शहरं
Join us  
Trending Stories
1
जैसलमेर दुर्घटनेतील मृतांचा आकडा २० वर; मोदींकडून दुःख व्यक्त, आर्थिक मदतीची घोषणा
2
जनरल झेडच्या आंदोलनामुळे आणखी एका देशात सत्तापालट!
3
'...तर पाकिस्तान उद्ध्वस्त झाला असता', ऑपरेशन सिंदूरबाबत लेफ्टिनेंट जनरल राजीव घईंचा मोठा खुलासा
4
'२५ हजार दिल्याशिवाय पेन्शन नाही!' रेल्वेच्या लाचखोर मुख्य अधीक्षकाला रंगेहाथ पकडलं
5
रुग्णालयात नेताना आजारी मुलाचा वाटेतच मृत्यू; धक्क्याने वडिलांनीही सोडले प्राण!
6
अमरावती-गडचिरोली मार्गावर २२० क्विंटल 'पोर्टिफाईड तांदूळ' घेऊन जाणारा ट्रक पकडला
7
आरमोरी मार्गावर भरधाव ट्रकची दुचाकीला धडक; दोन भाऊ जागीच ठार!
8
सोनं भारतात सव्वा लाखांच्या पार, पाकिस्तानात किंमत काय? भाव ऐकून तुम्हालाही बसेल 'शॉक'
9
निवडणूक न लढवताही कार्यकर्ते झेडपी, पंचायत समितीचे सदस्य बनणार? बावनकुळेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र 
10
भारत-पाक सामना बरोबरीत सुटला! मग दोन्ही संघातील खेळाडूंमध्ये जे घडलं ते चर्चेत
11
"मी तुमची अनेक प्रकरणे पाहिली आहेत; बोललो तर उगाच...", CJI गवईंनी ईडीला फटकारले
12
गायिका मैथिली ठाकूरचा भाजपमध्ये प्रवेश! दुसऱ्या यादीत येणार नाव, कोणत्या मतदारसंघातून लढणार?
13
‘पात्र गावांना सामूहिक वनहक्क देण्याबाबत तातडीने कार्यवाही करावी’, अजित पवार यांचे आदेश
14
IPS पूरन कुमाार यांच्या पत्नीला अटक करा, ASI संदीप यांच्या कुटुंबीयांनी केली मागणी, कारण काय?
15
तो बापाच्या वशिल्यावर टीम इंडियात आलेला नाही, असं का म्हणाले गंभीर? जाणून घ्या त्यामागचं कनेक्शन
16
मनसेचा मविआमध्ये समावेश होणार की नाही? प्रस्तावाबाबत हर्षवर्धन सपकाळ यांनी स्पष्टच सांगितलं  
17
जैसलमेरमध्ये धावत्या बसला भीषण अचानक आग; १०-१२ जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची भिती
18
घायवळला मोक्का लावला, रोहित पवारांनी तो उठवला; सभापती राम शिंदे यांचा गौप्यस्फोट
19
BJP Candidate list: भाजपने १० विद्यमान आमदारांची तिकिटं कापली, ५ जण आहेत माजी मंत्री; पहिल्या यादीमध्ये कोण?
20
३१ व्या मजल्यावरून पडला, चप्पल, मोबाईल सापडले २४ व्या मजल्यावर, तरुणाच्या मृत्यूचं गुढ वाढलं   

काँग्रेस : संसदीय बोर्डाच्या स्थापनेची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2020 05:38 IST

कार्यशैलीवर टीका करणाऱ्यांवर कारवाई नाही; पक्ष प्रवक्त्यांचे संकेत

 शीलेश शर्मा नवी दिल्ली : काँग्रेस पक्ष नेतृत्वाच्या कार्यशैलीवर जाहीररीत्या हल्ले व टीका करणाऱ्या नेत्यांवर कारवाई करण्याचा मूड नेतृत्वाचा नाही, असे संकेत सोमवारी पक्ष प्रवक्ते पवन खेडा यांनी दिले.  उल्लेखनीय हे आहे की, गेल्या एक आठवड्यापासून पक्षाचे वरिष्ठ नेते कपिल सिब्बल, पी. चिदम्बरम आणि गुलामनबी आझाद यांनी कठोर टीका करून पंचतारांकित संस्कृतीचा उल्लेख करून तळापासून वरपर्यंत निवडणूक घेण्याचा मुद्दा उपस्थित केला होता.

आझाद यांना विचारले गेले की, ते १९९८ पासून २०१७ पर्यंत नियुक्त झालेले होते.  तरीही आज निवडणुकीची मागणी का करीत आहात? तेव्हा तुम्ही निवडणूक घेऊन पदे भरण्याचा आग्रह का धरला नाही? आझाद यांच्याकडे याचे थेट उत्तर नव्हते; परंतु त्यांनी नरसिंह राव यांच्या कार्यकाळाचा उल्लेख करून युक्तिवाद केला की, १९९२ मध्ये मीच संघटनेत निवडणूक घेण्याची मागणी केली होती आणि त्यामुळे तिरुपती अधिवेशनात निवडणूक घेतली गेली. ‘लोकमत’ने जेव्हा वरिष्ठ नेत्यांकडे या वादाचे कारण जाणून घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा ग्रुप २३ च्या एका वरिष्ठ नेत्याने म्हटले की, वादाचे मूळ राहुल गांधी, सोनिया गांधी यांचे नेतृत्व नाही.  पक्षाच्या कोणत्याही नेत्याला त्यांच्याबद्दल तक्रार नाही, तर सल्लागारांबद्दल आहे. या सल्लागारांना राजकारण समजत नाही. 

ज्येष्ठ नेत्यांना नेतृत्वाच्या निर्णयांमध्ये हवा सहभागया नेत्यांचा इशारा के. राजू, रणदीप सुरजेवाला, के.सी. वेणुगोपालसारखे नेते पक्ष चालवत आहेत, याकडे होता. त्यांना पंचतारांकित हॉटेलसह विलासाची संसाधने हवीत. आनंद शर्मा सोनिया गांधी यांना लिहिलेल्या पत्रावर सही केल्यानंतर मौन आहेत; परंतु अनौपचारिक चर्चेत ते मोकळे बोलतात. 

वरिष्ठ नेत्यांना नेतृत्वाच्या निर्णयांमध्ये आपला सहभाग असे वाटते. याच कारणामुळे टीका करणारे नेते सामूहिक नेतृत्वाचा विषय काढतात. त्यांची ही मागणी आहे की, संसदीय बोर्डाची स्थापना आणि कार्य समिती सदस्यांची निवडणूक झाल्यास वाद संपेल.

टॅग्स :congressकाँग्रेसSonia Gandhiसोनिया गांधीNew Delhiनवी दिल्ली