शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
4
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
5
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
6
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
7
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
8
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
9
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
10
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
11
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
12
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
13
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
14
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
15
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
16
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
17
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
18
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
19
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
20
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

सदस्यांवरील निलंबन मागे घेईपर्यंत काँग्रेसचा कामकाजावर बहिष्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2020 06:26 IST

संसदेबाहेर ‘गांधीगिरी’ : उपसभापतींनी चहा-नाश्ता आणला; पण, निलंबित सदस्यांनी नाकारला

विकास झाडे।लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : रविवारी राज्यसभेत गोंधळ घातल्याप्रकरणी निलंबित करण्यात आलेल्या आठ सदस्यांनी संसदेच्या आवारात महात्मा गांधींच्या पुतळ्यासमोर धरणे धरले. ज्यांच्यासमोर हा गोंधळ झाला ते उपसभापती हरिवंश नारायण सिंह हे गांधीगिरी करीत या सदस्यांसाठी चहा-नाश्ता घेऊन आंदोलनस्थळी पोहोचले; पण, आठही सदस्यांनी तो नाकारला. शेतकऱ्यांच्या प्रश्नी देशभरात आंदोलन करणार आणि निलंबन मागे होईपर्यंत कामकाजात सहभागी होणार नसल्याची घोषणा कॉँग्रेसने केली.

रविवारी राज्यसभेत कृषी विधेयक सादर करताना काँग्रेस खासदारांनी गोंधळ घातला होता. या वेळी उपसभापतींसमोर असलेला माइक तोडण्याचा प्रयत्न झाला. विरोधी पक्षाचे राजीव सातव, रिपून बोरा, सईद नासीर हुसेन, डेरेक ओब्रायन, दोला सेन, संजय सिंह, के. के. रागेश, इल्लामारम करीम यांना गोंधळ घातल्याच्या कारणावरून निलंबित करण्यात आले. त्यानंतर मात्र राज्यसभेचे कामकाज चालू शकले नाही. हे आठही सदस्य सरकारचा निषेध करीत संसद परिसरातील महात्मा गांधीजींच्या पुतळ्याजवळ उपोषणाला बसले आहेत. या सर्व सदस्यांनी इथेच रात्र काढली.निलंबन मागे घेतले जात नाही तोवरकाँग्रेस सदस्यांचा कामकाजावर बहिष्कारजोपर्यंत निलंबन मागे घेतले जात नाही तोपर्यंत काँग्रेस सदस्यांचा कामकाजावर बहिष्कार असेल, असे राज्यसभेचे विरोधी पक्ष नेते गुलाब नबी आझाद यांनी जाहीर केले. त्यांनी निलंबित आठ सदस्यांची धरणे स्थळावर जाऊन भेट घेतली. यावेळी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भेट दिली.आझाद म्हणाले की, व्यापाऱ्यांनी शेतकºयांचा माल घेताना तो किमान आधारभूत मुल्यापेक्षा कमी भावात घेतला जाणार नाही अशी तरतूद या कायद्यात करण्यात यावी. देशभरात आम्ही स्वाक्षरी मोहिम राबवित आहोत असेही त्यांनी यावेळी सांगितले.कॉँग्रेसचे राजीव सातव यांनी संसद परिसरातील धरणे आंदोलन थंबविण्यात आले असले तरी देशाच्या रस्त्यास्त्यावर नेऊन सरकार कसे शेतकरी विरोधी आहे ते त्यांना पटवून देऊ, हे आंदोनल आता देशव्यापी केले जाई असे त्यांनी सांगितले.रिपून बोरा यांनी उपसभापती यांनी आमच्यासाठी चहा आणून जशी सह्दयता दाखवली तशीच संसदेत चर्चा करून निलंबन मागे घ्यावे अशी प्रतिक्रिया दिली.माफी मागा, निलंबन मागे घेऊ!निलंबित करण्यात आलेल्या सदस्यांनी त्यांच्या कृतीबाबत माफी मागीतली तर त्यांच्या निलंबनाबाबत विचार केला जाऊ शकतो असे केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी सांगितले. यासंदर्भात त्यांनी ट्विटही केली.हरसिमरत कौर यांचे राष्ट्रपतींना पत्रएनडीए सरकारच्या मंत्रिमंडळातून राजीनामा देणाºया हरसिमरत कौर यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना ट्विट करीत लोकसभेत आणि राज्यसभेत संमत करण्यात आलेली ही कृषि विधेयके स्वाक्षरी न करताच परत पाठवण्याची विनंती केली. संसदेच्या दोन्ही सभागृहांत मंजूर झालेल्या या विधेयकांवर राष्ट्रपतींची स्वाक्षरी झाल्यानंतर त्याला कायद्याचं स्वरुप प्राप्त होईल. 

टॅग्स :Rajya Sabhaराज्यसभाcongressकाँग्रेस