शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : टॉस जिंकून फसलो! थेट शुभमन गिलचं नाव घेत सूर्या म्हणाला, तो पहिल्याच बॉलवर आउट झाला अन्...
2
PM मोदींची डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी फोनवरून सखोल चर्चा, 'या' ३ गोष्टींसाठी एकत्र काम करणार
3
‘गोल्डन डक’मुळं गिलच्या निवडीवर प्रश्नचिन्ह; संजूसह टीम इंडियातील ‘वशीलेबाजी’चा मुद्दा पुन्हा चर्चेत
4
धोकादायक सेस इमारतींचा तिढा सुटला; मुंबई 'पागडीमुक्त' होणार, पुनर्विकाच्या नव्या नियमावलीची शिंदेंकडून घोषणा
5
IND vs SA : दक्षिण आफ्रिकेचा पलटवार; घरच्या मैदानात टीम इंडियावर ओढावली T20I मधील सर्वात मोठ्या पराभवाची नामुष्की
6
वसंत मोरे थोडक्यात बचावले; नवले पुलावरील अपघातांवर बोलत असतानाच भरधाव टेम्पो आला अन्..
7
VIDEO : अर्शदीपची ओव्हर संपता संपेना; लाजिरवाण्या रेकॉर्डनंतर डगआउटमध्ये बसलेला गंभीर चिडला!
8
नीलेश घायवळ न्यायालयाकडून फरार घोषित; संपूर्ण मालमत्ता जप्त होण्याची शक्यता
9
FIH Hockey Men’s Junior World Cup 2025 : भारताच्या युवा हॉकी संघाचे PM मोदींकडून खास शब्दांत कौतुक, म्हणाले...
10
"एकदा भावाचा टी-शर्ट घालून मॅच खेळायला गेले अन्..."; महिला क्रिकेटर शेफालीचा धमाल किस्सा
11
IND vs SA : विकेटमागे जितेशची चपळाई! क्विंटन डी कॉकवर ओढावली 'नर्व्हस नाइंटी'ची नामुष्की (VIDEO)
12
"ते पार्ट टाइम पॉलिटिशियन, त्यांना गोपनीय परदेश दौऱ्यांचा छंद..."; मुस्लीम महिला नेत्या राहुल गांधींवर स्पष्टच बोलल्या
13
Indigo ला साडेसाती भोवली? दोन शत्रू ग्रहांमुळे अशी ‘दशा’ झाली; २०२७ पर्यंत आव्हान कायम अन्…
14
लुथरा बंधूंची अटकपूर्व जामीन याचिका फेटाळली; HC म्हणाले, “जिवाला धोका असल्याचा पुरावा...”
15
"मी स्वतःच फॉर्म भरला नाही, आता दंगलखोरांच्या पक्षासमोर...!" SIR वरून ममतांचा हल्लाबोल
16
इम्रान खानच्या तुरुंगात अडचणी आणखी वाढणार! पाकिस्तानने २४ तासात घेतले ५ मोठे निर्णय
17
"'मी गोमांस खातो, कोण मला अडवतं?', म्हणणाऱ्या मंत्र्यासोबत अमित शाह जेवताहेत, हिम्मत असेल तर...!"; उद्धव ठाकरे यांचं थेट आव्हान
18
T20 World Cup 2026 Tickets Live: ICC चा ऐतिहासिक निर्णय! फक्त १०० रुपयांत बूक करा वर्ल्ड कपचं तिकीट
19
"खुर्चीसाठी स्वत:चं पायपुसणं करून घेणाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांवर बोलू नये"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर पलटवार
20
IND vs SA 2nd T20I : अखेर सूर्या भाऊनं डाव साधला! टॉसचा बॉस होण्यासाठी यावेळी आजमावला हा फंडा
Daily Top 2Weekly Top 5

“...तर काँग्रेसची स्थिती MIMसारखी होईल, सनातनविरोध महागात पडला”: आचार्य प्रमोद कृष्णम

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2023 15:04 IST

Congress Acharya Pramod Krishnam: काँग्रेसमधील काही नेते पक्षाचा चुकीच्या मार्गावर नेत आहेत, त्यांना बाहेरचा रस्ता दाखवायला हवा, असे मत आचार्य प्रमोद कृष्णम यांनी व्यक्त केले आहे.

Congress Acharya Pramod Krishnam: हा काँग्रेसचा पराभव नाही. गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसमध्ये असे नेते सामील झाले आहेत, ज्यांचा प्रभाव पक्षात जास्त आहे. महत्त्वाच्या निर्णयात त्यांची भूमिका महत्त्वाची आहे. त्यामुळे काँग्रेसची ओळख आता सनातनविरोधी म्हणून होऊ लागली आहे. ही दुर्दैवाची गोष्ट आहे. काँग्रेसने अशा नेत्यांना बाहेरचा रस्ता दाखवला नाही, तर पक्षाची अवस्था एमआयएम पक्षासारखी होईल, असे स्पष्ट मत काँग्रेस नेते आचार्य प्रमोद कृष्णम यांनी व्यक्त करत पक्षाला घरचा आहेर दिला आहे. 

मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये काँग्रेस मोठ्या फरकाने पिछाडीवर असल्याचे चित्र आहे. सुरुवातीचे कल पाहता या तीनही राज्यात भाजप स्पष्ट बहुमताजवळ आहे. तर तेलंगणमध्ये बीआरएस पक्षाला धक्का देत, काँग्रेस सरकार स्थापन करणार असल्याचे दिसत आहे. यावर आचार्य प्रमोद कृष्णम यांनी पक्षातील काही नेत्यांना जबाबदार धरले असून, या नेत्यांना पक्षातून काढले पाहिजे, असे म्हटले आहे. 

काँग्रेसच्या नेतृत्वाला यावर गंभीरपणे विचार करावा लागेल

काँग्रेस पक्षात आलेल्या काही नेत्यांनी पक्षाला डाव्या विचारसरणीकडे नेले आहे. महात्मा गांधी यांचा काँग्रेस पक्ष वेगळ्या वाटेवर जाऊ लागला आहे. महात्मा गांधींच्या सभेची सुरुवात ‘रघुपती राघव राजाराम, पतीत पावन सीताराम’ या ओळींनी व्हायची. आज त्या काँग्रेसला सनातन धर्माच्या विरोधी पक्ष म्हणून ओळखले जाऊ लागले आहे. हे दुर्दैवी आहे. काँग्रेसने अशा नेत्यांना वेळीच बाजूला केले नाही तर काँग्रेसचे अवस्था लवकरच एमआयएम या पक्षासारखी होईल. काँग्रेसच्या नेतृत्वाला यावर गंभीरपणे विचार करावा लागेल, असा सल्लाही आचार्यांनी दिला आहे. 

सनातन धर्माच्या विरोधामुळे पक्ष बुडाला

काँग्रेसला महात्मा गांधी, पंडित नेहरू, इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांची काँग्रेस राहू द्यावे लागेल. काँग्रेसला मार्क्सच्या विचारांवर जे नेते नेऊ पाहत आहेत. त्यांना लवकर बाजूला करावे लागेल. भारत भावनाप्रधान देश आहे. सनातन धर्माच्या विरोधामुळे पक्ष बुडाला. जातीवादाच्या राजकारणाला या देशाने कधीही स्वीकारले नाही, असे आचार्य प्रमोद कृष्णम यांनी म्हटले आहे. 

दरम्यान, ६ सप्टेंबर १९९० रोजी माजी पंतप्रधान दिवंगत राजीव गांधी यांनी संसदेत भाषण केले. ते एकदा सर्वांनी ऐकले पाहिजे. हा देश जर जातीयवादी असता तर माजी पंतप्रधान व्हिपी सिंह यांना घरोघरी पुजले गेले असते. त्यांनी मंडल आयोगाची अंमलबजावणी करून जातीचे कार्ड खेळले. त्यांच्यापेक्षा मोठा जातीवादी नाही. पण त्यांची अवस्था काय झाली? हे देशाने पाहिले. आम्ही सनातन धर्माचा विरोध केल्यामुळे पराभूत झालो, हे तथ्य आहे. ज्या राज्यात काँग्रेसचा पराभव झाला आहे, त्या राज्यातील प्रभारींनी तत्काळी राजीनामा द्यावा, अशी मागणीही आचार्य प्रमोद कृष्णम यांनी केली. 

 

टॅग्स :congressकाँग्रेसResult Day Assembly Electionनिकाल दिवस विधानसभा निवडणूक