शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

"तू-तू मैं-मैं होतच राहते, ममता बॅनर्जींना पहिल्यांदा काँग्रेसने खासदार केलं अन्..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2024 10:30 IST

काँग्रेसने अजूनही ममता बॅनर्जींकडून आशा सोडलेली नाही. पश्चिम बंगालमधील इंडिया आघाडीच्या भविष्याबाबत काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला माहिती दिली आहे.

पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसने 'एकला चलो रे'ची घोषणा केली आहे. TMC नेते डेरेक ओ ब्रायन यांनी शुक्रवारी सांगितलं की, ममता बॅनर्जी यांचा पक्ष राज्यातील सर्व 42 लोकसभा जागांवर एकटाच लढणार आहे. पण काँग्रेसने अजूनही ममता बॅनर्जींकडून आशा सोडलेली नाही. पश्चिम बंगालमधील इंडिया आघाडीच्या भविष्याबाबत काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला सांगितलं की, "टीएमसीसोबत चर्चा सुरू आहे. भाजपाला पराभूत करणं हे पहिलं उद्दिष्ट असल्याचंही ममता बॅनर्जी म्हणाल्या आहेत. तू-तू-मैं-मैं होतच राहते."

"काँग्रेस पक्षानेच ममता बॅनर्जी यांना पहिल्यांदा खासदार केलं. त्यांच्या पक्षाचं नाव देखील पाहा. त्यात तृणमूल आणि काँग्रेसही आहे. टीएमसीसाठी काँग्रेसचे दरवाजे नेहमीच खुले आहेत. आम्ही ममता बॅनर्जींचा आदर करतो. आमच्या अपेक्षेनुसार, पलटीराम (नितीश कुमार) आणि आरएलडी वगळता, इंडिया आघाडीमध्ये समाविष्ट असलेले सर्व 26 पक्ष एकत्र आहेत." 

जयराम रमेश यांनी "विशेष म्हणजे यूपीमध्ये अधिकृत घोषणा झाली आहे... ती अंतिम व्हायला वेळ लागला. आज आम आदमी पार्टी (आप) आणि काँग्रेसही अधिकृत घोषणा करत आहेत. काँग्रेस आळशी असून त्यांना आघाडीत रस नाही, असं वारंवार सांगितलं जात होतं. पण मी नेहमी म्हणालो की, वेळ लागतो. दिल्ली, हरियाणा, गुजरात, गोवा आणि चंदीगडमध्ये जागावाटपाबाबत आप आणि काँग्रेस आज पत्रकार परिषद घेणार आहेत" असं म्हटलं आहे. 

राहुल गांधींच्या 'भारत जोडो न्याय यात्रे'सोबत जयराम रमेश उत्तर प्रदेशमध्ये उपस्थित आहेत. या यात्रेतील अखिलेश यादव यांच्या सहभागाबाबत ते म्हणाले, आम्ही आशा करतो की अखिलेश यादव 25 फेब्रुवारीला आग्रा येथील न्याय यात्रेत सहभागी होतील. त्यांच्या स्वागतासाठी आम्ही सज्ज आहोत. याच दरम्यान, प्रियंका गांधी आज राहुल गांधी यांच्या न्याय यात्रेत सहभागी होण्यासाठी हापूरला पोहोचल्या. यापूर्वी त्या वाराणसीतील यात्रेत सहभागी होणार होत्या, मात्र प्रकृती बरी नसल्यामुळे त्या सहभागी होऊ शकल्या नाहीत. 

टॅग्स :congressकाँग्रेसMamata Banerjeeममता बॅनर्जी