शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
3
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
4
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
5
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
6
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
7
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
8
हा सदोष मनुष्यवधच!
9
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
10
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
11
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
12
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
13
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
14
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
15
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
16
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
17
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
18
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
19
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?

"आसामचे मुख्यमंत्री असो किंवा ज्योतिरादित्य सिंधिया, सगळे वॉशिंग मशिनचे लाभार्थी आहेत", जयराम रमेश यांचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2024 21:54 IST

Jairam Ramesh : खासदार राहुल गांधी यांनी गेल्या 50 दिवसांच्या भारत जोडो न्याय यात्रेत शेतकरी, तरुण, महिला आणि मजुरांना डोळ्यासमोर ठेवून पाच न्याय हमींची चर्चा केली आहे, असे जयराम रमेश म्हणाले.

नवी दिल्ली : काँग्रेस सोडून सत्ताधारी भाजपामध्ये सामील झालेल्या नेत्यांना काँग्रेसचे महासचिव जयराम रमेश यांनी रविवारी (3 मार्च)  वॉशिंग मशीन म्हटले. ते म्हणाले की, काँग्रेस सोडून गेलेले दलबदलू नेते वॉशिंग मशीनचे लाभार्थी आहेत. दरम्यान, विरोधकांच्या इंडिया आघाडीतील पक्ष अनेकदा भाजपाला 'वॉशिंग मशीन' उपमा देतात आणि असे म्हणतात की, ज्या नेत्यांवर भ्रष्टाचाराची प्रकरणे प्रलंबित आहेत, ते भाजपामध्ये गेल्यानंतर स्वच्छ होतात.

खासदार राहुल गांधी यांनी गेल्या 50 दिवसांच्या भारत जोडो न्याय यात्रेत शेतकरी, तरुण, महिला आणि मजुरांना डोळ्यासमोर ठेवून पाच न्याय हमींची चर्चा केली आहे, असे जयराम रमेश म्हणाले. तसेच, ज्यांना वॉशिंग मशीनची गरज आहे, ते लोक भाजपामध्ये सामील होत आहेत. तुम्ही पक्ष सोडलेल्या काँग्रेस नेत्यांची गणना करा, मग ते आसामचे मुख्यमंत्री असोत (मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा), सर्व या वॉशिंग मशीनचे लाभार्थी आहेत, असे म्हणत जयराम रमेश यांनी भाजपावर निशाणा साधला.

केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी काँग्रेस सोडल्याच्या प्रश्नावर जयराम रमेश म्हणाले, "प्रत्येकाला वेगवेगळ्या आकाराच्या वॉशिंग मशीनची गरज असते. काहींना लहान, काही मध्यम आकाराचे वॉशिंग मशीन आवश्यक आहे, तर काहींना टाकीच्या आकाराचे वॉशिंग मशीन आवश्यक आहे." याशिवाय, "दर दशकात होणारी जनगणना 2021 मध्ये सुरू होणार होती, परंतु जनगणना झाली नाही. 2011 च्या जनगणनेची जाती-संबंधित आकडेवारी केंद्रातील मोदी सरकारने अद्याप जाहीर केलेली नाही", असा दावा काँग्रेसचे महासचिव जयराम रमेश यांनी केला.

याचबरोबर, सत्ता, संपत्ती आणि जमिनीचा लोभ असलेले लोकच काँग्रेस सोडत असल्याचा दावा काँग्रेसचे राज्यसभा सदस्य दिग्विजय सिंह यांनी केला. केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्यावर निशाणा साधत दिग्विजय सिंह म्हणाले, फक्त तेच लोक पक्ष सोडत आहेत, ज्यांना सत्ता, पैसा आणि जमिनीची लालूच आहे. तसेच, वैचारिक राजकारणावर विश्वास नाही, पण सत्ता मिळविण्यासाठी राजकारण करणारेच पक्ष सोडत आहेत, असेही दिग्विजय सिंह यांनी सांगितले.

टॅग्स :congressकाँग्रेसJyotiraditya Scindiaज्योतिरादित्य शिंदे