शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

जब मुल्ला को मस्जिद मै राम नजर आया...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2019 12:26 IST

सभागृहात शपथविधी सोहळ्या दरम्यान ज्या घोषणाबाजी करण्यात आली तेदेखील योग्य नसल्याचं त्यांनी सांगितले. 

नवी दिल्ली - नवीन खासदारांच्या शपथविधी दरम्यान संसदेत जय श्रीराम आणि अल्लाह हू अकबरचे नारे दिले जात होते त्यावर काँग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी यांनी नाराजी व्यक्त केली. संसदेच्या सभागृहात अशाप्रकारे घोषणाबाजी योग्य नसल्याचं सांगत चौधरी यांनी सभागृहात कविता सादर केली. 

' जब मुल्ला को मस्जिद मै राम नजर आया, जब पुजारी को मंदिरे रहमान नजर आया, दुनिया की सुरत बदल जायेगी जब इंसान को इंसान मे इंसान नजर आये' अशी कवितेच्या माध्यमातून रंजन चौधरी यांनी सभागृहात भावना व्यक्त केल्या. 17 व्या लोकसभेच्या अध्यक्षपदी ओम बिर्ला यांची बिनविरोध निवड करण्यात आली यावेळी अभिनंदन प्रस्तावावेळी ते बोलत होते. 

यावेळी बोलताना रंजन चौधरी म्हणाले की, देशात सध्या शेतकऱ्यांची जी परिस्थिती आहे ती सुधारण्यासाठी सरकार प्रयत्न करेल अशी आम्हाला आशा आहे. लोकशाहीची प्रतिमा जपण्यासाठी काँग्रेसच्या खासदारांना सभागृहात चर्चा करण्यासाठी योग्य वेळ दिला जाईल असं मला वाटतं. मागील काही दिवसांपासून स्टॅडिंग कमिटीमध्ये कमी विधेयकं पाठवली जातात याकडे तुम्ही लक्ष द्याल. तसेच अध्यादेश आणून कायदे बनविण्याचा मार्ग अवलंबला जाऊ नये. तसेच सभागृहात शपथविधी सोहळ्या दरम्यान ज्या घोषणाबाजी करण्यात आली तेदेखील योग्य नसल्याचं त्यांनी सांगितले. 

लोकसभेचे हंगामी अध्यक्ष डॉ. विरेंद्रकुमार यांनी ओम बिर्ला यांच्याकडे लोकसभा अध्यक्षपदाचा पदभार दिला. ओम बिर्ला यांच्या निवडीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ओम बिर्ला यांचे अभिनंदन केले. तसेच, एका सर्वसामान्य कार्यकर्ता, विद्यार्थी संघटनांपासून चळवळीत जोडलेला कार्यकर्ता ते लोकसभा अध्यक्ष असा ओम बिर्ला यांचा प्रवास असल्याचे मोदींनी यावेळी म्हटले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकसभा अध्यक्षांच्या निवडीवेळीही नेहमीप्रमाणेच चर्चेत नसलेला चेहरा समोर आणला आहे. कोटा मतदारसंघातून दुसऱ्यांदा खासदार बनलेल्या ओम बिर्ला यांना लोकसभेच्या अध्यक्षपदाचा बहुमान देण्यात आला. दरम्यान, खासदार बनण्यापूर्वी बिर्ला हे तीनवेळी दक्षिण कोटा मतदारसंघातून आमदार बनले होते. तर, पर्यावरणप्रेमी नेता अशी बिर्ला यांची ओळख आहे.  

टॅग्स :congressकाँग्रेसlok sabhaलोकसभा