शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

“८ वर्षे ८ दिशाभूल, भाजपची कमाल, देश उद्ध्वस्त पण मित्र मालामाल”; काँग्रेसचा घणाघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2022 15:45 IST

मोदी सरकारला ८ वर्षे झाल्यानिमित्त भाजपकडून जल्लोष केला जात असताना काँग्रेसने टीकास्त्र सोडले आहे.

नवी दिल्ली: केंद्रात भाजपचे मोदी सरकार स्थापन होऊन ८ वर्षे झाली आहेत. भाजपकडून संपूर्ण देशभरात जल्लोष साजरा केला असताना, काँग्रेसने मात्र मोदी सरकार आणि भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. भाजपकडून मोदी सरकारच्या ८ मोठ्या कामगिरी प्रस्तुत केल्या जात असताना काँग्रेसने मोदी सरकारचे ८ वर्षांचे रिपोर्ट कार्ड सादर केले असून, भाजपने ८ वर्षांत ८ मुद्द्यांवरून जनतेची दिशाभूल केल्याची टीका काँग्रेसने केली आहे. 

काँग्रेसचे महासचिव अजय माकन आणि रणदीप सुरजेवाला यांनी एका पत्रकार परिषदेला संबोधित करताना भाजप आणि मोदी सरकारवर निशाणा साधला. गेल्या ८ वर्षांत भाजपने केलेल्या कमाल कामगिरीमुळे देश उद्ध्वस्त झाला आहे. भाजपच्या धोरणांचा केवळ त्यांच्या मित्रांना मोठा फायदा झाला असून, तेच मालामाल झाले आहेत, असा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला. 

अच्छे दिनऐवजी समाजात द्वेष पसरवला गेला

मोदी सरकारने देशातील जनतेला अच्छे दिनचे स्वप्न दाखवले आणि सत्ता काबीज केली. प्रत्यक्षात मात्र तसे घडताना दिसत नाही. देशातील समाजांमध्ये द्वेष पसरवला जात असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. याशिवाय काँग्रेसने यावेळी एक पुस्तिकाही प्रकाशित केली आहे. मोदी सरकार आल्यापासून देशातील महागाई वाढतच चालली आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट झालेले नाही. याउलट शेतकऱ्यांसमोर नानाविध अडचणी उभ्या राहिल्याची टीका सुरजेवाला यांनी केली. तसेच आपल्या अपयशांपासून जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी नवनवीन मुद्दे भाजपकडून उपस्थित केले जात असल्याचा आरोपही सुरजेवाला यांनी केला आहे. 

दरम्यान, भाजप सरकार आपल्या फायद्यासाठी करवाढ करत आहेत. आताच्या घडीला देशात ४८ कोटी बेरोजगार असून, ४२ लाख सरकारी रिक्त पदे अद्यापही भरली गेलेली नाहीत. देशाच्या जीडीपीची अवस्था बिकट असून, रुपयाचे अवमूल्यन सुरूच आहे. मोदी सरकारने विमानतळेही विकली. देशात मागील ८ वर्षांत जेवढी विकासकामे झाली नाहीत, तेवढ्या दंगली झाल्याचा मोठा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला.  

टॅग्स :congressकाँग्रेसNarendra Modiनरेंद्र मोदीPoliticsराजकारण