शहरं
Join us  
Trending Stories
1
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 
2
Ahmedabad Plane Crash : सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
3
Ahmedabad Plane Crash: विमानाने टेक ऑफ केले अन् काही वेळात क्रॅश झाले; त्या ८ मिनिटांत नेमके काय झाले?
4
"माझ्या मुलाने दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी अन्...! ज्या वस्तिगृहावर विमान कोसळलं तेथेच जेवणासाठी गेला होता"
5
अहमदाबाद विमान अपघातावर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, बिलावल भुट्टो म्हणाले...
6
Air India Plane Crash: अनेकांचे गेले जीव, आतापर्यंत १०० जणांचे मृतदेह मिळाले! विमान पडले तेव्हा वसतिगृहात होते ५० विद्यार्थी
7
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
8
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
9
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
10
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
11
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
12
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
13
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
14
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो
15
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावे, खासदार तटकरेंच्या नातेवाईकांचा समावेश
16
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
17
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
18
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
19
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
20
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?

मसूद अजहरला काँग्रेसने पकडले, मात्र भाजपाने सोडले - राहुल गांधी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2019 20:29 IST

राहुल गांधी यांनी शेतकरी, जवान, न्यायपालिका आणि रोजगार या मुद्द्यावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारवर निशाना साधला. 

गांधीनगर : गुजरातमध्ये काँग्रेस कार्यकारिणीची बैठक मंगळवारी झाली. या बैठकीनंतर काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी गांधीनगरमध्ये एका रॅलीत कार्यकर्त्यांना संबोधित केले. यावेळी राहुल गांधी यांनी शेतकरी, जवान, न्यायपालिका आणि रोजगार या मुद्द्यावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारवर निशाना साधला. 

याचबरोबर, राहुल गांधी यांनी पुलवामा दहशतवादी हल्ल्यावरुन भाजपावर टीका केला. पुलवामा दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी घेणारा जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अजहर याला काँग्रेसने पकडले होते. मात्र, कंदहार विमान अपहरण प्रकरणात भाजपा सरकारने  मसूद अजहरला विमानात बसवून पाकिस्तानात पाठविले, असे राहुल गांधी यांनी सांगितले. 

केंद्र सरकारने जीएसटी देशात लागू करताना सांगितले होते की, देशात एक करप्रणाली असेल ती सुलभ असेल. मात्र, गब्बर सिंह टॅक्स आजपर्यंत छोट्या व्यापाऱ्यांना समजला नाही. जीएसटी करप्रणालीचा फटका अनेक छोट्या व्यापारांना बसला, अनेक व्यापारी बेरोजगार झाले. त्यामुळे 2019 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसची सत्ता आली, तर सर्वप्रथम जीएसटी करप्रणालीत पुनर्रचना करुन व्यापारांना दिलासा देण्यात येईल, असेही राहुल गांधी यांनी यावेळी सांगितले. 

याशिवाय, राहुल गांधी यांनी या सभेत बोलताना राफेल, जीएसटी, नोटाबंदी अशा अनेक मुद्द्यावरुन मोदी सरकारवर हल्लाबोल केला. नोटाबंदी आणि जीएसटीमुळे अनेक छोटे व्यापारी देशोधडीला लागले. नोटाबंदीच्या रांगेत सामान्य माणूस उभा होता. या रांगेत अंबानी उभे होते का ? असा प्रश्न राहुल गांधी यांनी उपस्थित जनसमुदायाला केला. राफेलवरुन मोदींना लक्ष्य करत राफेलच्या माध्यमातून हवाई दलाचे 30 हजार कोटी अनिल अंबानी यांच्या खिशात घातले गेले, असा आरोप राहुल गांधी यांनी पुन्हा केला. याच राफेल प्रकरणाची चौकशी करणाऱ्या सीबीआय संचालकांना एका रात्रीत हटवले गेले असेही राहुल गांधी म्हणाले.

महात्मा गांधी यांचे विचार भारत देशाची ओळख आहे. एकीकडे महात्मा गांधी यांनी देश घडविण्यासाठी आपले प्राण दिले तर दुसरीकडे देश तोडण्याचे काम भाजपावाले करत आहेत. लोकांना न्याय मिळाला नाही तर लोक कोर्टात जातात. मात्र कोर्टाच्या इतिहासात पहिल्यांदा सुप्रीम कोर्टाच्या चार न्यायाधीशांनी पत्रकार परिषद घेऊन आम्हाला काम करु दिले जात नाही, असा आरोपही राहुल गांधी यांनी यावेळी मोदी सरकारवर केला.  

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेस