शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

"तू-तू मैं-मैं होतच राहते, ममता बॅनर्जींना पहिल्यांदा काँग्रेसने खासदार केलं अन्..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2024 10:30 IST

काँग्रेसने अजूनही ममता बॅनर्जींकडून आशा सोडलेली नाही. पश्चिम बंगालमधील इंडिया आघाडीच्या भविष्याबाबत काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला माहिती दिली आहे.

पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसने 'एकला चलो रे'ची घोषणा केली आहे. TMC नेते डेरेक ओ ब्रायन यांनी शुक्रवारी सांगितलं की, ममता बॅनर्जी यांचा पक्ष राज्यातील सर्व 42 लोकसभा जागांवर एकटाच लढणार आहे. पण काँग्रेसने अजूनही ममता बॅनर्जींकडून आशा सोडलेली नाही. पश्चिम बंगालमधील इंडिया आघाडीच्या भविष्याबाबत काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला सांगितलं की, "टीएमसीसोबत चर्चा सुरू आहे. भाजपाला पराभूत करणं हे पहिलं उद्दिष्ट असल्याचंही ममता बॅनर्जी म्हणाल्या आहेत. तू-तू-मैं-मैं होतच राहते."

"काँग्रेस पक्षानेच ममता बॅनर्जी यांना पहिल्यांदा खासदार केलं. त्यांच्या पक्षाचं नाव देखील पाहा. त्यात तृणमूल आणि काँग्रेसही आहे. टीएमसीसाठी काँग्रेसचे दरवाजे नेहमीच खुले आहेत. आम्ही ममता बॅनर्जींचा आदर करतो. आमच्या अपेक्षेनुसार, पलटीराम (नितीश कुमार) आणि आरएलडी वगळता, इंडिया आघाडीमध्ये समाविष्ट असलेले सर्व 26 पक्ष एकत्र आहेत." 

जयराम रमेश यांनी "विशेष म्हणजे यूपीमध्ये अधिकृत घोषणा झाली आहे... ती अंतिम व्हायला वेळ लागला. आज आम आदमी पार्टी (आप) आणि काँग्रेसही अधिकृत घोषणा करत आहेत. काँग्रेस आळशी असून त्यांना आघाडीत रस नाही, असं वारंवार सांगितलं जात होतं. पण मी नेहमी म्हणालो की, वेळ लागतो. दिल्ली, हरियाणा, गुजरात, गोवा आणि चंदीगडमध्ये जागावाटपाबाबत आप आणि काँग्रेस आज पत्रकार परिषद घेणार आहेत" असं म्हटलं आहे. 

राहुल गांधींच्या 'भारत जोडो न्याय यात्रे'सोबत जयराम रमेश उत्तर प्रदेशमध्ये उपस्थित आहेत. या यात्रेतील अखिलेश यादव यांच्या सहभागाबाबत ते म्हणाले, आम्ही आशा करतो की अखिलेश यादव 25 फेब्रुवारीला आग्रा येथील न्याय यात्रेत सहभागी होतील. त्यांच्या स्वागतासाठी आम्ही सज्ज आहोत. याच दरम्यान, प्रियंका गांधी आज राहुल गांधी यांच्या न्याय यात्रेत सहभागी होण्यासाठी हापूरला पोहोचल्या. यापूर्वी त्या वाराणसीतील यात्रेत सहभागी होणार होत्या, मात्र प्रकृती बरी नसल्यामुळे त्या सहभागी होऊ शकल्या नाहीत. 

टॅग्स :congressकाँग्रेसMamata Banerjeeममता बॅनर्जी