शहरं
Join us  
Trending Stories
1
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
2
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
3
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
4
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
5
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
6
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
7
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
8
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
9
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
10
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
11
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
12
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
13
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
14
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
15
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
16
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
17
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
18
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
19
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
20
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका

काँग्रेसने घाबरून केली तेलंगणची घोषणा

By admin | Updated: June 12, 2016 03:48 IST

स्वतंत्र तेलंगण राज्याच्या मागणीसाठी तेलंगण राष्ट्र समितीचे (टीआरएस) प्रमुख के. चंद्रशेखर राव (केसीआर) आमरण उपोषणाला बसले होते आणि त्यांची प्रकृती ढासळत चालली होती.

नवी दिल्ली : स्वतंत्र तेलंगण राज्याच्या मागणीसाठी तेलंगण राष्ट्र समितीचे (टीआरएस) प्रमुख के. चंद्रशेखर राव (केसीआर) आमरण उपोषणाला बसले होते आणि त्यांची प्रकृती ढासळत चालली होती. स्वतंत्र तेलंगणच्या मागणीपुढे संपुआ सरकार झुकण्यामागील हे कारण होते, असा खुलासा माजी केंद्रीय मंत्री जयराम रमेश यांनी केला आहे.रमेश त्यांच्या ‘ओल्ड हिस्टरी अँड न्यू जिओग्राफी- बायफरकेटिंग आंध्र प्रदेश’ या पुस्तकाचे शनिवारी प्रकाशन झाले. या पुस्तकातील माहितीनुसार हैदराबादेतील परिस्थिती गंभीर असून, त्यात सुधारणेकरिता ठोस पाऊल उचलण्याची गरज असल्याची सूचना सरकारमधील वरिष्ठ नेत्यांना मिळाली होती. ज्येष्ठ काँग्रेस नेत्याने आपल्या २४२ पानी पुस्तकात असे म्हटले आहे की, केसीआर यांची ढासळत चाललेली प्रकृती या निर्णयामागील एक मुख्य कारण होते. याशिवाय माओवादी आणि त्यांचे समर्थक परिस्थिती आणखी बिघडवतील अशीही शंका होती. तत्कालीन गृहमंत्री पी. चिदंबरम यांना कुठल्या कारणाने त्या वेळी आंध्र प्रदेशात पुन्हा एकदा पोट्टू श्रीरामुलूसारखी स्थिती निर्माण झाली असल्याचे वाटले असावे. गेल्या वेळी आंध्र प्रदेशातून राज्यसभेवर निवडून गेलेले जयराम रमेश हे आंध्र प्रदेशच्या विभाजनासाठी विधेयकाचा आराखडा तयार करण्याकरिता संपुआ सरकारद्वारे आॅक्टोबर २०१३ मध्ये स्थापित मंत्रिगटाचे सदस्य होते.स्वतंत्र आंध्र प्रदेशच्या मागणीसाठी आमरण उपोषण करणारे श्रीरामुलू यांचा १५ डिसेंबर १९५२ रोजी मृत्यू झाला होता. या घटनेनंतर मोठ्या प्रमाणात दंगली उसळल्या होत्या. नोव्हेंबर १९५६ साली स्वतंत्र तेलुगू भाषिक आंध्र प्रदेशची स्थापना करण्यात आली होती. फेब्रुवारी २०१४ मध्ये संसदेने तेलंगण आणि आंध्र प्रदेश अशा दोन राज्यांत त्याचे विभाजन केले. (लोकमत न्यूज नेटवर्क)बैठकीनंतर निर्णयचिदंबरम यांनी गुप्तचर संस्था आणि इतर अहवालांच्या आकलनानंतर तेलंगण स्थापनेच्या निर्णयासंबंधित वक्तव्य जारी केले होते. या निर्णयावर तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या निवासस्थानी अखेरचा हात फिरविण्यात आला होता. या वेळी चिदंबरम, प्रणव मुखर्जी आणि आंध्र प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री के. रोसय्या उपस्थित होते. त्यानंतर, काँग्रेसच्या इतर नेत्यांसोबत विचारविनिमय करण्यात आला.