शहरं
Join us  
Trending Stories
1
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
2
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
3
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
4
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
5
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
6
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!
7
३ वर्षाची असताना वडिलांचं निधन, आई रोजंदारीवर १५०० रुपये कमवायची; रेणुका ठाकूरचा संघर्षमय प्रवास
8
सहा महिन्यात एक लाखाचे ९ लाख! १० रुपयांचा शेअर आता 'शतका'च्या उंबरठ्यावर; कंपनीचं नावही आहे खास!
9
देशभरात भीषण अपघातांची मालिका; आंध्र प्रदेश, तेलंगणा, राजस्थानात 60 जणांचा बळी, अनेक जखमी
10
डोनाल्ड ट्रम्प यांनी न्युक्लिअर टेस्टिंगमध्ये घेतलं चीनचं नाव; आता ड्रॅगनने दिलं थेट उत्तर! म्हणाले...
11
Daya Dongre Death: पडद्यावरील खाष्ट सासू हरपली! ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे यांचं निधन
12
भीषण! भरधाव डंपरची बाईकला धडक, लोकांना चिरडलं; १९ जणांचा मृत्यू, धडकी भरवणारा Video
13
मोबाईल फोन रिस्टार्ट करण्याचे भन्नाट फायदे; वर्षानुवर्षे फोन वापरणाऱ्यांनाही नसतील माहीत!
14
Video: "मी कॅमेऱ्यावर कसं सांगू, ते वैयक्तिक..."; ब्ल्यू प्रिंटवर भाजपा उमेदवाराचं उत्तर व्हायरल
15
'त्यांनी अपमानाचे मंत्रालय निर्माण करावे...' प्रियांका गांधी यांचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
16
उल्हासनगर महापालिका कलानी मुक्त करणार; भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश वधारियांचा इशारा
17
स्वतःच्याच वडिलांचे नाव घ्यायला लाज वाटते का?, 'जंगलराज'चा उल्लेख करत PM मोदींचा घणाघात
18
"आशिष शेलारांची बुद्धी चांगली होती, आता गंज लागलाय कारण..."; संदीप देशपांडेंचे दुबार मतदारांवरून उलट सवाल
19
फक्त लग्न करण्यास नकार देणे म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणे नाही: सर्वोच्च न्यायालय
20
शेरवानी घातली, फेटा बांधला, नवरदेव तयार झाला; तितक्यात एक फोन आला अन् सगळ्यांनाच धक्का बसला!

"तेलंगणात काँग्रेस-भाजपाला माझ्या रॉयल एन्फिल्डच्या सीटपेक्षाही कमी जागा मिळतील"

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2023 09:00 IST

निवडणूक प्रचारातील अंदाज लावल्याप्रमाणे राहुल बाबांचं बी टीमचं रडगाणं सुरू झालं आहे.

तेलंगणातील मुलुगू जिल्ह्यात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी जनतेला संबोधित केले. आपल्या भाषणात त्यांनी भारतीय राष्ट्र समितीला लक्ष्य केलं. बीआरएसला मत म्हणजे भाजपाला मत असल्याचं त्यांनी म्हटलं. यावेळी, त्यांनी एमआयएम पक्षावरही भाजपची बी टीम असल्याचा आरोप केला. राहुल गांधींच्या या आरोपावर आता एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन औवेसी यांनी प्रत्युत्तर दिलंय. औवेसी यांनी ट्विटरवरुन राहुल गांधींवर निशाणा साधत, तेलंगणात काँग्रेसला २ ते तीन पेक्षा जास्त जागा जिंकता येणार नाहीत, असेच म्हटले आहे. 

निवडणूक प्रचारातील अंदाज लावल्याप्रमाणे राहुल बाबांचं बी टीमचं रडगाणं सुरू झालं आहे. त्यांनी स्वत:ची अमेठी सीट भाजपला का गिफ्ट दिली?, जर तेलंगणात भाजपाची ही बी टीम कार्यरत आहे, तर भाजपा इथे कमजोर का आहे? राहुल बाबाला एक सुरक्षित सीट शोधण्यासाठी वायनाडला का जावे लागले?, असा सवाल असदुद्दीन औवेसी यांनी विचारला आहे. तसेच, तेलंगणातील विधानसभा निवडणुकीत भाजपा-काँग्रेस आघाडीच्या जेवढे जागा निवडून येतील, त्यापेक्षा जास्त जागा माझ्या रॉयल इन्फिल्डजवळ आहेत, असा खोचक टोलाही औवेसी यांनी लगावला. म्हणजे, भाजप आणि काँग्रेसला केवळ २ ते ३ जागासुद्ध जिंकता येणार नाहीत, असेच औवेसींनी सूचवले आहे. 

केसीआर सत्तेची हॅट्ट्रीक करणार?

केसीआर सत्तेची हॅट्ट्रिक करणार, अशी चर्चा आता तेलंगणात होत आहे. २०१३ मध्ये आंध्र प्रदेशपासून वेगळा होऊन तेलंगणा राज्याची स्थापना झाली, तेव्हापासून केसीआर यांचे वर्चस्व राहिले आहे. २०१४ आणि २०१९ मध्ये प्रचंड बहुमताने सलग दोन निवडणुका जिंकून केसीआर सत्तेवर आहेत. आता, तिसऱ्यांदा विजय नोंदवण्यासाठी त्यांचा प्रयत्न सूरू आहे. आत्तापर्यंत केसीआर यांना तेलंगणाच्या ग्रामीण आणि शहरी, दोन्ही भागांतून प्रचंड मतदान मिळाले, परंतु यावेळी त्यांना सत्ताविरोधी लाटेचा सामना राव यांच्या बीआरएस पक्षाला करावा लागणार आहे.

एमआयएमने गतनिवडणुकीत ७ जागा जिंकल्या

असदुद्दीन ओवेसी यांचा पक्ष ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लीमीन तेलंगणातील अनेक भागात मजबुत आहे. हैदराबादमध्ये गेल्या दोन निवडणुकांमध्ये मुस्लिम मतांच्या जोरावर प्रत्येकी सात जागा जिंकण्यात पक्षाला यश आले आहे. ओवेसींच्या पक्षाने हैदराबादच्या जुन्या शहरातील विधानसभा जागांवर विजय मिळवला. अशा स्थितीत किंगमेकर बनण्याचा त्यांचा प्रयत्न आहे, त्यासाठी त्यांना मुस्लिम मते आपल्याजवळ ठेवायची आहेत. तेलंगणात एका पक्षाला बहुमत मिळाले नाही, तर आपली भूमिका महत्त्वाची ठरू शकते, असे त्यांना वाटते. बसपाही ओवेसींच्या पावलावर पाऊल टाकत, दलित समाजाच्या मदतीने किंगमेकर बनण्याचा प्रयत्न करत आहे. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीAsaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसीElectionनिवडणूकTelanganaतेलंगणाBRS-Bharat Rashtra Samitiभारत राष्ट्र समिती