शहरं
Join us  
Trending Stories
1
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
2
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
3
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
4
“हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का?”; भाजपाचा सवाल
5
धक्कादायक! रात्री ३ वाजता मुलीच्या खोलीत दिसले भयंकर दृश्य; वडिलांनी पाहताच पायाखालची जमीन सरकली
6
रीलस्टारलाही नॅशनल अवॉर्ड पण टीव्ही स्टार्सला नाही! स्पष्टच बोलली अनुपमा, म्हणाली- "आता स्मृती इराणींनी कमबॅक केलंय तर..."
7
"इतक्या दूरची नोकरी..."; रिक्षा चालकाने महिलेला रस्त्याच्या मध्येच सोडलं अन् विचारला प्रश्न
8
तिसऱ्या बाईच्या प्रेमासाठी दुसऱ्या पत्नीला संपवलं; नवऱ्याचं प्लॅनिंग, तान्ह्या बाळासमोर घडलं क्रूर कृत्य
9
जबरदस्त! ११३७ कोटींच्या मोहिमेसाठी सारा तेंडुलकरची निवड, सचिनच्या लेकीला मिळाली मोठी जबाबदारी
10
Baba Ramdev: "हिंदू धर्मात जन्मलेले काही लोक..." जितेंद्र आव्हांडाच्या वक्तव्यावर बाबा रामदेव यांची प्रतिक्रिया
11
मुलाची इंजिनियरिंग कॉलेजमध्ये निवड, पण फी चे पैसे जमवणे शक्य झाले नाही, हतबल पित्याने संपवलं जीवन
12
अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटातून मिळाली प्रेरणा; फुटपाथवरुन सुरू झाला प्रवास, आता बनले व्यवसाय क्षेत्रातील 'शहंशाह'
13
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
14
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
15
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
16
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
17
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
18
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य
19
Video - बँड-बाजा अन् शेवटचा निरोप! गाव रडलं पण 'तो' मित्राच्या अंत्ययात्रेत आनंदाने नाचला, कारण...
20
Lunchbox Recipe: परवलाचं चमचमीत भरीतही होऊ शकतं, कधी ट्राय केलंय का? पहा सोप्पी रेसिपी

काँग्रेसचा ‘हात’च देशाला मार्ग दाखवेल; दिल्लीत पक्षाच्या अधिवेशनाला सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2018 06:08 IST

समाजाची जात, धर्म, पंथ, प्रांत अशी विभागणी केली जात आहे, भांडणे लावली जात आहेत, असा आरोप मोदी सरकारवर करतानाच काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी काँग्रेसचा ‘हात’च देशाला व लोकांना एकमेकांशी जोडण्याचे काम करेल, असा दावा पक्षाच्या अधिवेशनात केला.

- शीलेश शर्मानवी दिल्ली : समाजाची जात, धर्म, पंथ, प्रांत अशी विभागणी केली जात आहे, भांडणे लावली जात आहेत, असा आरोप मोदी सरकारवर करतानाच काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी काँग्रेसचा ‘हात’च देशाला व लोकांना एकमेकांशी जोडण्याचे काम करेल, असा दावा पक्षाच्या अधिवेशनात केला. यूपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी काँग्रेसमुक्त भारताची भाषा करतात. पण आम्ही सूड व अहंकारमुक्त भारत बनवू इच्छितो, अशा शब्दांत सरकारवर हल्ला चढवला.पक्षाध्यक्ष झाल्यानंतर पहिल्याच अधिवेशनात राहुल गांधी यांनी मोदी यांच्या वारेमाप आश्वासनांची खिल्ली उडवली. शेतकऱ्यांच्या पिकाला योग्य भाव कुठे मिळाला? युवकांच्या रोजगाराचे काय झाले? हे ज्वलंत प्रश्न असल्याचे सांगून ते म्हणाले की, केवळ काँग्रेसच प्रश्न सोडवण्याचा मार्ग दाखवू शकतो. ते द्वेषाचे राजकारण करतात, तर आम्ही प्रेमाचे. हा देश प्रत्येक जात, धर्माचा असून सर्वांना एकत्र घेऊन काँग्रेस पुढे चालत राहील. राहुल गांधी समारोपाचे भाषण सविस्तर करणार आहेत.सोनिया गांधी यांनी भाषणाची सुरुवातच मोदी यांच्यावरील हल्ल्याने केली. ते काँग्रेसला नष्ट करू इच्छितात. पण लोकांच्या मनात काँग्रेसबद्दल काय भावना आहे, याचा पुरावा गुजरात तसेच राजस्थान व मध्य प्रदेशसह अन्य पोटनिवडणुकांच्या निकालांनी दिला आहे, असे गांधी म्हणाल्या.सोनिया गांधी पक्षाध्यक्ष नसल्या तरी त्यांचे भाषण सुरू होताच ‘सोनिया गांधी झिंदाबाद’च्या जोरदार घोषणा सुरू झाल्या. राहुल गांधी यांच्यासाठीही इतक्या घोषणा दिल्या गेल्या नाहीत.नेते व्यासपीठावर नाहीतया महाअधिवेशनात बराचबदल दिसत होता. आतापर्यंत कार्यकारिणीचे सदस्य, पक्षाच्या अध्यक्षांसह अन्य नेते व्यासपीठावर असत. परंतु, ही परंपरा बाजूला सारून व्यासपीठावर फक्त संबंधित वक्ता असेल, अशी व्यवस्था केली होती.तरुणांना पुढे आणणारपक्षामध्ये आता तरुणांना पुढे आणले जाईल. मात्र वरिष्ठ नेत्यांशिवाय पक्ष चालवणे शक्य नसून, वरिष्ठ व तरुण नेते यांना जोडण्याचे काम करण्याची माझी जबाबदारी आहे, असे राहुल म्हणाले. राजकीय व कृषी प्रस्तावावर बोलणारे ८० टक्के वक्ते तरुण होते. यापुढे काँग्रेसची सूत्रे तरुणांच्या हाती असतील, असा संदेश देण्यात आला.

टॅग्स :congressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधी