शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
3
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
4
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
5
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
6
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
7
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
8
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
9
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
10
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
11
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
12
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
13
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
14
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
15
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
16
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
17
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
18
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
19
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
20
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत

सदस्यांवरील निलंबन मागे घेईपर्यंत काँग्रेसचा कामकाजावर बहिष्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2020 06:26 IST

संसदेबाहेर ‘गांधीगिरी’ : उपसभापतींनी चहा-नाश्ता आणला; पण, निलंबित सदस्यांनी नाकारला

विकास झाडे।लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : रविवारी राज्यसभेत गोंधळ घातल्याप्रकरणी निलंबित करण्यात आलेल्या आठ सदस्यांनी संसदेच्या आवारात महात्मा गांधींच्या पुतळ्यासमोर धरणे धरले. ज्यांच्यासमोर हा गोंधळ झाला ते उपसभापती हरिवंश नारायण सिंह हे गांधीगिरी करीत या सदस्यांसाठी चहा-नाश्ता घेऊन आंदोलनस्थळी पोहोचले; पण, आठही सदस्यांनी तो नाकारला. शेतकऱ्यांच्या प्रश्नी देशभरात आंदोलन करणार आणि निलंबन मागे होईपर्यंत कामकाजात सहभागी होणार नसल्याची घोषणा कॉँग्रेसने केली.

रविवारी राज्यसभेत कृषी विधेयक सादर करताना काँग्रेस खासदारांनी गोंधळ घातला होता. या वेळी उपसभापतींसमोर असलेला माइक तोडण्याचा प्रयत्न झाला. विरोधी पक्षाचे राजीव सातव, रिपून बोरा, सईद नासीर हुसेन, डेरेक ओब्रायन, दोला सेन, संजय सिंह, के. के. रागेश, इल्लामारम करीम यांना गोंधळ घातल्याच्या कारणावरून निलंबित करण्यात आले. त्यानंतर मात्र राज्यसभेचे कामकाज चालू शकले नाही. हे आठही सदस्य सरकारचा निषेध करीत संसद परिसरातील महात्मा गांधीजींच्या पुतळ्याजवळ उपोषणाला बसले आहेत. या सर्व सदस्यांनी इथेच रात्र काढली.निलंबन मागे घेतले जात नाही तोवरकाँग्रेस सदस्यांचा कामकाजावर बहिष्कारजोपर्यंत निलंबन मागे घेतले जात नाही तोपर्यंत काँग्रेस सदस्यांचा कामकाजावर बहिष्कार असेल, असे राज्यसभेचे विरोधी पक्ष नेते गुलाब नबी आझाद यांनी जाहीर केले. त्यांनी निलंबित आठ सदस्यांची धरणे स्थळावर जाऊन भेट घेतली. यावेळी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भेट दिली.आझाद म्हणाले की, व्यापाऱ्यांनी शेतकºयांचा माल घेताना तो किमान आधारभूत मुल्यापेक्षा कमी भावात घेतला जाणार नाही अशी तरतूद या कायद्यात करण्यात यावी. देशभरात आम्ही स्वाक्षरी मोहिम राबवित आहोत असेही त्यांनी यावेळी सांगितले.कॉँग्रेसचे राजीव सातव यांनी संसद परिसरातील धरणे आंदोलन थंबविण्यात आले असले तरी देशाच्या रस्त्यास्त्यावर नेऊन सरकार कसे शेतकरी विरोधी आहे ते त्यांना पटवून देऊ, हे आंदोनल आता देशव्यापी केले जाई असे त्यांनी सांगितले.रिपून बोरा यांनी उपसभापती यांनी आमच्यासाठी चहा आणून जशी सह्दयता दाखवली तशीच संसदेत चर्चा करून निलंबन मागे घ्यावे अशी प्रतिक्रिया दिली.माफी मागा, निलंबन मागे घेऊ!निलंबित करण्यात आलेल्या सदस्यांनी त्यांच्या कृतीबाबत माफी मागीतली तर त्यांच्या निलंबनाबाबत विचार केला जाऊ शकतो असे केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी सांगितले. यासंदर्भात त्यांनी ट्विटही केली.हरसिमरत कौर यांचे राष्ट्रपतींना पत्रएनडीए सरकारच्या मंत्रिमंडळातून राजीनामा देणाºया हरसिमरत कौर यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना ट्विट करीत लोकसभेत आणि राज्यसभेत संमत करण्यात आलेली ही कृषि विधेयके स्वाक्षरी न करताच परत पाठवण्याची विनंती केली. संसदेच्या दोन्ही सभागृहांत मंजूर झालेल्या या विधेयकांवर राष्ट्रपतींची स्वाक्षरी झाल्यानंतर त्याला कायद्याचं स्वरुप प्राप्त होईल. 

टॅग्स :Rajya Sabhaराज्यसभाcongressकाँग्रेस