शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

"आसामचे मुख्यमंत्री असो किंवा ज्योतिरादित्य सिंधिया, सगळे वॉशिंग मशिनचे लाभार्थी आहेत", जयराम रमेश यांचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2024 21:54 IST

Jairam Ramesh : खासदार राहुल गांधी यांनी गेल्या 50 दिवसांच्या भारत जोडो न्याय यात्रेत शेतकरी, तरुण, महिला आणि मजुरांना डोळ्यासमोर ठेवून पाच न्याय हमींची चर्चा केली आहे, असे जयराम रमेश म्हणाले.

नवी दिल्ली : काँग्रेस सोडून सत्ताधारी भाजपामध्ये सामील झालेल्या नेत्यांना काँग्रेसचे महासचिव जयराम रमेश यांनी रविवारी (3 मार्च)  वॉशिंग मशीन म्हटले. ते म्हणाले की, काँग्रेस सोडून गेलेले दलबदलू नेते वॉशिंग मशीनचे लाभार्थी आहेत. दरम्यान, विरोधकांच्या इंडिया आघाडीतील पक्ष अनेकदा भाजपाला 'वॉशिंग मशीन' उपमा देतात आणि असे म्हणतात की, ज्या नेत्यांवर भ्रष्टाचाराची प्रकरणे प्रलंबित आहेत, ते भाजपामध्ये गेल्यानंतर स्वच्छ होतात.

खासदार राहुल गांधी यांनी गेल्या 50 दिवसांच्या भारत जोडो न्याय यात्रेत शेतकरी, तरुण, महिला आणि मजुरांना डोळ्यासमोर ठेवून पाच न्याय हमींची चर्चा केली आहे, असे जयराम रमेश म्हणाले. तसेच, ज्यांना वॉशिंग मशीनची गरज आहे, ते लोक भाजपामध्ये सामील होत आहेत. तुम्ही पक्ष सोडलेल्या काँग्रेस नेत्यांची गणना करा, मग ते आसामचे मुख्यमंत्री असोत (मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा), सर्व या वॉशिंग मशीनचे लाभार्थी आहेत, असे म्हणत जयराम रमेश यांनी भाजपावर निशाणा साधला.

केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी काँग्रेस सोडल्याच्या प्रश्नावर जयराम रमेश म्हणाले, "प्रत्येकाला वेगवेगळ्या आकाराच्या वॉशिंग मशीनची गरज असते. काहींना लहान, काही मध्यम आकाराचे वॉशिंग मशीन आवश्यक आहे, तर काहींना टाकीच्या आकाराचे वॉशिंग मशीन आवश्यक आहे." याशिवाय, "दर दशकात होणारी जनगणना 2021 मध्ये सुरू होणार होती, परंतु जनगणना झाली नाही. 2011 च्या जनगणनेची जाती-संबंधित आकडेवारी केंद्रातील मोदी सरकारने अद्याप जाहीर केलेली नाही", असा दावा काँग्रेसचे महासचिव जयराम रमेश यांनी केला.

याचबरोबर, सत्ता, संपत्ती आणि जमिनीचा लोभ असलेले लोकच काँग्रेस सोडत असल्याचा दावा काँग्रेसचे राज्यसभा सदस्य दिग्विजय सिंह यांनी केला. केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्यावर निशाणा साधत दिग्विजय सिंह म्हणाले, फक्त तेच लोक पक्ष सोडत आहेत, ज्यांना सत्ता, पैसा आणि जमिनीची लालूच आहे. तसेच, वैचारिक राजकारणावर विश्वास नाही, पण सत्ता मिळविण्यासाठी राजकारण करणारेच पक्ष सोडत आहेत, असेही दिग्विजय सिंह यांनी सांगितले.

टॅग्स :congressकाँग्रेसJyotiraditya Scindiaज्योतिरादित्य शिंदे