शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
4
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
5
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
6
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
7
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
8
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
9
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
10
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
11
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
12
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
13
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
14
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
15
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
16
आयोग नव्हे, मतदारच राजा !
17
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
18
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
19
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
20
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश

Bharat Jodo Yatra: दक्षिण-उत्तरनंतर आता पूर्व-पश्चिमची तयारी; अशी असेल काँग्रेसची 'भारत जोडो यात्रा 2.0'

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2023 18:30 IST

काँग्रेसची कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंतची यात्रा संपली, आता लवकरच पासीघाट ते पोरबंदरची यात्रा काढली जाईल.

नई दिल्ली:  काँग्रेसने कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंत 'भारत जोडो यात्रा' काढली, त्यानंतर आता काँग्रेस आता देशाच्या पूर्व भागातून पश्चिम भागापर्यंत यात्रा काढण्याच्या विचारात आहे. अरुणाचल प्रदेशातील पासीघाट ते गुजरातमधील पोरबंदरपर्यंत ही यात्रा काढली जाण्याची शक्यता आहे. पक्षाचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी ही माहिती दिली आहे. 

संबंधित बातमी- 'ते सत्तेसाठी काहीही करतील, आम्ही सत्याने लढू आणि जिंकू...' राहुल गांधींचा केंद्रावर हल्लाबोल

जयराम रमेश म्हणाले की, पूर्वेकडून पश्चिमेचा प्रवास दक्षिण-उत्तर प्रवासापेक्षा वेगळा आहे. ईशान्येकडील भौगोलिक आणि हवामानाचा विचार करता यात्रेसाठी वाहतुकीची वेगवेगळी साधने (मल्टी-मॉडल) वापरली जाऊ शकतात. पहिल्या यात्रेच्या तुलनेत या यात्रेत सहभागी होणाऱ्या प्रवाशांची संख्या कमी असू शकते. येत्या काही आठवड्यांत सर्व काही ठरवले जाईल, असे ते म्हणाले.

याआधी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी पक्षाच्या अधिवेशनात भाषण करताना या यात्रेबाबत संकेत दिले होते. राहुल गांधी म्हणाले की, पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी ही तपस्या पुढे नेण्यासाठी एक कार्यक्रम तयार करावा, यामध्ये प्रत्येकजण सहभागी होण्यास तयार आहे. राहुल यांनी या यात्रेला अनेकदा तपश्चर्याचे नाव दिले आहे. त्यामुळे येत्या काही महिन्यात काँग्रेसची यात्रा काढली जाऊ शकते, अशी शक्यता आहे.  

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसBharat Jodo Yatraभारत जोडो यात्रा