शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
4
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
5
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
6
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
7
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
8
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
9
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
10
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
11
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
12
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
13
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
14
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
15
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
16
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
17
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
18
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
19
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
20
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
Daily Top 2Weekly Top 5

Ghulam Nabi Azad : काँग्रेसमुळेच इतरांचा पराभव, स्थानिक पक्ष का आघाडी करतील? गुलाम नबी आझादांचं मर्मावर बोट

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2023 09:04 IST

काँग्रेसचे माजी दिग्गज नेते गुलाम नबी आझाद यांनी अनेक विषयांवर भाष्य करत काँग्रेसचा खरपूस समाचार घेतलाय.

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. भारतीय जनता पक्षाला सलग तिसऱ्यांदा सत्तेत येण्यापासून रोखण्यासाठी विरोधी पक्ष एकत्र येतील अशीही चर्चा आहे. या सगळ्यात काँग्रेसचे माजी दिग्गज नेते गुलाम नबी आझाद यांनी अशा कोणत्याही शक्यता नाकारल्या आहेत. याऊलट त्यांनी काँग्रेसवरच टीकास्त्र सोडलं. याशिवाय राहुल गांधींच्या कोर्टात हजेरी लावण्यासाठी सूरतला जाणाऱ्या मुख्यमंत्र्यांसह काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांवरही जोरदार टीका केली.

'आझाद' या आत्मचरित्राच्या प्रकाशनाच्या आधी 'द इंडियन एक्स्प्रेस' या इंग्रजी वृत्तपत्राशी आझाद यांनी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी अनेक बाबींवर भाष्य केलं. “काँग्रेस पक्षात काहीही बदललं नाही. ज्या ठिकाणी मजबूत स्थानिक नेते आहेत, त्याच राज्यांमध्ये त्यांना विजयाची अपेक्षा आहे. त्यांच्यामुळे पक्षाचा कोणत्या राज्यात विजय होतोय किंवा पराभव होतोय याचा दावा ते करू शकत नाहीत,” असंही ते म्हणाले. त्यांनी अप्रत्यक्षपणे गांधी कुटुंबावरही निशाणा साधला.

"काँग्रेसवर संताप"“केंद्रीय नेतृत्वाचा कोणत्याही जागेवर कोणताही प्रभाव नाही. ते ना कोणाला जिंकवू शकत ना कोणाचा पराभव करू शकत. काँग्रेस नेत्यांचा जय-पराजय त्या ठिकाणच्या विद्यमान नेतृत्वावर अवलंबून आहे,” असं म्हणत आझाद यांनी संताप व्यक्त केला.

यावेळी त्यांना विरोधकांच्या एकतेवर प्रश्न विचारण्यात आला. “मला वाटत नाही कोणालाही राष्ट्रीय स्तरावरील महत्त्वाकांक्षा आहे. कोणाला तशी असेलही. परंतु आता प्रत्येक जण तितकंच खा जितकं पचू शकेल असा विचार करतो. भारतासारख्या मोठ्या देशात एक राष्ट्रीय पक्ष बनवणं आणि सोबत येऊन देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवणं अतिशय कठीण आहे. विरोधक एकत्र येणार नाहीत. एक राजकीय कार्यकर्ता म्हणून माझं हेच म्हणणं आहे,” असंही त्यांनी स्पष्ट केलं.

"छोटे पक्ष राज्यातच आनंदी"विरोधकांची एकजूट व्हावी अशी माझी इच्छा आहे, पण गेल्या ४०-५० वर्षांत मी जवळपास प्रत्येक राजकीय पक्ष आणि विरोधी पक्षातील नेत्यांना ओळखतो. मी बहुतेक वेळा त्यांच्याशी आघाडीवर चर्चा केली आहे. मी म्हणू शकतो की प्रत्येक राजकीय पक्ष आपापल्या राज्यात आनंदी आहे. प्रत्येक प्रादेशिक पक्षाला आपल्या अधिकारक्षेत्राबाहेर गेल्यास आपला पराभव होईल. राज्यात त्यांचं लक्ष कमी झाल्यास दुसरा कब्जा करेल, असं त्यांना वाटत असल्याचं आझाद म्हणाले.“काँग्रेसमुळेच पराभव”“पश्चिम बंगालमध्ये जर आघाडी झाली तर त्या ठिकाणी काँग्रेसकडे काय आहे? एकही जागा नाही. काँग्रेस टीएमसीला कसा फायदा करून देईल? ममता बॅनर्जी ४२ पैकी ५-१० जागा काँग्रेसला का देईल. आघाडी त्याच ठिकाणी होते जिकडे मत घेण्याची क्षमता असते. हे सध्या अशक्य आहे. काही ठिकाणी तर काँग्रेसमुळे त्या ठिकाणच्या स्थानिक पक्षांचा पराभव झालाय अशी परिस्थिती आहे,” असं त्यांनी नमूद केलं.

टॅग्स :congressकाँग्रेसGhulam Nabi Azadगुलाम नबी आझाद