शहरं
Join us  
Trending Stories
1
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
2
Maharashtra Nagar Palika Election Result: महाराष्ट्रातील २४६ नगरपरिषदांमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
3
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
4
Loha Nagar Parishad Election Result 2025: लोह्यात भाजपाला घराणेशाहीचा मोठा फटका; एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव
5
'आता तरी आपली लायकी ओळखावी' ; परळीतील विजयानंतर धनंजय मुंडेंची खा. सोनवणेंवर टीका
6
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: राज्यात शिवसेनेची जोरदार फाईट, भाजपाही मजबूत; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला किती जागा? जाणून घ्या
7
भोकरदनमध्ये दानवे पिता-पुत्रांना मोठा धक्का, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या समरीन मिर्जा विजयी; भाजपला किती जागा मिळाल्या? 
8
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 : 'एकदम ओक्के'! सर्वांनी एकट पाडलं, पण शहाजीबापूंनी मैदान मारलं; सांगोल्यात शिवसेनेचा मोठा विजय
9
Nitesh Rane: निवडणुका संपल्या, आता...; सिंधुदुर्गातील निकाल स्पष्ट होताच नितेश राणे म्हणाले...
10
Shahada Nagar Parishad Election Results 2025: २९ पैकी २० जागा भाजपाने जिंकल्या, पण नगराध्यक्षद जनता विकास आघाडीकडे
11
Bhagur Nagar Parishad Election Result 2025: २७ वर्षांची शिवसेनेची सत्ता गेली, भगूरमध्ये अजित पवार गटाचा मोठा विजय; ‘अशी’ झाली लढत!
12
Kankavali Nagar Parishad Election Result 2025: कणकवलीत भाजपा मंत्री नितेश राणेंना मोठा धक्का; शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी
13
Georai Nagar Parishad Election Result 2025: गेवराईत भाजपचे कमळ फुलले; नगराध्यक्षपदाच्या उमेदवार गीता पवार विजयी
14
शूटिंग करताना अक्षय खन्नाला 'या' गोष्टीचा होतो त्रास, 'धुरंधर' अभिनेता म्हणाला- "रात्रीच्या वेळी मला..."
15
Maharashtra Nagar Palika Election Result: अमरावतीत १२ पैकी ४ निकाल हाती, बच्चू कडूंच्या 'प्रहार', भाजपचं काय झालं?
16
क्रूरतेचा कळस! कोंबडा बनवलं, नाक घासायला लावलं...; कचरा वेचणाऱ्या मुलांना अमानुषपणे मारलं
17
धोक्याची घंटा! डिजिटल युगाचा 'सायलेंट किलर'; १८ हजार वृद्ध विसरले घरचा पत्ता, ५०० जणांचा मृत्यू
18
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींवर अष्टविनायक कृपा, सरकारी नोकरी योग; अडकलेले पैसे येतील, धनलाभ!
19
Dharangoan Nagar Parishad Election Result 2025 : शिंदेसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांना होमपीचवर मोठा धक्का; मविआ उमेदवाराचा मोठा विजय
Daily Top 2Weekly Top 5

'कोरोना वाढतोय, निवडणूक नको', काँग्रेस नेत्याची मागणी अन् कोर्ट म्हणालं...'तुम्ही मंगळावर राहता का?'

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2022 17:32 IST

उत्तर प्रदेश आणि पंजाबसह पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका स्थगित करण्याची मागणी पुन्हा एकदा करण्यात आली आहे. यावेळी काँग्रेस नेते जगदीश शर्मा यांनी दिल्ली हायकोर्टात निवडणूका स्थगित करण्याची मागणी केली.

नवी दिल्ली-

उत्तर प्रदेश आणि पंजाबसह पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका स्थगित करण्याची मागणी पुन्हा एकदा करण्यात आली आहे. यावेळी काँग्रेस नेते जगदीश शर्मा यांनी दिल्ली हायकोर्टात निवडणूका स्थगित करण्याची मागणी केली. यात कोरोना परिस्थिती लक्षात घेता निवडणुका रद्द करण्याची मागणी शर्मा यांनी केली. पण कोर्टानं शर्मा यांच्या याचिकेवर सुनावणीस नकार दिला आहे. तसंच तुम्ही काय मंगळ ग्रहावर राहता का? कारण इथं तर कोरोना रुग्णसंख्या घटताना दिसत आहे, असंही कोर्टानं फटकारलं आहे.

न्यायाधीश विपिन सांघी आणि जसमीत सिंह यांच्या खंडपीठानं जगदीश शर्मा यांच्या याचिकेवर नाराजी व्यक्त केली. "तुम्ही काय मंगळावर राहता का? दिल्लीत तर आता कोरोनाच्या रुग्णसंख्येत घट होताना दिसत आहे. एकतर तुम्ही याचिका स्वत:हून मागे घ्या नाहीतर आम्ही फेटाळून लावतो", असं रोखठोक मत न्यायाधीशांनी व्यक्त केलं. त्यानंतर जगदीश शर्मा यांनी आपली याचिका मागे घेतली आहे. 

काँग्रेस नेते जगदीश शर्मा यांनी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका काही आठवड्यांसाठी पुढे ढकलण्यात याव्यात अशी मागणी करणारी याचिका कोर्टात दाखल केली होती. तसंच ऑक्सिजनची उपलब्धता आणि पुरवठा याबाबतचा आराखडा सादर करण्याचे निर्देश कोर्टानं सरकारला द्यावेत अशीही मागणी त्यांनी याचिकेतून केली होती. 

उत्तर प्रदेश, गोवा, पंजाब, उत्तराखंड आणि मणिपूरमध्ये विधानसभा निवडणूक १० फेब्रुवारीपासून सुरू होणार असून ७ मार्चपर्यंत निवडणूक कार्यक्रम होणार आहे. तर १० मार्च रोजी निकाल जाहीर केला जाणार आहे. निवडणुकीच्या कार्यक्रमाची घोषणा करण्यासाठी निवडणूक आयोगानं देशातील प्रमुख राजकीय पक्षांसोबत देखील चर्चा केली होती. या बैठकीत सर्वच राजकीय पक्षांनी ठरलेल्या वेळेतच निवडणूक व्हावी अशी मागणी केली होती. कोणत्याही पक्षानं निवडणूक रद्द करण्याची भूमिका घेतलेली नाही. 

टॅग्स :ElectionनिवडणूकUttar Pradesh Assembly Election 2022उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक २०२२