शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
2
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
3
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
4
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
5
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
6
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
7
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
8
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
9
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
10
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
11
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
12
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
13
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
14
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
15
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
16
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
17
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
18
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
19
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
20
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS

नव्या ऊर्जेसाठी काँग्रेसचे नवसंकल्प; चिंतन शिबिराची सांगता, आयटी सेल मजबूत करणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2022 05:23 IST

जनतेशी तुटलेला संपर्क वाढवण्यासाठी येत्या २ ऑक्टोबरपासून काश्मीर ते कन्याकुमारी अशी यात्रा काढण्याचा निर्धार काँग्रेसने नवसंकल्प शिबिरात केला.

आदेश रावल, लोकमत न्यूज नेटवर्क

उदयपूर :  जनतेशी तुटलेला संपर्क वाढवण्यासाठी काँग्रेसने  येत्या २ ऑक्टोबरपासून काश्मीर ते कन्याकुमारी अशी यात्रा काढण्याचा व जनसंपर्क वाढविण्याचा निर्धार काँग्रेसने उदयपुरातील नवसंकल्प शिबिरात केला. ‘एक व्यक्ती, एक पद’, ‘एक कुटुंब, एक तिकीट’ हे धोरण अमलात येईल, असे ठरवण्यात आले.  रविवारी या शिबिराची सांगता झाली. 

काँग्रेस कार्यकारिणी, राष्ट्रीय पदाधिकारी, प्रदेश, जिल्हा, ब्लॉक आदी स्तरांवरील पदाधिकाऱ्यांपैकी निम्मे पदाधिकारी हे ५० वर्षांपेक्षा कमी वयाचे असतील, असे ठरविण्यात आले. प्रत्येक प्रांतातील विविध विषयांवर चर्चा करून निर्णय घेण्यास राजकीय घडामोडींविषयक समिती स्थापन करण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला.

- काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत यात्रा काढणार

- ‘एक व्यक्ती, एक पद’, ‘एक कुटुंब, एक तिकीट’

- निम्मे पदाधिकारी हे ५० वर्षांपेक्षा कमी वयाचे 

- राजकीय घडामोडींविषयक निर्णयासाठी समिती 

आयटी सेल अधिक मजबूत करणार कार्यकर्त्यांसाठी ट्रेनिंग 

काँग्रेस नॅशनल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट स्थापन करून नेते, कार्यकर्त्यांचे पक्षाची धोरणे, केंद्राची धोरणे, विद्यमान प्रश्न आदींबाबत प्रबोधन केले जाईल. प्रशिक्षण देण्यात येईल. निवडणूक व्यवस्थापन विभाग सुरू होणार आहे. जनतेचे मत घेण्यास पब्लिक इनसाइट विभाग स्थापणार.

भारत जोडो असा नारा देत काँग्रेस २ ऑक्टोबरपासून कन्याकुमारी ते काश्मीर अशी एक भव्य यात्रा काढणार आहे. लोकांशी संपर्क साधणार आहे. - राहुल गांधी, काँग्रेस नेते

टॅग्स :congressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधीPriyanka Gandhiप्रियंका गांधीSonia Gandhiसोनिया गांधी