शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
2
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
3
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
4
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
5
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
6
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
7
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
8
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
9
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
10
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
11
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
12
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
13
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
14
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
15
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
16
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
17
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
18
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
19
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
20
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?

४६ वर्षांनंतर बदलला काँग्रेसचा पत्ता, अत्याधुनिक सुविधांनी युक्त नव्या मुख्यालयाचं उद्घाटन   

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2025 12:54 IST

Congress New Headquarter: देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष असलेल्या काँग्रेसच्या मुख्यालयाचा  २४ अकबर रोड हा पत्ता आता बदलला आहे. ४६ वर्षांनंतर काँग्रेसच्या मुख्यालयाचं नव्या ठिकाणी स्थलांतर झालं असून, मुख्यालयाच्या नव्या वास्तूचं उदघाटन आज संपन्न झालं आहे.

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष असलेल्या काँग्रेसच्या मुख्यालयाचा  २४ अकबर रोड हा पत्ता आता बदलला आहे. ४६ वर्षांनंतर काँग्रेसच्या मुख्यालयाचं नव्या ठिकाणी स्थलांतर झालं असून, मुख्यालयाच्या नव्या वास्तूचं उदघाटन आज संपन्न झालं आहे. आता काँग्रेसच्या मुख्यालयाचा नवा पत्ता हा ९-ए कोटला रोड, नवी दिल्ली हा असेल. काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या आणि माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या हस्ते आज पक्षाच्या नव्या मुख्यालयाचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी राहुल गांधी, काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्याह पक्षाचे इतर दिग्गज नेते उपस्थित होते. 

मात्र काँग्रेसच्या मुख्यालयाचं उदघाटन झाल्याझाल्याच त्याच्या नावावरून वादांना सुरुवात झाली आहे. तसेच या वादात भाजपानेही उडी घेतली आहे. काँग्रेसच्या नव्या मुख्यालयाची इमारत दीन दयाल उपाध्याय मार्गावर आहे. इथून जवळच काही अंतरावर भाजपाचं कार्यालय आहे. मात्र वैचारिक मतभेदांमुळे काँग्रेसने आपल्या पत्त्यामध्ये दीन दयाय उपाध्याय यांचं नाव येऊ नये यासाठी मुख्यालयाचा मुख्य दरवाजा कोटला मार्गाच्या दिशेने ठेवला आहे. तसेच प्रशासनाकडून पत्ता बदलवून घेत तो ९ ए कोटला मार्ग असा करून घेतला आहे. त्यामुळे आता काँग्रेसच्या मुख्यालयाचा पत्ता हा इंदिरा गांधी भवन, ९ए, कोटला मार्ग असा असेल.

दरम्यान, काँग्रेसने आपल्या मुख्यालयाचं नामकरण इंदिरा गांधी यांच्या नावावरून केल्याने काँग्रेसमध्येच काही मतभेद निर्माण झाल्याची चर्चा आहे. काँग्रेसच्या कार्यालयाबाहेर लावण्यात आलेल्या फलकांमधून या मुख्यालयाचं नामकरण दिवंगत पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या नावावरून करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच भाजपानेही डॉ. मनमोहन सिंग यांचं नाव काँग्रेसच्या मुख्यालयाला का देण्यात आलेलं नाही, असा सवाल विचारला आहे.

मात्र काँग्रेसकडून हे दावे फेटाळून लावण्यात आले आहेत. काँग्रेसचे नेते राजीव शुक्ला यांनी सांगितले की, इंदिरा भवन नावाबाबत मनमोहन सिंग यांचं कुटुंब आणि इतरांनाही आक्षेप नाही आहे. इंदिरा भवन हे नाव सर्वांना मान्य आहे. तर काँग्रेस नेते पवन कुमार बन्सल यांनी सांगितले की, हे नाव १० वर्षांपूर्वीच निश्चित झालं होतं. प्रत्येक गोष्टीवरून वाद उत्पन्न करणं योग्य नाही.  

टॅग्स :congressकाँग्रेसdelhiदिल्ली