शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain: आजचा दिवस पावसाचा, संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
2
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
3
सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंतच्या सर्व उत्पादनांवर जीएसटी सवलत मिळणार; निर्मला सीतारामण यांचा दावा
4
आजचे राशीभविष्य- १५ सप्टेंबर २०२५: रागावर नियंत्रण ठेवा, कुटुंबियांशी वादविवाद टाळावेत!
5
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
6
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
7
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
8
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
9
पूजा खेडकरांच्या घरातून अपहृत चालकाची सुटका; ऐरोलीत अपघात, कारमध्ये कोंबून नेले पुण्याला
10
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
11
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
12
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
13
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
14
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
15
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
16
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
17
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
18
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
19
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार

Sonia Gandhi: “सर्वांत बेजबाबदार सरकार कसं असावं, याचं मोदी-योगी उत्तम उदाहरण”; सोनिया गांधींचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2022 16:44 IST

Sonia Gandhi: मोठ्या कष्टाने उभ्या केलेल्या बड्या सरकारी कंपन्या मोदी सरकार कवडीमोलाने विकतेय, अशी टीका सोनिया गांधी यांनी केली.

नवी दिल्ली: आताच्या घडीला देशात पाच राज्यातील विधानसभा निवडणुकांची धूम आहे. पाच राज्यांपैकी पंजाब, गोवा, मणिपूर आणि उत्तराखंड येथील मतदान प्रक्रिया पूर्ण झाली असून, उत्तर प्रदेशमधील काही टप्प्यांचे मतदान अद्याप बाकी आहे. सर्व राज्यांची मतमोजणी १० मार्च रोजी होणार आहे. यातच काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी केंद्रातील मोदी सरकार आणि उत्तर प्रदेशमधील योगी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. केंद्रातील मोदी आणि उत्तर प्रदेशमधील योगी सरकारने सर्वांत बेजबाबदार असल्याचा परिचय देशाला करून दिला आहे, अशी टीका सोनिया गांधी यांनी केली. 

काँग्रेस कार्यकर्त्यांना संबोधित करताना सोनिया गांधी यांनी मोदी आणि योगी सरकारवर हल्लाबोल केला. देशातील शेतकरी, युवक त्रस्त आहेत. सरकारी नोकरीतील १२ लाख पदे रिक्त असूनही सरकार भरती प्रक्रिया सुरू करत नाही. गेल्या ५ वर्षांपासून केवळ समाजात फूट पाडण्याशिवाय या सरकारने कोणतेही ठोस काम केले नाही, या शब्दांत सोनिया गांधी यांनी टीकास्त्र सोडले.

बेजबाबदार सरकार कसे असावे, याचे उत्तम उदाहरण

कोरोना संकटकाळात केंद्रातील मोदी आणि उत्तर प्रदेशमधील योगी सरकारने बेजबाबदार सरकार असे असावे, याचे उदाहरण देशासमोर ठेवले आहे. ऑक्सिजन आणि बेड्सची कमतरता, लसींचा तुटवडा, औषधांचा कमी साठा यामुळे देशवासींना मोठ्या समस्यांचा सामना करावा लागला, असे सोनिया गांधी यांनी म्हटले आहे. तसेच पेट्रोल-डिझेल यासह गॅसची दरवाढ होत आहे. अशाने सर्वसामान्य जनतेच्या खिशावर मोठा बोजा पडत असून, घर चालवणे गरिबांसाठी कठीण होत चालले आहे, असा दावा सोनिया गांधी यांनी केला आहे. 

दरम्यान, खासगीकरणाच्या मुद्द्यावर बोलताना, देशातील गोरगरीब आणि सामान्य जनतेच्या कष्टावर उभ्या केलेल्या बड्या सरकारी कंपन्या कवडीमोलाने मोदी सरकार विकत आहे. यामुळे बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढत चालली आहे, असे टीकास्त्र सोनिया गांधी यांनी सोडले. यावेळी काँग्रेसने केलेल्या चांगल्या कामांचा आढावा सोनिया गांधी यांनी कार्यकर्त्यांसमोर घेतला. 

टॅग्स :Sonia Gandhiसोनिया गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीyogi adityanathयोगी आदित्यनाथPoliticsराजकारण