शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
3
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
4
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
5
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
6
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
7
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
8
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
9
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
10
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
11
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
12
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
13
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
14
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
15
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
16
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
17
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
18
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
19
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
20
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई

"तेलंगणात काँग्रेस-भाजपाला माझ्या रॉयल एन्फिल्डच्या सीटपेक्षाही कमी जागा मिळतील"

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2023 09:00 IST

निवडणूक प्रचारातील अंदाज लावल्याप्रमाणे राहुल बाबांचं बी टीमचं रडगाणं सुरू झालं आहे.

तेलंगणातील मुलुगू जिल्ह्यात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी जनतेला संबोधित केले. आपल्या भाषणात त्यांनी भारतीय राष्ट्र समितीला लक्ष्य केलं. बीआरएसला मत म्हणजे भाजपाला मत असल्याचं त्यांनी म्हटलं. यावेळी, त्यांनी एमआयएम पक्षावरही भाजपची बी टीम असल्याचा आरोप केला. राहुल गांधींच्या या आरोपावर आता एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन औवेसी यांनी प्रत्युत्तर दिलंय. औवेसी यांनी ट्विटरवरुन राहुल गांधींवर निशाणा साधत, तेलंगणात काँग्रेसला २ ते तीन पेक्षा जास्त जागा जिंकता येणार नाहीत, असेच म्हटले आहे. 

निवडणूक प्रचारातील अंदाज लावल्याप्रमाणे राहुल बाबांचं बी टीमचं रडगाणं सुरू झालं आहे. त्यांनी स्वत:ची अमेठी सीट भाजपला का गिफ्ट दिली?, जर तेलंगणात भाजपाची ही बी टीम कार्यरत आहे, तर भाजपा इथे कमजोर का आहे? राहुल बाबाला एक सुरक्षित सीट शोधण्यासाठी वायनाडला का जावे लागले?, असा सवाल असदुद्दीन औवेसी यांनी विचारला आहे. तसेच, तेलंगणातील विधानसभा निवडणुकीत भाजपा-काँग्रेस आघाडीच्या जेवढे जागा निवडून येतील, त्यापेक्षा जास्त जागा माझ्या रॉयल इन्फिल्डजवळ आहेत, असा खोचक टोलाही औवेसी यांनी लगावला. म्हणजे, भाजप आणि काँग्रेसला केवळ २ ते ३ जागासुद्ध जिंकता येणार नाहीत, असेच औवेसींनी सूचवले आहे. 

केसीआर सत्तेची हॅट्ट्रीक करणार?

केसीआर सत्तेची हॅट्ट्रिक करणार, अशी चर्चा आता तेलंगणात होत आहे. २०१३ मध्ये आंध्र प्रदेशपासून वेगळा होऊन तेलंगणा राज्याची स्थापना झाली, तेव्हापासून केसीआर यांचे वर्चस्व राहिले आहे. २०१४ आणि २०१९ मध्ये प्रचंड बहुमताने सलग दोन निवडणुका जिंकून केसीआर सत्तेवर आहेत. आता, तिसऱ्यांदा विजय नोंदवण्यासाठी त्यांचा प्रयत्न सूरू आहे. आत्तापर्यंत केसीआर यांना तेलंगणाच्या ग्रामीण आणि शहरी, दोन्ही भागांतून प्रचंड मतदान मिळाले, परंतु यावेळी त्यांना सत्ताविरोधी लाटेचा सामना राव यांच्या बीआरएस पक्षाला करावा लागणार आहे.

एमआयएमने गतनिवडणुकीत ७ जागा जिंकल्या

असदुद्दीन ओवेसी यांचा पक्ष ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लीमीन तेलंगणातील अनेक भागात मजबुत आहे. हैदराबादमध्ये गेल्या दोन निवडणुकांमध्ये मुस्लिम मतांच्या जोरावर प्रत्येकी सात जागा जिंकण्यात पक्षाला यश आले आहे. ओवेसींच्या पक्षाने हैदराबादच्या जुन्या शहरातील विधानसभा जागांवर विजय मिळवला. अशा स्थितीत किंगमेकर बनण्याचा त्यांचा प्रयत्न आहे, त्यासाठी त्यांना मुस्लिम मते आपल्याजवळ ठेवायची आहेत. तेलंगणात एका पक्षाला बहुमत मिळाले नाही, तर आपली भूमिका महत्त्वाची ठरू शकते, असे त्यांना वाटते. बसपाही ओवेसींच्या पावलावर पाऊल टाकत, दलित समाजाच्या मदतीने किंगमेकर बनण्याचा प्रयत्न करत आहे. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीAsaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसीElectionनिवडणूकTelanganaतेलंगणाBRS-Bharat Rashtra Samitiभारत राष्ट्र समिती