शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसने घाबरून केली तेलंगणची घोषणा

By admin | Updated: June 12, 2016 03:48 IST

स्वतंत्र तेलंगण राज्याच्या मागणीसाठी तेलंगण राष्ट्र समितीचे (टीआरएस) प्रमुख के. चंद्रशेखर राव (केसीआर) आमरण उपोषणाला बसले होते आणि त्यांची प्रकृती ढासळत चालली होती.

नवी दिल्ली : स्वतंत्र तेलंगण राज्याच्या मागणीसाठी तेलंगण राष्ट्र समितीचे (टीआरएस) प्रमुख के. चंद्रशेखर राव (केसीआर) आमरण उपोषणाला बसले होते आणि त्यांची प्रकृती ढासळत चालली होती. स्वतंत्र तेलंगणच्या मागणीपुढे संपुआ सरकार झुकण्यामागील हे कारण होते, असा खुलासा माजी केंद्रीय मंत्री जयराम रमेश यांनी केला आहे.रमेश त्यांच्या ‘ओल्ड हिस्टरी अँड न्यू जिओग्राफी- बायफरकेटिंग आंध्र प्रदेश’ या पुस्तकाचे शनिवारी प्रकाशन झाले. या पुस्तकातील माहितीनुसार हैदराबादेतील परिस्थिती गंभीर असून, त्यात सुधारणेकरिता ठोस पाऊल उचलण्याची गरज असल्याची सूचना सरकारमधील वरिष्ठ नेत्यांना मिळाली होती. ज्येष्ठ काँग्रेस नेत्याने आपल्या २४२ पानी पुस्तकात असे म्हटले आहे की, केसीआर यांची ढासळत चाललेली प्रकृती या निर्णयामागील एक मुख्य कारण होते. याशिवाय माओवादी आणि त्यांचे समर्थक परिस्थिती आणखी बिघडवतील अशीही शंका होती. तत्कालीन गृहमंत्री पी. चिदंबरम यांना कुठल्या कारणाने त्या वेळी आंध्र प्रदेशात पुन्हा एकदा पोट्टू श्रीरामुलूसारखी स्थिती निर्माण झाली असल्याचे वाटले असावे. गेल्या वेळी आंध्र प्रदेशातून राज्यसभेवर निवडून गेलेले जयराम रमेश हे आंध्र प्रदेशच्या विभाजनासाठी विधेयकाचा आराखडा तयार करण्याकरिता संपुआ सरकारद्वारे आॅक्टोबर २०१३ मध्ये स्थापित मंत्रिगटाचे सदस्य होते.स्वतंत्र आंध्र प्रदेशच्या मागणीसाठी आमरण उपोषण करणारे श्रीरामुलू यांचा १५ डिसेंबर १९५२ रोजी मृत्यू झाला होता. या घटनेनंतर मोठ्या प्रमाणात दंगली उसळल्या होत्या. नोव्हेंबर १९५६ साली स्वतंत्र तेलुगू भाषिक आंध्र प्रदेशची स्थापना करण्यात आली होती. फेब्रुवारी २०१४ मध्ये संसदेने तेलंगण आणि आंध्र प्रदेश अशा दोन राज्यांत त्याचे विभाजन केले. (लोकमत न्यूज नेटवर्क)बैठकीनंतर निर्णयचिदंबरम यांनी गुप्तचर संस्था आणि इतर अहवालांच्या आकलनानंतर तेलंगण स्थापनेच्या निर्णयासंबंधित वक्तव्य जारी केले होते. या निर्णयावर तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या निवासस्थानी अखेरचा हात फिरविण्यात आला होता. या वेळी चिदंबरम, प्रणव मुखर्जी आणि आंध्र प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री के. रोसय्या उपस्थित होते. त्यानंतर, काँग्रेसच्या इतर नेत्यांसोबत विचारविनिमय करण्यात आला.