शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
4
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
5
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
6
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
7
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
8
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
9
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
10
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
11
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
12
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
13
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
14
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
15
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
16
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
17
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
18
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
19
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
20
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसची मोदींवर टीका

By admin | Updated: July 4, 2016 05:56 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ‘रालोआ’ सरकार दोन वर्षांच्या कारकिर्दीत भरीव काम केल्याचा डंका पिटत असले तरी प्रत्यक्षात मोदी या सरकारच्या घोर अपयशाचे ‘पोस्टर बॉय’ ठरले आहेत

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ‘रालोआ’ सरकार दोन वर्षांच्या कारकिर्दीत भरीव काम केल्याचा डंका पिटत असले तरी प्रत्यक्षात मोदी या सरकारच्या घोर अपयशाचे ‘पोस्टर बॉय’ ठरले आहेत, अशी विखारी टिका काँग्रेस पक्षाने केली आहे.मोदी सरकारला दोन वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त काँग्रेस पक्षाच्या अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आलेल्या एका विश्लेषणात्मक टिपणीत पक्षाने म्हटले आहे की, पंतप्रधान मोदी हे वचनभंगाचे ‘पोस्टर बॉय’ ठरले आहेत. त्यांचे संपूर्ण सरकार आणि त्याची धोरणे फसवणूक आणि खोटेपणाच्या पायावर आधारलेली आहेत. लोकसभा निवडणुकीत मोदींनी जनतेला भरमसाठ आश्वासने दिली व सत्याच्या आविर्भावात देशभर असत्याचा प्रचार केला. परंतु सत्तेवर आल्यानंतर गेल्या दोन वर्षांत मोदी यांचे सर्व खोटे दावे पार उघडे पडले आहेत.पक्षाच्या मते मोदी सरकार विविध क्षेत्रात दिलेली आश्वासने पूर्ण करण्यात कसे अपयशी ठरले आहे याचा सविस्तर उहापोह करून या विश्लेषणात काँग्रेस पक्ष शेवटी म्हणतो: मोदीजी जेव्हा पंतप्रधान पदावरून पायउतार होतील तेव्हा भारत छिन्नविच्छिन्न व गलितगात्र झालेला असेल. पंतप्रधान व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने देशावर लादलेल्या खोटेपणाच्या शासनाविरुद्ध लढा देऊन देशाचे रक्षण करणे हे प्रत्येक भारतीयाचे कर्तव्य आहे.मोदीजी आणि त्यांचे ससरकार हा भारतातील मध्यमवर्ग व गरिबांना अभिशाप ठेरले आहे, असा आरोप करून काँग्रेस पक्ष म्हणतो की, डाळींच्या किंमती आभाळाला भिडल्या आहेत व पाच लाखांपर्यंतचे उत्पन्न प्राप्तिकरमुक्त करणे व शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या बाबतीत मात्र मोदी गप्प आहेत. निवडणुकीत दिलेली आश्वासने पूर्ण करण्याऐवजी मोदी जगभर फिरण्यात मग्न आहेत.मोदी सरकारच्या परराष्ट्र धोरणाच्या कथित अपयशाचा पाढा वाचताना काँग्रेस म्हणते की, मोदींच्या जगभर फिरण्याचे भारताची प्रतिष्ठा व स्थान वाढले असे त्यांचे पाठीराखे म्हणतात. पण गुरदासपूर, पठाणकोट व पाम्पोरचे अतिरेकी हल्ले, सीमेवरील शस्त्रसंधीची एक हजार उल्लंघने, एनएसजीचे सभासदत्व मिळविण्यात झालेली भारताची फजिती आणि रशिया, अमेरिका व चीनची पाकिस्तानशी वाढती जवळीक ही या परराष्ट्र धोरणाची फलश्रुती आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)>काँग्रेसने केलेला लेखाजोखांकाँग्रेस पक्ष म्हणतो, मोदीजींनी दोन कोटी नोकऱ्या देण्याचे आश्वासन दिले. आपल्या राजवटीत अर्थव्यवस्था भरभराटीला आली असा दावा त्यांनी केला़ मात्र सरकार फक्त १.३५ लाख नव्या नोकऱ्या देऊ शकले. याउलट संपुआ सरकारने सन २०११ या एकाच वर्षात ९ लाख नोकऱ्या दिल्या होत्या.>आश्वासन वास्तववर्षाला दोन कोटी नोकऱ्या गतवर्षी दोन कोटी बेरोजगारप्रत्येक बँक खात्यात १५ लाख एक दमडीही नाहीमहागाईला हद्दपार करू तूरडाळ २०० रु. किलोपाकला अद्दल घडवू शरीफ यांना वाढदिवसाच्या शुभेच्छाइंधन स्वस्त करू तेल ५८ टक्के, पेट्रोल ८ टक्के स्वस्त