शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

"तेलंगणात काँग्रेस-भाजपाला माझ्या रॉयल एन्फिल्डच्या सीटपेक्षाही कमी जागा मिळतील"

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2023 09:00 IST

निवडणूक प्रचारातील अंदाज लावल्याप्रमाणे राहुल बाबांचं बी टीमचं रडगाणं सुरू झालं आहे.

तेलंगणातील मुलुगू जिल्ह्यात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी जनतेला संबोधित केले. आपल्या भाषणात त्यांनी भारतीय राष्ट्र समितीला लक्ष्य केलं. बीआरएसला मत म्हणजे भाजपाला मत असल्याचं त्यांनी म्हटलं. यावेळी, त्यांनी एमआयएम पक्षावरही भाजपची बी टीम असल्याचा आरोप केला. राहुल गांधींच्या या आरोपावर आता एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन औवेसी यांनी प्रत्युत्तर दिलंय. औवेसी यांनी ट्विटरवरुन राहुल गांधींवर निशाणा साधत, तेलंगणात काँग्रेसला २ ते तीन पेक्षा जास्त जागा जिंकता येणार नाहीत, असेच म्हटले आहे. 

निवडणूक प्रचारातील अंदाज लावल्याप्रमाणे राहुल बाबांचं बी टीमचं रडगाणं सुरू झालं आहे. त्यांनी स्वत:ची अमेठी सीट भाजपला का गिफ्ट दिली?, जर तेलंगणात भाजपाची ही बी टीम कार्यरत आहे, तर भाजपा इथे कमजोर का आहे? राहुल बाबाला एक सुरक्षित सीट शोधण्यासाठी वायनाडला का जावे लागले?, असा सवाल असदुद्दीन औवेसी यांनी विचारला आहे. तसेच, तेलंगणातील विधानसभा निवडणुकीत भाजपा-काँग्रेस आघाडीच्या जेवढे जागा निवडून येतील, त्यापेक्षा जास्त जागा माझ्या रॉयल इन्फिल्डजवळ आहेत, असा खोचक टोलाही औवेसी यांनी लगावला. म्हणजे, भाजप आणि काँग्रेसला केवळ २ ते ३ जागासुद्ध जिंकता येणार नाहीत, असेच औवेसींनी सूचवले आहे. 

केसीआर सत्तेची हॅट्ट्रीक करणार?

केसीआर सत्तेची हॅट्ट्रिक करणार, अशी चर्चा आता तेलंगणात होत आहे. २०१३ मध्ये आंध्र प्रदेशपासून वेगळा होऊन तेलंगणा राज्याची स्थापना झाली, तेव्हापासून केसीआर यांचे वर्चस्व राहिले आहे. २०१४ आणि २०१९ मध्ये प्रचंड बहुमताने सलग दोन निवडणुका जिंकून केसीआर सत्तेवर आहेत. आता, तिसऱ्यांदा विजय नोंदवण्यासाठी त्यांचा प्रयत्न सूरू आहे. आत्तापर्यंत केसीआर यांना तेलंगणाच्या ग्रामीण आणि शहरी, दोन्ही भागांतून प्रचंड मतदान मिळाले, परंतु यावेळी त्यांना सत्ताविरोधी लाटेचा सामना राव यांच्या बीआरएस पक्षाला करावा लागणार आहे.

एमआयएमने गतनिवडणुकीत ७ जागा जिंकल्या

असदुद्दीन ओवेसी यांचा पक्ष ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लीमीन तेलंगणातील अनेक भागात मजबुत आहे. हैदराबादमध्ये गेल्या दोन निवडणुकांमध्ये मुस्लिम मतांच्या जोरावर प्रत्येकी सात जागा जिंकण्यात पक्षाला यश आले आहे. ओवेसींच्या पक्षाने हैदराबादच्या जुन्या शहरातील विधानसभा जागांवर विजय मिळवला. अशा स्थितीत किंगमेकर बनण्याचा त्यांचा प्रयत्न आहे, त्यासाठी त्यांना मुस्लिम मते आपल्याजवळ ठेवायची आहेत. तेलंगणात एका पक्षाला बहुमत मिळाले नाही, तर आपली भूमिका महत्त्वाची ठरू शकते, असे त्यांना वाटते. बसपाही ओवेसींच्या पावलावर पाऊल टाकत, दलित समाजाच्या मदतीने किंगमेकर बनण्याचा प्रयत्न करत आहे. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीAsaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसीElectionनिवडणूकTelanganaतेलंगणाBRS-Bharat Rashtra Samitiभारत राष्ट्र समिती