शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८०० कोटींच्या जमिनीची ३०० कोटींमध्ये खरेदी, ४८ तासांत स्टँप ड्युटीही माफ"; दानवेंचा पार्थ पवारांवर गंभीर आरोप
2
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
3
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
4
कसे शिकायचे? १६५० खेड्यांत प्राथमिक शाळाच नाही! शिक्षण हक्क कायद्याच्या अंमलबजावणीत त्रुटी
5
“राहुल गांधीनी उघड केलेला मतचोरीचा हरियाणा पॅटर्न महाराष्ट्रातही, निवडणूक आयोग...”: सपकाळ
6
११ मेडिकल कॉलेजांत ‘कार्डियाक कॅथलॅब’; हृदयविकारावरील उपचार होणार सुलभ
7
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
8
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
9
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
10
“NCPचा तळागाळातील कार्यकर्ता निवडणुकीला सज्ज, आता पुढील ३ दिवसांत...”: सुनील तटकरे
11
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
12
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
13
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
14
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
15
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
16
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 
17
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
18
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
19
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
20
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन

काँग्रेसची मोदींवर टीका

By admin | Updated: July 4, 2016 05:56 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ‘रालोआ’ सरकार दोन वर्षांच्या कारकिर्दीत भरीव काम केल्याचा डंका पिटत असले तरी प्रत्यक्षात मोदी या सरकारच्या घोर अपयशाचे ‘पोस्टर बॉय’ ठरले आहेत

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ‘रालोआ’ सरकार दोन वर्षांच्या कारकिर्दीत भरीव काम केल्याचा डंका पिटत असले तरी प्रत्यक्षात मोदी या सरकारच्या घोर अपयशाचे ‘पोस्टर बॉय’ ठरले आहेत, अशी विखारी टिका काँग्रेस पक्षाने केली आहे.मोदी सरकारला दोन वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त काँग्रेस पक्षाच्या अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आलेल्या एका विश्लेषणात्मक टिपणीत पक्षाने म्हटले आहे की, पंतप्रधान मोदी हे वचनभंगाचे ‘पोस्टर बॉय’ ठरले आहेत. त्यांचे संपूर्ण सरकार आणि त्याची धोरणे फसवणूक आणि खोटेपणाच्या पायावर आधारलेली आहेत. लोकसभा निवडणुकीत मोदींनी जनतेला भरमसाठ आश्वासने दिली व सत्याच्या आविर्भावात देशभर असत्याचा प्रचार केला. परंतु सत्तेवर आल्यानंतर गेल्या दोन वर्षांत मोदी यांचे सर्व खोटे दावे पार उघडे पडले आहेत.पक्षाच्या मते मोदी सरकार विविध क्षेत्रात दिलेली आश्वासने पूर्ण करण्यात कसे अपयशी ठरले आहे याचा सविस्तर उहापोह करून या विश्लेषणात काँग्रेस पक्ष शेवटी म्हणतो: मोदीजी जेव्हा पंतप्रधान पदावरून पायउतार होतील तेव्हा भारत छिन्नविच्छिन्न व गलितगात्र झालेला असेल. पंतप्रधान व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने देशावर लादलेल्या खोटेपणाच्या शासनाविरुद्ध लढा देऊन देशाचे रक्षण करणे हे प्रत्येक भारतीयाचे कर्तव्य आहे.मोदीजी आणि त्यांचे ससरकार हा भारतातील मध्यमवर्ग व गरिबांना अभिशाप ठेरले आहे, असा आरोप करून काँग्रेस पक्ष म्हणतो की, डाळींच्या किंमती आभाळाला भिडल्या आहेत व पाच लाखांपर्यंतचे उत्पन्न प्राप्तिकरमुक्त करणे व शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या बाबतीत मात्र मोदी गप्प आहेत. निवडणुकीत दिलेली आश्वासने पूर्ण करण्याऐवजी मोदी जगभर फिरण्यात मग्न आहेत.मोदी सरकारच्या परराष्ट्र धोरणाच्या कथित अपयशाचा पाढा वाचताना काँग्रेस म्हणते की, मोदींच्या जगभर फिरण्याचे भारताची प्रतिष्ठा व स्थान वाढले असे त्यांचे पाठीराखे म्हणतात. पण गुरदासपूर, पठाणकोट व पाम्पोरचे अतिरेकी हल्ले, सीमेवरील शस्त्रसंधीची एक हजार उल्लंघने, एनएसजीचे सभासदत्व मिळविण्यात झालेली भारताची फजिती आणि रशिया, अमेरिका व चीनची पाकिस्तानशी वाढती जवळीक ही या परराष्ट्र धोरणाची फलश्रुती आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)>काँग्रेसने केलेला लेखाजोखांकाँग्रेस पक्ष म्हणतो, मोदीजींनी दोन कोटी नोकऱ्या देण्याचे आश्वासन दिले. आपल्या राजवटीत अर्थव्यवस्था भरभराटीला आली असा दावा त्यांनी केला़ मात्र सरकार फक्त १.३५ लाख नव्या नोकऱ्या देऊ शकले. याउलट संपुआ सरकारने सन २०११ या एकाच वर्षात ९ लाख नोकऱ्या दिल्या होत्या.>आश्वासन वास्तववर्षाला दोन कोटी नोकऱ्या गतवर्षी दोन कोटी बेरोजगारप्रत्येक बँक खात्यात १५ लाख एक दमडीही नाहीमहागाईला हद्दपार करू तूरडाळ २०० रु. किलोपाकला अद्दल घडवू शरीफ यांना वाढदिवसाच्या शुभेच्छाइंधन स्वस्त करू तेल ५८ टक्के, पेट्रोल ८ टक्के स्वस्त