शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण
2
पार्थ पवारांना डेटा सेंटर म्हणून एवढी मोठी सूट मिळाली, पण...; पुण्यातील जमीन घोटाळ्यात मोठी माहिती समोर
3
'जरांगे, थोतांड करू नका! आरोपी यांचेच, आरोपही हेच करणार'; हत्येची सुपारी दिल्याच्या आरोपावर धनंजय मुंडेंचा संताप
4
"मते चोरून सत्तेत आलेल्यांनीच जमीन चोरली, कारण त्यांना..."; राहुल गांधींचा पार्थ पवार भूखंड खरेदी प्रकरणावरून घणाघात
5
हात मिळवता मिळवता एकमेकांचे पाय खेचू लागले चीन-अमेरिका; China च्या एका निर्णयानं ट्रम्प यांचा तिळपापड
6
Dental Care: टार्टर आणि प्लाक दातांचे मुख्य शत्रू, करू शकतात गंभीर नुकसान; वेळीच घ्या 'ही' काळजी 
7
केक कापला, डीजे लावला आणि..., शेतकऱ्याने दणक्यात साजरा केला रेड्याचा वाढदिवस
8
१० लोकांना संपवलं, २७ जणांना मारण्याच्या तयारीत; नर्स रुग्णांच्या जीवावर का उठली? कारण ऐकाल तर..
9
माझी अन् त्यांची एकदा नार्को टेस्ट करा; जरांगे पाटलांच्या आरोपांवर धनंजय मुंडेंचे प्रत्युत्तर
10
चिकन नेकजवळ भारतीय लष्करानं केलं असं काम, शत्रूची प्रत्येक चाल होणार फेल
11
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर घसरले; खरेदी करण्यापूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे लेटेस्ट रेट
12
मी काका झालो! कौशल कुटुंबात आला छोटा पाहुणा; विकीचा भाऊ सनीने व्यक्त केला आनंद
13
IPS Aakash Shrishrimal : एक नंबर! वडील उद्योगपती, आई LIC एजंट, बहीण CA... अभिनेत्रीचा पती आहे IPS ऑफिसर
14
Crime: चाकूचा धाक दाखवून परप्रांतीय कामगाराला मारहाण; पाय चाटण्यास भाग पाडले!
15
सर्वात व्यस्त दिल्ली विमानतळावर ‘ट्रॅफिक जाम’! ३०० हून अधिक विमानांना विलंब; पार्किंगलाही जागा नाही!
16
घर खरेदी करण्याची योग्य वेळ कोणती? तुमच्या पगारावर EMI चा किती बोजा असावा, 'हे' गणित तपासा!
17
ज्ञानेश कुमार निवृत्तीनंतर शांतपणे आयुष्य जगता येणार नाही..; प्रियंका गांधींचा निवडणूक आयुक्तांना इशारा
18
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली अण्णा हजारेंची भेट; नेमके काय बोलणे झाले? चर्चांना उधाण
19
'इंग्रजांची साथ; 52 वर्षे तिरंगा फडकवला नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपा-RSS वर गंभीर आरोप
20
बँक कर्मचाऱ्यांनी स्थानिक भाषेतच बोलावं, अर्थमंत्री निर्मला सीतारामन का म्हणाल्या असं?

"आसामचे मुख्यमंत्री असो किंवा ज्योतिरादित्य सिंधिया, सगळे वॉशिंग मशिनचे लाभार्थी आहेत", जयराम रमेश यांचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2024 21:54 IST

Jairam Ramesh : खासदार राहुल गांधी यांनी गेल्या 50 दिवसांच्या भारत जोडो न्याय यात्रेत शेतकरी, तरुण, महिला आणि मजुरांना डोळ्यासमोर ठेवून पाच न्याय हमींची चर्चा केली आहे, असे जयराम रमेश म्हणाले.

नवी दिल्ली : काँग्रेस सोडून सत्ताधारी भाजपामध्ये सामील झालेल्या नेत्यांना काँग्रेसचे महासचिव जयराम रमेश यांनी रविवारी (3 मार्च)  वॉशिंग मशीन म्हटले. ते म्हणाले की, काँग्रेस सोडून गेलेले दलबदलू नेते वॉशिंग मशीनचे लाभार्थी आहेत. दरम्यान, विरोधकांच्या इंडिया आघाडीतील पक्ष अनेकदा भाजपाला 'वॉशिंग मशीन' उपमा देतात आणि असे म्हणतात की, ज्या नेत्यांवर भ्रष्टाचाराची प्रकरणे प्रलंबित आहेत, ते भाजपामध्ये गेल्यानंतर स्वच्छ होतात.

खासदार राहुल गांधी यांनी गेल्या 50 दिवसांच्या भारत जोडो न्याय यात्रेत शेतकरी, तरुण, महिला आणि मजुरांना डोळ्यासमोर ठेवून पाच न्याय हमींची चर्चा केली आहे, असे जयराम रमेश म्हणाले. तसेच, ज्यांना वॉशिंग मशीनची गरज आहे, ते लोक भाजपामध्ये सामील होत आहेत. तुम्ही पक्ष सोडलेल्या काँग्रेस नेत्यांची गणना करा, मग ते आसामचे मुख्यमंत्री असोत (मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा), सर्व या वॉशिंग मशीनचे लाभार्थी आहेत, असे म्हणत जयराम रमेश यांनी भाजपावर निशाणा साधला.

केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी काँग्रेस सोडल्याच्या प्रश्नावर जयराम रमेश म्हणाले, "प्रत्येकाला वेगवेगळ्या आकाराच्या वॉशिंग मशीनची गरज असते. काहींना लहान, काही मध्यम आकाराचे वॉशिंग मशीन आवश्यक आहे, तर काहींना टाकीच्या आकाराचे वॉशिंग मशीन आवश्यक आहे." याशिवाय, "दर दशकात होणारी जनगणना 2021 मध्ये सुरू होणार होती, परंतु जनगणना झाली नाही. 2011 च्या जनगणनेची जाती-संबंधित आकडेवारी केंद्रातील मोदी सरकारने अद्याप जाहीर केलेली नाही", असा दावा काँग्रेसचे महासचिव जयराम रमेश यांनी केला.

याचबरोबर, सत्ता, संपत्ती आणि जमिनीचा लोभ असलेले लोकच काँग्रेस सोडत असल्याचा दावा काँग्रेसचे राज्यसभा सदस्य दिग्विजय सिंह यांनी केला. केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्यावर निशाणा साधत दिग्विजय सिंह म्हणाले, फक्त तेच लोक पक्ष सोडत आहेत, ज्यांना सत्ता, पैसा आणि जमिनीची लालूच आहे. तसेच, वैचारिक राजकारणावर विश्वास नाही, पण सत्ता मिळविण्यासाठी राजकारण करणारेच पक्ष सोडत आहेत, असेही दिग्विजय सिंह यांनी सांगितले.

टॅग्स :congressकाँग्रेसJyotiraditya Scindiaज्योतिरादित्य शिंदे