शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

मसूद अजहरला काँग्रेसने पकडले, मात्र भाजपाने सोडले - राहुल गांधी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2019 20:29 IST

राहुल गांधी यांनी शेतकरी, जवान, न्यायपालिका आणि रोजगार या मुद्द्यावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारवर निशाना साधला. 

गांधीनगर : गुजरातमध्ये काँग्रेस कार्यकारिणीची बैठक मंगळवारी झाली. या बैठकीनंतर काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी गांधीनगरमध्ये एका रॅलीत कार्यकर्त्यांना संबोधित केले. यावेळी राहुल गांधी यांनी शेतकरी, जवान, न्यायपालिका आणि रोजगार या मुद्द्यावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारवर निशाना साधला. 

याचबरोबर, राहुल गांधी यांनी पुलवामा दहशतवादी हल्ल्यावरुन भाजपावर टीका केला. पुलवामा दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी घेणारा जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अजहर याला काँग्रेसने पकडले होते. मात्र, कंदहार विमान अपहरण प्रकरणात भाजपा सरकारने  मसूद अजहरला विमानात बसवून पाकिस्तानात पाठविले, असे राहुल गांधी यांनी सांगितले. 

केंद्र सरकारने जीएसटी देशात लागू करताना सांगितले होते की, देशात एक करप्रणाली असेल ती सुलभ असेल. मात्र, गब्बर सिंह टॅक्स आजपर्यंत छोट्या व्यापाऱ्यांना समजला नाही. जीएसटी करप्रणालीचा फटका अनेक छोट्या व्यापारांना बसला, अनेक व्यापारी बेरोजगार झाले. त्यामुळे 2019 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसची सत्ता आली, तर सर्वप्रथम जीएसटी करप्रणालीत पुनर्रचना करुन व्यापारांना दिलासा देण्यात येईल, असेही राहुल गांधी यांनी यावेळी सांगितले. 

याशिवाय, राहुल गांधी यांनी या सभेत बोलताना राफेल, जीएसटी, नोटाबंदी अशा अनेक मुद्द्यावरुन मोदी सरकारवर हल्लाबोल केला. नोटाबंदी आणि जीएसटीमुळे अनेक छोटे व्यापारी देशोधडीला लागले. नोटाबंदीच्या रांगेत सामान्य माणूस उभा होता. या रांगेत अंबानी उभे होते का ? असा प्रश्न राहुल गांधी यांनी उपस्थित जनसमुदायाला केला. राफेलवरुन मोदींना लक्ष्य करत राफेलच्या माध्यमातून हवाई दलाचे 30 हजार कोटी अनिल अंबानी यांच्या खिशात घातले गेले, असा आरोप राहुल गांधी यांनी पुन्हा केला. याच राफेल प्रकरणाची चौकशी करणाऱ्या सीबीआय संचालकांना एका रात्रीत हटवले गेले असेही राहुल गांधी म्हणाले.

महात्मा गांधी यांचे विचार भारत देशाची ओळख आहे. एकीकडे महात्मा गांधी यांनी देश घडविण्यासाठी आपले प्राण दिले तर दुसरीकडे देश तोडण्याचे काम भाजपावाले करत आहेत. लोकांना न्याय मिळाला नाही तर लोक कोर्टात जातात. मात्र कोर्टाच्या इतिहासात पहिल्यांदा सुप्रीम कोर्टाच्या चार न्यायाधीशांनी पत्रकार परिषद घेऊन आम्हाला काम करु दिले जात नाही, असा आरोपही राहुल गांधी यांनी यावेळी मोदी सरकारवर केला.  

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेस