शहरं
Join us  
Trending Stories
1
जयपूरच्या एसएमएस रुग्णालयात भीषण अग्नितांडव: आयसीयूमध्ये ६ रुग्णांचा दुर्दैवी अंत, ५ जणांची प्रकृती चिंताजनक
2
संपादकीय: बिहार ठरवेल आगामी दिशा? जनसुराज्य, जंगलराज ते मागासच राहिलेले राज्य...
3
काटा मारणाऱ्या कारखान्यांवर कारवाई: मुख्यमंत्री म्हणाले, कारखान्यांच्या नफ्यातील पैसे मागितले, एफआरपीचे नाही
4
बिहारमध्ये २२ वर्षांनंतर मतदारयादीचे ‘शुद्धीकरण’; केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा दावा
5
पुतीन यांच्या जाळ्यात ट्रम्प अडकले की काय? अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष मोठ्या भ्रमात होते, पण...
6
महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना केंद्र भरीव मदत करणार; केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची ग्वाही
7
‘आरएटी’ सक्रिय झाल्याने एअर इंडियाच्या विमानाचे लँडिंग
8
शासकीय रुग्णालयांना चक्क बोगस औषधांचा पुरवठा, स्थानिक पातळीवर खरेदी
9
राज्यात प्राध्यापकांच्या १२ हजारांपेक्षा जास्त जागा रिक्त; पीएच.डी., नेट, सेट असूनही अनेक प्राध्यापक कंत्राटी
10
लष्करी सेवेतील दीर्घ ताणामुळे कॅन्सर बळावू शकतो; मृताच्या वारसांना पेन्शन देण्याचा हायकोर्टाचा निर्णय
11
बिल्डरकडून सरकारी जागेवर इमारती उभारून ११२ रहिवाशांची फसवणूक; ३६ वर्षांनी प्रकार उघड
12
पाकच्या पोकळ वल्गना सुरूच; म्हणे, भारत त्यांच्याच विमानांच्या ढिगाऱ्याखाली दबेल
13
मनसे ‘मविआ’ सहभागी? ठाण्यातील बैठकीत संकेत
14
आफ्रिकेतील टांझानियाच्या घनदाट जंगलांतली जादूगार
15
नेपाळमध्ये दोन वर्षांची आर्यतारा नवी देवी!
16
कुशीवली धरणाचा मोबदला संतप्त शेतकऱ्यांनी नाकारला; प्रतिगुंठा २० हजार; रक्कम नाशिक लवादाकडे जमा करण्याच्या हालचाली
17
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
18
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
19
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
20
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 

“८ वर्षे ८ दिशाभूल, भाजपची कमाल, देश उद्ध्वस्त पण मित्र मालामाल”; काँग्रेसचा घणाघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2022 15:45 IST

मोदी सरकारला ८ वर्षे झाल्यानिमित्त भाजपकडून जल्लोष केला जात असताना काँग्रेसने टीकास्त्र सोडले आहे.

नवी दिल्ली: केंद्रात भाजपचे मोदी सरकार स्थापन होऊन ८ वर्षे झाली आहेत. भाजपकडून संपूर्ण देशभरात जल्लोष साजरा केला असताना, काँग्रेसने मात्र मोदी सरकार आणि भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. भाजपकडून मोदी सरकारच्या ८ मोठ्या कामगिरी प्रस्तुत केल्या जात असताना काँग्रेसने मोदी सरकारचे ८ वर्षांचे रिपोर्ट कार्ड सादर केले असून, भाजपने ८ वर्षांत ८ मुद्द्यांवरून जनतेची दिशाभूल केल्याची टीका काँग्रेसने केली आहे. 

काँग्रेसचे महासचिव अजय माकन आणि रणदीप सुरजेवाला यांनी एका पत्रकार परिषदेला संबोधित करताना भाजप आणि मोदी सरकारवर निशाणा साधला. गेल्या ८ वर्षांत भाजपने केलेल्या कमाल कामगिरीमुळे देश उद्ध्वस्त झाला आहे. भाजपच्या धोरणांचा केवळ त्यांच्या मित्रांना मोठा फायदा झाला असून, तेच मालामाल झाले आहेत, असा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला. 

अच्छे दिनऐवजी समाजात द्वेष पसरवला गेला

मोदी सरकारने देशातील जनतेला अच्छे दिनचे स्वप्न दाखवले आणि सत्ता काबीज केली. प्रत्यक्षात मात्र तसे घडताना दिसत नाही. देशातील समाजांमध्ये द्वेष पसरवला जात असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. याशिवाय काँग्रेसने यावेळी एक पुस्तिकाही प्रकाशित केली आहे. मोदी सरकार आल्यापासून देशातील महागाई वाढतच चालली आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट झालेले नाही. याउलट शेतकऱ्यांसमोर नानाविध अडचणी उभ्या राहिल्याची टीका सुरजेवाला यांनी केली. तसेच आपल्या अपयशांपासून जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी नवनवीन मुद्दे भाजपकडून उपस्थित केले जात असल्याचा आरोपही सुरजेवाला यांनी केला आहे. 

दरम्यान, भाजप सरकार आपल्या फायद्यासाठी करवाढ करत आहेत. आताच्या घडीला देशात ४८ कोटी बेरोजगार असून, ४२ लाख सरकारी रिक्त पदे अद्यापही भरली गेलेली नाहीत. देशाच्या जीडीपीची अवस्था बिकट असून, रुपयाचे अवमूल्यन सुरूच आहे. मोदी सरकारने विमानतळेही विकली. देशात मागील ८ वर्षांत जेवढी विकासकामे झाली नाहीत, तेवढ्या दंगली झाल्याचा मोठा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला.  

टॅग्स :congressकाँग्रेसNarendra Modiनरेंद्र मोदीPoliticsराजकारण