शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

काँग्रेसची मोदींवर टीका

By admin | Updated: July 4, 2016 05:56 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ‘रालोआ’ सरकार दोन वर्षांच्या कारकिर्दीत भरीव काम केल्याचा डंका पिटत असले तरी प्रत्यक्षात मोदी या सरकारच्या घोर अपयशाचे ‘पोस्टर बॉय’ ठरले आहेत

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ‘रालोआ’ सरकार दोन वर्षांच्या कारकिर्दीत भरीव काम केल्याचा डंका पिटत असले तरी प्रत्यक्षात मोदी या सरकारच्या घोर अपयशाचे ‘पोस्टर बॉय’ ठरले आहेत, अशी विखारी टिका काँग्रेस पक्षाने केली आहे.मोदी सरकारला दोन वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त काँग्रेस पक्षाच्या अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आलेल्या एका विश्लेषणात्मक टिपणीत पक्षाने म्हटले आहे की, पंतप्रधान मोदी हे वचनभंगाचे ‘पोस्टर बॉय’ ठरले आहेत. त्यांचे संपूर्ण सरकार आणि त्याची धोरणे फसवणूक आणि खोटेपणाच्या पायावर आधारलेली आहेत. लोकसभा निवडणुकीत मोदींनी जनतेला भरमसाठ आश्वासने दिली व सत्याच्या आविर्भावात देशभर असत्याचा प्रचार केला. परंतु सत्तेवर आल्यानंतर गेल्या दोन वर्षांत मोदी यांचे सर्व खोटे दावे पार उघडे पडले आहेत.पक्षाच्या मते मोदी सरकार विविध क्षेत्रात दिलेली आश्वासने पूर्ण करण्यात कसे अपयशी ठरले आहे याचा सविस्तर उहापोह करून या विश्लेषणात काँग्रेस पक्ष शेवटी म्हणतो: मोदीजी जेव्हा पंतप्रधान पदावरून पायउतार होतील तेव्हा भारत छिन्नविच्छिन्न व गलितगात्र झालेला असेल. पंतप्रधान व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने देशावर लादलेल्या खोटेपणाच्या शासनाविरुद्ध लढा देऊन देशाचे रक्षण करणे हे प्रत्येक भारतीयाचे कर्तव्य आहे.मोदीजी आणि त्यांचे ससरकार हा भारतातील मध्यमवर्ग व गरिबांना अभिशाप ठेरले आहे, असा आरोप करून काँग्रेस पक्ष म्हणतो की, डाळींच्या किंमती आभाळाला भिडल्या आहेत व पाच लाखांपर्यंतचे उत्पन्न प्राप्तिकरमुक्त करणे व शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या बाबतीत मात्र मोदी गप्प आहेत. निवडणुकीत दिलेली आश्वासने पूर्ण करण्याऐवजी मोदी जगभर फिरण्यात मग्न आहेत.मोदी सरकारच्या परराष्ट्र धोरणाच्या कथित अपयशाचा पाढा वाचताना काँग्रेस म्हणते की, मोदींच्या जगभर फिरण्याचे भारताची प्रतिष्ठा व स्थान वाढले असे त्यांचे पाठीराखे म्हणतात. पण गुरदासपूर, पठाणकोट व पाम्पोरचे अतिरेकी हल्ले, सीमेवरील शस्त्रसंधीची एक हजार उल्लंघने, एनएसजीचे सभासदत्व मिळविण्यात झालेली भारताची फजिती आणि रशिया, अमेरिका व चीनची पाकिस्तानशी वाढती जवळीक ही या परराष्ट्र धोरणाची फलश्रुती आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)>काँग्रेसने केलेला लेखाजोखांकाँग्रेस पक्ष म्हणतो, मोदीजींनी दोन कोटी नोकऱ्या देण्याचे आश्वासन दिले. आपल्या राजवटीत अर्थव्यवस्था भरभराटीला आली असा दावा त्यांनी केला़ मात्र सरकार फक्त १.३५ लाख नव्या नोकऱ्या देऊ शकले. याउलट संपुआ सरकारने सन २०११ या एकाच वर्षात ९ लाख नोकऱ्या दिल्या होत्या.>आश्वासन वास्तववर्षाला दोन कोटी नोकऱ्या गतवर्षी दोन कोटी बेरोजगारप्रत्येक बँक खात्यात १५ लाख एक दमडीही नाहीमहागाईला हद्दपार करू तूरडाळ २०० रु. किलोपाकला अद्दल घडवू शरीफ यांना वाढदिवसाच्या शुभेच्छाइंधन स्वस्त करू तेल ५८ टक्के, पेट्रोल ८ टक्के स्वस्त