शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
5
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
6
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
7
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
8
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
9
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
10
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
11
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
12
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
13
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
14
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
15
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
16
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
17
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
18
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
19
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
20
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले

४६ वर्षांनंतर बदलला काँग्रेसचा पत्ता, अत्याधुनिक सुविधांनी युक्त नव्या मुख्यालयाचं उद्घाटन   

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2025 12:54 IST

Congress New Headquarter: देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष असलेल्या काँग्रेसच्या मुख्यालयाचा  २४ अकबर रोड हा पत्ता आता बदलला आहे. ४६ वर्षांनंतर काँग्रेसच्या मुख्यालयाचं नव्या ठिकाणी स्थलांतर झालं असून, मुख्यालयाच्या नव्या वास्तूचं उदघाटन आज संपन्न झालं आहे.

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष असलेल्या काँग्रेसच्या मुख्यालयाचा  २४ अकबर रोड हा पत्ता आता बदलला आहे. ४६ वर्षांनंतर काँग्रेसच्या मुख्यालयाचं नव्या ठिकाणी स्थलांतर झालं असून, मुख्यालयाच्या नव्या वास्तूचं उदघाटन आज संपन्न झालं आहे. आता काँग्रेसच्या मुख्यालयाचा नवा पत्ता हा ९-ए कोटला रोड, नवी दिल्ली हा असेल. काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या आणि माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या हस्ते आज पक्षाच्या नव्या मुख्यालयाचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी राहुल गांधी, काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्याह पक्षाचे इतर दिग्गज नेते उपस्थित होते. 

मात्र काँग्रेसच्या मुख्यालयाचं उदघाटन झाल्याझाल्याच त्याच्या नावावरून वादांना सुरुवात झाली आहे. तसेच या वादात भाजपानेही उडी घेतली आहे. काँग्रेसच्या नव्या मुख्यालयाची इमारत दीन दयाल उपाध्याय मार्गावर आहे. इथून जवळच काही अंतरावर भाजपाचं कार्यालय आहे. मात्र वैचारिक मतभेदांमुळे काँग्रेसने आपल्या पत्त्यामध्ये दीन दयाय उपाध्याय यांचं नाव येऊ नये यासाठी मुख्यालयाचा मुख्य दरवाजा कोटला मार्गाच्या दिशेने ठेवला आहे. तसेच प्रशासनाकडून पत्ता बदलवून घेत तो ९ ए कोटला मार्ग असा करून घेतला आहे. त्यामुळे आता काँग्रेसच्या मुख्यालयाचा पत्ता हा इंदिरा गांधी भवन, ९ए, कोटला मार्ग असा असेल.

दरम्यान, काँग्रेसने आपल्या मुख्यालयाचं नामकरण इंदिरा गांधी यांच्या नावावरून केल्याने काँग्रेसमध्येच काही मतभेद निर्माण झाल्याची चर्चा आहे. काँग्रेसच्या कार्यालयाबाहेर लावण्यात आलेल्या फलकांमधून या मुख्यालयाचं नामकरण दिवंगत पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या नावावरून करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच भाजपानेही डॉ. मनमोहन सिंग यांचं नाव काँग्रेसच्या मुख्यालयाला का देण्यात आलेलं नाही, असा सवाल विचारला आहे.

मात्र काँग्रेसकडून हे दावे फेटाळून लावण्यात आले आहेत. काँग्रेसचे नेते राजीव शुक्ला यांनी सांगितले की, इंदिरा भवन नावाबाबत मनमोहन सिंग यांचं कुटुंब आणि इतरांनाही आक्षेप नाही आहे. इंदिरा भवन हे नाव सर्वांना मान्य आहे. तर काँग्रेस नेते पवन कुमार बन्सल यांनी सांगितले की, हे नाव १० वर्षांपूर्वीच निश्चित झालं होतं. प्रत्येक गोष्टीवरून वाद उत्पन्न करणं योग्य नाही.  

टॅग्स :congressकाँग्रेसdelhiदिल्ली