शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

मसूद अजहरला काँग्रेसने पकडले, मात्र भाजपाने सोडले - राहुल गांधी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2019 20:29 IST

राहुल गांधी यांनी शेतकरी, जवान, न्यायपालिका आणि रोजगार या मुद्द्यावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारवर निशाना साधला. 

गांधीनगर : गुजरातमध्ये काँग्रेस कार्यकारिणीची बैठक मंगळवारी झाली. या बैठकीनंतर काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी गांधीनगरमध्ये एका रॅलीत कार्यकर्त्यांना संबोधित केले. यावेळी राहुल गांधी यांनी शेतकरी, जवान, न्यायपालिका आणि रोजगार या मुद्द्यावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारवर निशाना साधला. 

याचबरोबर, राहुल गांधी यांनी पुलवामा दहशतवादी हल्ल्यावरुन भाजपावर टीका केला. पुलवामा दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी घेणारा जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अजहर याला काँग्रेसने पकडले होते. मात्र, कंदहार विमान अपहरण प्रकरणात भाजपा सरकारने  मसूद अजहरला विमानात बसवून पाकिस्तानात पाठविले, असे राहुल गांधी यांनी सांगितले. 

केंद्र सरकारने जीएसटी देशात लागू करताना सांगितले होते की, देशात एक करप्रणाली असेल ती सुलभ असेल. मात्र, गब्बर सिंह टॅक्स आजपर्यंत छोट्या व्यापाऱ्यांना समजला नाही. जीएसटी करप्रणालीचा फटका अनेक छोट्या व्यापारांना बसला, अनेक व्यापारी बेरोजगार झाले. त्यामुळे 2019 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसची सत्ता आली, तर सर्वप्रथम जीएसटी करप्रणालीत पुनर्रचना करुन व्यापारांना दिलासा देण्यात येईल, असेही राहुल गांधी यांनी यावेळी सांगितले. 

याशिवाय, राहुल गांधी यांनी या सभेत बोलताना राफेल, जीएसटी, नोटाबंदी अशा अनेक मुद्द्यावरुन मोदी सरकारवर हल्लाबोल केला. नोटाबंदी आणि जीएसटीमुळे अनेक छोटे व्यापारी देशोधडीला लागले. नोटाबंदीच्या रांगेत सामान्य माणूस उभा होता. या रांगेत अंबानी उभे होते का ? असा प्रश्न राहुल गांधी यांनी उपस्थित जनसमुदायाला केला. राफेलवरुन मोदींना लक्ष्य करत राफेलच्या माध्यमातून हवाई दलाचे 30 हजार कोटी अनिल अंबानी यांच्या खिशात घातले गेले, असा आरोप राहुल गांधी यांनी पुन्हा केला. याच राफेल प्रकरणाची चौकशी करणाऱ्या सीबीआय संचालकांना एका रात्रीत हटवले गेले असेही राहुल गांधी म्हणाले.

महात्मा गांधी यांचे विचार भारत देशाची ओळख आहे. एकीकडे महात्मा गांधी यांनी देश घडविण्यासाठी आपले प्राण दिले तर दुसरीकडे देश तोडण्याचे काम भाजपावाले करत आहेत. लोकांना न्याय मिळाला नाही तर लोक कोर्टात जातात. मात्र कोर्टाच्या इतिहासात पहिल्यांदा सुप्रीम कोर्टाच्या चार न्यायाधीशांनी पत्रकार परिषद घेऊन आम्हाला काम करु दिले जात नाही, असा आरोपही राहुल गांधी यांनी यावेळी मोदी सरकारवर केला.  

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेस