शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

“माझी गरज नसेल तर मी निघून जातो”; नवीन संसदेत पोहोचलेले अधीर रंजन चौधरी का झाले नाराज?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2023 16:24 IST

Adhir Ranjan Choudhary New Parliament: नवीन संसद भवन येथील कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या अधीर रंजन चौधरी यांनी नाराजी व्यक्त केली.

Adhir Ranjan Choudhary New Parliament: संसदेच्या विशेष अधिवेशनापूर्वी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी आज नवीन संसद भवनाच्या 'गज द्वार' येथे राष्ट्रध्वज फडकावला. संसदेच्या विशेष अधिवेशनाच्या एक दिवस आधी हा विशेष कार्यक्रम झाला. कारण या अधिवेशनात संसदेचे कामकाज जुन्या संसद भवनातून नव्या संसद भवनात हलवले जाणार आहे. यावेळी सत्ताधाऱ्यांसह अनेक विरोधी पक्षातील नेत्यांनी हजेरी लावली. यावेळी काँग्रेसचे लोकसभेतील विरोधी पक्षनेते अधीर रंजन चौधरी यांनी नाराजी व्यक्त केली आणि माझी गरज नसेल, तर निघून जातो, असेही सुनावले. 

ध्वजारोहणाच्या प्रसंगी लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला, संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी, राज्यसभेचे उपसभापती हरिवंश, केंद्रीय संसदीय कामकाज राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल आणि व्ही. मुरलीधरन यांच्यासह विविध पक्षाचे राज्यसभा आणि लोकसभेचे खासदार, विविध पक्षांचे नेतेही उपस्थित होते. अधीर रंजन चौधरी यांच्यासह फारूख अब्दुल्ला हेही उपस्थित होते. या सोहळ्याला मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी, सोनिया गांधी उपस्थित नव्हते. मीडियाशी बोलताना अधीर रंजन चौधरी यांना याबाबत प्रश्न विचारण्यात आला.

माझी गरज नसेल तर मी निघून जातो

अधीर रंजन चौधरी यांना मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी आणि सोनिया गांधी उपस्थित न राहिल्याबाबत प्रश्न विचारण्यात आला. माझी इथे गरज नसेल तर मला कळवा, मी निघून जाईन. जे इथे आहेत त्यांच्यावर लक्ष केंद्रित करा. मी इथे आहे, ते पुरेसे नाही का? असा उलटप्रश्न अधीर रंजन चौधरी यांनी मीडियाला विचारला. या कार्यक्रमाला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनाही निमंत्रण पाठवण्यात आले होते. मात्र ते कार्यक्रमाला उपस्थित राहिले नाहीत. या कार्यक्रमाचे निमंत्रण उशिरा मिळाल्याचा आरोप करत, राज्यसभेचे सरचिटणीस पीसी मोदी यांना पत्र लिहून नाराजीही व्यक्त केली.

दरम्यान, हा कार्यक्रम १७ सप्टेंबरला पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त आहे. १५ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजता खरगेजींना निमंत्रण पाठवण्यात आले आहे. आमच्या काँग्रेस कार्यकारिणीची आधीच ठरलेली बैठक १६-१७ सप्टेंबरला हैदराबादमध्ये होणार आहे, हे सरकारला आधीच माहिती होते, अशी प्रतिक्रिया काँग्रेस पक्षाच्या वतीने देण्यात आली. 

 

टॅग्स :congressकाँग्रेस