शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
3
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
4
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
5
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
6
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
7
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
8
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
9
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
10
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
11
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
12
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
13
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
14
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
15
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
16
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
17
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
18
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
19
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
20
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात

Sonia Gandhi: “सर्वांत बेजबाबदार सरकार कसं असावं, याचं मोदी-योगी उत्तम उदाहरण”; सोनिया गांधींचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2022 16:44 IST

Sonia Gandhi: मोठ्या कष्टाने उभ्या केलेल्या बड्या सरकारी कंपन्या मोदी सरकार कवडीमोलाने विकतेय, अशी टीका सोनिया गांधी यांनी केली.

नवी दिल्ली: आताच्या घडीला देशात पाच राज्यातील विधानसभा निवडणुकांची धूम आहे. पाच राज्यांपैकी पंजाब, गोवा, मणिपूर आणि उत्तराखंड येथील मतदान प्रक्रिया पूर्ण झाली असून, उत्तर प्रदेशमधील काही टप्प्यांचे मतदान अद्याप बाकी आहे. सर्व राज्यांची मतमोजणी १० मार्च रोजी होणार आहे. यातच काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी केंद्रातील मोदी सरकार आणि उत्तर प्रदेशमधील योगी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. केंद्रातील मोदी आणि उत्तर प्रदेशमधील योगी सरकारने सर्वांत बेजबाबदार असल्याचा परिचय देशाला करून दिला आहे, अशी टीका सोनिया गांधी यांनी केली. 

काँग्रेस कार्यकर्त्यांना संबोधित करताना सोनिया गांधी यांनी मोदी आणि योगी सरकारवर हल्लाबोल केला. देशातील शेतकरी, युवक त्रस्त आहेत. सरकारी नोकरीतील १२ लाख पदे रिक्त असूनही सरकार भरती प्रक्रिया सुरू करत नाही. गेल्या ५ वर्षांपासून केवळ समाजात फूट पाडण्याशिवाय या सरकारने कोणतेही ठोस काम केले नाही, या शब्दांत सोनिया गांधी यांनी टीकास्त्र सोडले.

बेजबाबदार सरकार कसे असावे, याचे उत्तम उदाहरण

कोरोना संकटकाळात केंद्रातील मोदी आणि उत्तर प्रदेशमधील योगी सरकारने बेजबाबदार सरकार असे असावे, याचे उदाहरण देशासमोर ठेवले आहे. ऑक्सिजन आणि बेड्सची कमतरता, लसींचा तुटवडा, औषधांचा कमी साठा यामुळे देशवासींना मोठ्या समस्यांचा सामना करावा लागला, असे सोनिया गांधी यांनी म्हटले आहे. तसेच पेट्रोल-डिझेल यासह गॅसची दरवाढ होत आहे. अशाने सर्वसामान्य जनतेच्या खिशावर मोठा बोजा पडत असून, घर चालवणे गरिबांसाठी कठीण होत चालले आहे, असा दावा सोनिया गांधी यांनी केला आहे. 

दरम्यान, खासगीकरणाच्या मुद्द्यावर बोलताना, देशातील गोरगरीब आणि सामान्य जनतेच्या कष्टावर उभ्या केलेल्या बड्या सरकारी कंपन्या कवडीमोलाने मोदी सरकार विकत आहे. यामुळे बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढत चालली आहे, असे टीकास्त्र सोनिया गांधी यांनी सोडले. यावेळी काँग्रेसने केलेल्या चांगल्या कामांचा आढावा सोनिया गांधी यांनी कार्यकर्त्यांसमोर घेतला. 

टॅग्स :Sonia Gandhiसोनिया गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीyogi adityanathयोगी आदित्यनाथPoliticsराजकारण