शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

काँग्रेस-झामुमो-राजदला सत्तेची लालसा, पंतप्रधान मोदी यांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2019 05:47 IST

झारखंडमधील काँग्रेस-झारखंड मुक्ती मोर्चा-राष्ट्रीय जनता दल यांची पूर्वीची सरकारे ही स्वार्थी होती, अशा शब्दांत सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हल्ला केला

डालटोंगगंज (झारखंड) : झारखंडमधील काँग्रेस-झारखंड मुक्ती मोर्चा-राष्ट्रीय जनता दल यांची पूर्वीची सरकारे ही स्वार्थी होती, अशा शब्दांत सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हल्ला करून आताही हे पक्ष सत्तेच्या लालसेने प्रेरित आहेत व जनतेकडे दुर्लक्ष करून राज्याचे शोषण करीत आहेत, असा आरोप केला. ते येथे निवडणूक प्रचारसभेत बोलत होते.मोदी यांनी केंद्रात असलेल्या यापूर्वीच्या काँग्रेस सरकारांवरही टीका केली. ते म्हणाले, काश्मीरचा गुंता आणि वादग्रस्त अयोध्या प्रश्न काँग्रेसमुळे वाढला. ही निवडणूक ही जे सेवा करू पाहत आहेत आणि जे लुटू पाहत आहेत त्यांच्यातील आहे. काँग्रेसकडे प्रश्न आहेत तर उत्तरे आमच्याकडे. त्यांच्याकडे आरोप तर आमच्याकडे केलेल्या कामाचे अहवाल, असे मोदी म्हणाले. नरेंद्र मोदी यांनी ठासून सांगितले की, भाजप सामाजिक न्याय, स्थैर्य, सुशासन, समृद्धी आणि सगळ्यांना सन्मान व सुरक्षा या पाच तत्त्वांना बांधीलआहे.भाजपेतर सरकारांच्या राजकीय अस्थैर्यामुळे राज्यात नक्षलवाद बळावला, असे मोदी म्हणाले. सरकार मागच्या दाराने स्थापन केले जाते. स्वार्थी लोकांच्या आघाड्या केल्या जातात आणि त्यांची प्रेरणा असते सत्ताभोग, राज्याच्या संसाधनांची लूट, असे ते म्हणाले.मोदी म्हणाले, विरोधकांची नजर असते जमिनीच्या पोटात असलेल्या संपत्तीवर; पण ते जमिनीवर राहणाऱ्यांची काही काळजी करीत नाहीत. या परिस्थितीत जनतेला वीजपुरवठा करणे, रस्ते बांधणे व पाणी देणे हे कसे शक्य आहे, उद्योग कसे उभारले जातील?जल, जंगल आणि जमीन...आदिवासींच्या वनहक्कांचा मुद्दा उपस्थित करून मोदी म्हणाले, तुमचा जल, जंगल आणि जमिनीवरील हक्क सुरक्षित राखण्यास भाजप बांधील आहे.भाजपला दुसऱ्यांदा सत्तेत संधी देण्याचे आवाहन करून मोदी म्हणाले, केंद्रात व राज्यात भाजपचे सरकार असल्यामुळे झारखंडची वेगाने प्रगती होणे शक्य आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा