शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

"तेलंगणात काँग्रेस-भाजपाला माझ्या रॉयल एन्फिल्डच्या सीटपेक्षाही कमी जागा मिळतील"

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2023 09:00 IST

निवडणूक प्रचारातील अंदाज लावल्याप्रमाणे राहुल बाबांचं बी टीमचं रडगाणं सुरू झालं आहे.

तेलंगणातील मुलुगू जिल्ह्यात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी जनतेला संबोधित केले. आपल्या भाषणात त्यांनी भारतीय राष्ट्र समितीला लक्ष्य केलं. बीआरएसला मत म्हणजे भाजपाला मत असल्याचं त्यांनी म्हटलं. यावेळी, त्यांनी एमआयएम पक्षावरही भाजपची बी टीम असल्याचा आरोप केला. राहुल गांधींच्या या आरोपावर आता एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन औवेसी यांनी प्रत्युत्तर दिलंय. औवेसी यांनी ट्विटरवरुन राहुल गांधींवर निशाणा साधत, तेलंगणात काँग्रेसला २ ते तीन पेक्षा जास्त जागा जिंकता येणार नाहीत, असेच म्हटले आहे. 

निवडणूक प्रचारातील अंदाज लावल्याप्रमाणे राहुल बाबांचं बी टीमचं रडगाणं सुरू झालं आहे. त्यांनी स्वत:ची अमेठी सीट भाजपला का गिफ्ट दिली?, जर तेलंगणात भाजपाची ही बी टीम कार्यरत आहे, तर भाजपा इथे कमजोर का आहे? राहुल बाबाला एक सुरक्षित सीट शोधण्यासाठी वायनाडला का जावे लागले?, असा सवाल असदुद्दीन औवेसी यांनी विचारला आहे. तसेच, तेलंगणातील विधानसभा निवडणुकीत भाजपा-काँग्रेस आघाडीच्या जेवढे जागा निवडून येतील, त्यापेक्षा जास्त जागा माझ्या रॉयल इन्फिल्डजवळ आहेत, असा खोचक टोलाही औवेसी यांनी लगावला. म्हणजे, भाजप आणि काँग्रेसला केवळ २ ते ३ जागासुद्ध जिंकता येणार नाहीत, असेच औवेसींनी सूचवले आहे. 

केसीआर सत्तेची हॅट्ट्रीक करणार?

केसीआर सत्तेची हॅट्ट्रिक करणार, अशी चर्चा आता तेलंगणात होत आहे. २०१३ मध्ये आंध्र प्रदेशपासून वेगळा होऊन तेलंगणा राज्याची स्थापना झाली, तेव्हापासून केसीआर यांचे वर्चस्व राहिले आहे. २०१४ आणि २०१९ मध्ये प्रचंड बहुमताने सलग दोन निवडणुका जिंकून केसीआर सत्तेवर आहेत. आता, तिसऱ्यांदा विजय नोंदवण्यासाठी त्यांचा प्रयत्न सूरू आहे. आत्तापर्यंत केसीआर यांना तेलंगणाच्या ग्रामीण आणि शहरी, दोन्ही भागांतून प्रचंड मतदान मिळाले, परंतु यावेळी त्यांना सत्ताविरोधी लाटेचा सामना राव यांच्या बीआरएस पक्षाला करावा लागणार आहे.

एमआयएमने गतनिवडणुकीत ७ जागा जिंकल्या

असदुद्दीन ओवेसी यांचा पक्ष ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लीमीन तेलंगणातील अनेक भागात मजबुत आहे. हैदराबादमध्ये गेल्या दोन निवडणुकांमध्ये मुस्लिम मतांच्या जोरावर प्रत्येकी सात जागा जिंकण्यात पक्षाला यश आले आहे. ओवेसींच्या पक्षाने हैदराबादच्या जुन्या शहरातील विधानसभा जागांवर विजय मिळवला. अशा स्थितीत किंगमेकर बनण्याचा त्यांचा प्रयत्न आहे, त्यासाठी त्यांना मुस्लिम मते आपल्याजवळ ठेवायची आहेत. तेलंगणात एका पक्षाला बहुमत मिळाले नाही, तर आपली भूमिका महत्त्वाची ठरू शकते, असे त्यांना वाटते. बसपाही ओवेसींच्या पावलावर पाऊल टाकत, दलित समाजाच्या मदतीने किंगमेकर बनण्याचा प्रयत्न करत आहे. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीAsaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसीElectionनिवडणूकTelanganaतेलंगणाBRS-Bharat Rashtra Samitiभारत राष्ट्र समिती