शहरं
Join us  
Trending Stories
1
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
2
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
3
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
4
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
5
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
6
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
7
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
9
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
10
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
11
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
12
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
13
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
14
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
15
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
16
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
17
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
18
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
19
विशेष लेख: बाय बाय अमेरिका, आम्ही चाललो!
20
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?

“८ वर्षे ८ दिशाभूल, भाजपची कमाल, देश उद्ध्वस्त पण मित्र मालामाल”; काँग्रेसचा घणाघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2022 15:45 IST

मोदी सरकारला ८ वर्षे झाल्यानिमित्त भाजपकडून जल्लोष केला जात असताना काँग्रेसने टीकास्त्र सोडले आहे.

नवी दिल्ली: केंद्रात भाजपचे मोदी सरकार स्थापन होऊन ८ वर्षे झाली आहेत. भाजपकडून संपूर्ण देशभरात जल्लोष साजरा केला असताना, काँग्रेसने मात्र मोदी सरकार आणि भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. भाजपकडून मोदी सरकारच्या ८ मोठ्या कामगिरी प्रस्तुत केल्या जात असताना काँग्रेसने मोदी सरकारचे ८ वर्षांचे रिपोर्ट कार्ड सादर केले असून, भाजपने ८ वर्षांत ८ मुद्द्यांवरून जनतेची दिशाभूल केल्याची टीका काँग्रेसने केली आहे. 

काँग्रेसचे महासचिव अजय माकन आणि रणदीप सुरजेवाला यांनी एका पत्रकार परिषदेला संबोधित करताना भाजप आणि मोदी सरकारवर निशाणा साधला. गेल्या ८ वर्षांत भाजपने केलेल्या कमाल कामगिरीमुळे देश उद्ध्वस्त झाला आहे. भाजपच्या धोरणांचा केवळ त्यांच्या मित्रांना मोठा फायदा झाला असून, तेच मालामाल झाले आहेत, असा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला. 

अच्छे दिनऐवजी समाजात द्वेष पसरवला गेला

मोदी सरकारने देशातील जनतेला अच्छे दिनचे स्वप्न दाखवले आणि सत्ता काबीज केली. प्रत्यक्षात मात्र तसे घडताना दिसत नाही. देशातील समाजांमध्ये द्वेष पसरवला जात असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. याशिवाय काँग्रेसने यावेळी एक पुस्तिकाही प्रकाशित केली आहे. मोदी सरकार आल्यापासून देशातील महागाई वाढतच चालली आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट झालेले नाही. याउलट शेतकऱ्यांसमोर नानाविध अडचणी उभ्या राहिल्याची टीका सुरजेवाला यांनी केली. तसेच आपल्या अपयशांपासून जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी नवनवीन मुद्दे भाजपकडून उपस्थित केले जात असल्याचा आरोपही सुरजेवाला यांनी केला आहे. 

दरम्यान, भाजप सरकार आपल्या फायद्यासाठी करवाढ करत आहेत. आताच्या घडीला देशात ४८ कोटी बेरोजगार असून, ४२ लाख सरकारी रिक्त पदे अद्यापही भरली गेलेली नाहीत. देशाच्या जीडीपीची अवस्था बिकट असून, रुपयाचे अवमूल्यन सुरूच आहे. मोदी सरकारने विमानतळेही विकली. देशात मागील ८ वर्षांत जेवढी विकासकामे झाली नाहीत, तेवढ्या दंगली झाल्याचा मोठा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला.  

टॅग्स :congressकाँग्रेसNarendra Modiनरेंद्र मोदीPoliticsराजकारण