शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे ब्रँडला शह देण्यासाठी रणनीती, मुंबईत एकत्र लढेल महायुती! 'प्लॅन बी'चीही तयारी...
2
'हिंजवडी' हातची गेली तर तोटा कोणाचा? पुण्याचा की महाराष्ट्राचा...; १५ वर्षांत किती बदलली...
3
आणखी एका चीनसाठी जागा नाही, भारतानं 'पुढचा ड्रॅगन' बनण्याचं स्वप्न सोडावं; रघुराम राजन यांचा इशारा
4
राज्यात तिसरी ते दहावीचा सुधारित अभ्यासक्रम जाहीर; हिंदी सक्तीला लागला ब्रेक? 'हे' विषय शिकवणार
5
गरोदरपणात सुचली कल्पना! फक्त ६० हजारांच्या गुंतवणुकीतून 'या' जोडप्याने कमावले ५ कोटी!
6
Uorfi Javed : बारीक दिसण्यासाठी जेवणं सोडलं, उपाशी राहिली अन्...; उर्फी जावेदने 'या' आजाराचा केला सामना
7
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा तामिळनाडू दौरा; महान चोल साम्राज्याचा उल्लेख करत म्हणाले...
8
Rohini Khadse-Khewalkar : "प्रत्येक गोष्टीला वेळ..."; रेव्ह पार्टीमध्ये पतीला अटक झाल्यावर रोहिणी खडसेंची पहिली प्रतिक्रिया
9
Nag Panchami 2025: नागपंचमीला तळणे, चिरणे, कापणे निषिद्ध; वाचा शास्त्रीय आणि धार्मिक कारण!
10
मुलांच्या शिक्षणाचं टेन्शन? पोस्ट ऑफिसची 'ही' योजना देणार हमखास परतावा आणि टॅक्समध्ये सूट!
11
"...तर मी त्यांना १०० रुपये देतो", सचिन पिळगावकर आजही आवर्जुन करतात 'ही' गोष्ट, म्हणाले- "ते पैसे लोक फ्रेम करून..."
12
१३ हजारांत १०८ MP कॅमेरा, ६५००mAh बॅटरी आणि सुपरफास्ट चार्जिंग; नोकियाच्या नव्या फोनची चर्चा!
13
सगळेच बीएसएनएलमध्ये पोर्ट करतील! ९०० रुपयांच्या आत आणले सहा महिन्यांचे रिचार्ज, Jio-Airtel तर...
14
श्रीमंत बनण्याचा फॅार्म्युला, फक्त बदला या ५ सवयी; महिन्याला वाचवा १० हजार, लोकंही विचारतील कशी झाली 'ही' जादू
15
Barabanki Awshaneshwar Temple Stampede : माकडांनी उड्या मारल्या, तार तुटली अन्...; अवसानेश्वर महादेव मंदिरात कशी झाली चेंगराचेंगरी?
16
"सेटवर ते मस्ती करायचे पण मी...", अशोक सराफ यांनी सांगितला 'करण अर्जुन'चा किस्सा
17
शिंदेसेनेच्या मंत्र्यांना बदनाम करण्याचा कट रचला जातोय का?; रामदास कदमांनी व्यक्त केली शंका
18
आमिर खानच्या घरी पोहचले २५ आयपीएस अधिकारी, चाहते पडले चिंतेत, म्हणाले - "रेड पडली आहे का?"
19
Share Market Today: शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात; Sensex २६० अंकांनी घसरला, 'हे' स्टॉक्स आपटले

ईशान्येकडील दुर्लक्ष काँग्रेसला भोवले; नागालँड, त्रिपुरामध्ये खातेही उघडता आले नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2018 03:46 IST

मेघालयात बहुमताच्या जवळ पोहोचलेल्या काँग्रेसची त्रिपुरा व नागालँडमध्ये अवस्था फारच वाईट झाली आहे. त्रिपुरात काँग्रेसला एकही जागा मिळवता आली नाही, तर नागालँडमध्येही हा पक्ष रिंगणातच नव्हता. तिथेही या पक्षाला कुठेच विजय मिळवता आला नाही.

नवी दिल्ली : मेघालयात बहुमताच्या जवळ पोहोचलेल्या काँग्रेसची त्रिपुरा व नागालँडमध्ये अवस्था फारच वाईट झाली आहे. त्रिपुरात काँग्रेसला एकही जागा मिळवता आली नाही, तर नागालँडमध्येही हा पक्ष रिंगणातच नव्हता. तिथेही या पक्षाला कुठेच विजय मिळवता आला नाही.नसलेली संघटना, उमेदवारांची वानवा, निवडणुकांसाठी पैसा नाही व केंद्रीय नेतृत्वाचे नसलेले लक्ष याचेच परिणाम काँग्रेसला भोगावे लागले. त्रिपुरामध्ये राहुल गांधी यांनी एकच सभा घेतली. नागालँडमध्ये काँग्रेसला आपले पाच उमेदवार मागे घ्यावे लागले. तिथे पक्षाचे १८ उमेदवारच होते. इथे काँग्रेसने २0१३ साली ४८ उमेदवार उभे करून, १0 जागी विजय मिळवला. काँग्रेसला यंदा जेमतेम दोन टक्केच मते मिळाली.काँग्रेसचे प्रभारी सी. पी. जोशी यांना तेथील राज्यांचे नेते दोष देत आहेत. जोशी तिथे येत नसत. त्यांनी राहुल गांधी यांनाही येऊ दिले नाही, असा आरोप नागालँड काँग्रेसचे अध्यक्ष केवे थापे थेरी यांनी केला. जोशी यांनी नागालँडमध्येच नव्हे, तर ईशान्येतून काँग्रेस संपवली, अशी टीका त्यांनी केली. नागालँडमध्ये २0१३ साली काँग्रेसने ५६ जागा लढवल्या होत्या. त्यापैकी ८ जागा जिंकल्या होत्या. तेव्हा २४.८९ टक्के मते मिळवणाºया काँग्रेसला यंदा भोपळाही फोडता आला नाही.आम्ही संपलेलोनाही : काँग्रेसत्रिपुरातील काँग्रेसच्या नेत्यांचेही नेमके हेच म्हणणे आहे. मात्र प्रदेशाध्यक्ष बिराजीत सिन्हा यांनी मात्र आमचे केंद्रात सत्तेत नसल्याने आमची आतापर्यंतची पारंपरिक मते भाजपाकडे गेली, असे विश्लेषण केले. आमचा राज्यात प्रथमच असा पराभव झाला नसून, १९७७ सालीही आम्ही पराभूत झालो होतो, पण आम्ही पुन्हा १९८८ साली सत्तेत आलो होतो. यावेळी मेघालयात काँग्रेस सरकार स्थापन करेल, असा दावा पक्षाच्या प्रभारी यशोमती ठाकूर यांनी केला आहे.

टॅग्स :Tripura Election Results 2018त्रिपुरा निवडणूक निकाल 2018BJPभाजपा