आटला. मात्र त्याचवेळी आरोग्य व्यवस्थेवरील खर्च मोठ्या प्रमाणात वाढला. आता देश अनलॉकमधून जात असला, तरी देशाची अर्थव्यवस्था रुळावर आलेली नाही. कोरोना संकट येण्यापूर्वीही देशाची अर्थव्यवस्था मंदीसदृश्य स्थितीतूनच जात होती.शेतकरी मुद्द्यावर विरोधक फसणार? सरकार महिनाभर आधीच रब्बीच्या एमएसपीची घोषणा करणारसरकार मिळणारा महसूल कमी झाल्यानं खासगीकरणाचा सपाटा सुरू आहे. जवळपास १५० गाड्यांचं खासगीकरण करण्याचा सरकारचा मानस आहे. त्यासाठी सरकारनं निविदा मागवल्या आहेत. यानंतर जीएमआर इन्फ्रा आणि अदानी एंटरप्रायजेस सारख्या कंपन्यांनी निविदा दाखल केल्या आहेत. रेल्वे गाड्यांचं खासगीकरण झाल्यानंतर तिकिटांचे दर ठरवण्याचा पूर्ण अधिकार त्यांना असेल. त्यामुळे सर्वसामान्यांच्या अडचणी वाढतील. देशात रेल्वे तिकिटांचे दर हा अतिशय संवेदनशील मुद्दा मानला जातो. त्यामुळे याचा फटका सरकारलाही बसू शकतो."लोकशाही देशाला गप्प बसवणं सुरूच, आधी आवाज दाबला आणि आता...", राहुल गांधी संतापले

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीcongressकाँग्रेसIndian Railwayभारतीय रेल्वे