शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
3
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
4
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
5
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
6
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
7
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
8
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
9
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
10
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
11
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
12
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
13
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
14
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
15
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
16
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
17
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
18
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
19
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
20
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेस करणार गरिबीवर सर्जिकल स्ट्राइक; राहुल गांधी यांची ग्वाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2019 05:25 IST

देशातील गरिबीवर काँग्रेस सर्जिकल स्ट्राइक करणार असल्याचे काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी मंगळवारी येथे जाहीर केले. गरिबी कायमची नष्ट करण्याच्या योजनेचा आराखडा बनविण्यासाठी काँग्रेस गेल्या सहा महिन्यांपासून काम करत आहे, असेही त्यांनी सांगितले.

जयपूर : देशातील गरिबीवर काँग्रेस सर्जिकल स्ट्राइक करणार असल्याचे काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी मंगळवारी येथे जाहीर केले. गरिबी कायमची नष्ट करण्याच्या योजनेचा आराखडा बनविण्यासाठी काँग्रेस गेल्या सहा महिन्यांपासून काम करत आहे, असेही त्यांनी सांगितले. तसेच प्रत्येक गरिबाच्या खात्यात दरमहा ६ हजार रुपये जमा होतीलच असे ते म्हणाले. याचाच अर्थ १२ हजार रुपयांहून कमी मासिक उत्पन्न असणाऱ्यांच्या खात्यात दरमहा ६ हजार रुपये होतीलच.काँग्रेस सत्तेवर आल्यास देशातील सर्वात गरीब पाच कोटी कुटुंबांना वर्षाला ७२ हजार रुपये देणारी न्यूनतम आय योजना (न्याय योजना) राहुल गांधी यांनी सोमवारी जाहीर केली . त्यानंतर आज राजस्थानमधील सुरजगढ येथील सभेत ते म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या राजवटीत फक्त श्रीमंत लोकच भरभराटीची स्वप्ने पाहू शकतात. काँग्रेसच या देशातील गरिबी कायमची नष्ट करेल. न्याय योजना म्हणजे एक प्रकारचा ‘धमाका' असून अशा पद्धतीची ऐतिहासिक योजना आजवर जगातील एकाही देशाने राबविलेली नाही. न्याय योजना लागू झाल्यास भारतात एकही माणूस गरीब राहाणार नाही. राहुल गांधी म्हणाले की, आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेस सत्तेत आल्यास आम्ही बेकारीचे प्रमाण कमी करण्याचे कसोशीने प्रयत्न करू. जर नरेंद्र मोदी श्रीमंतांनाच पैसे देत असतील, तर काँग्रेस गरीबांना पैसे देईल. ज्यांच्याकडे खूप काळा पैसा आहे अशांनाच मोदी यांनी मदत केली आहे. यूपीए सरकारने ज्यांना दारिद्र्य रेषेखालून वर आणले त्यांनाच पुन्हा गरीब करण्याचे काम गेल्या पाच वर्षांत मोदींनी केले आहे. यूपीए सरकारच्या काळात १४ कोटी लोकांना दारिद्र्याच्या शापातून मुक्त करण्यात आले होते असा दावा त्यांनी केला होता. (वृत्तसंस्था)मोदी अंबानींचे चौकीदारराहुल गांधी म्हणाले की, भारतामध्ये अजूनही २५ कोटी लोक दारिद्र्य रेषेखालील जीवन जगत आहेत, ही अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे. काँग्रेसच्या हाती सत्ता आल्यानंतर प्रत्येकाला योग्य मजुरी व उत्पादनाला रास्त भाव मिळेल. यूपीए सरकारने दहा वर्षांच्या कारकिर्दीत राबविलेल्या योजना मोदींनी बंद केल्या. मनरेगा या मोठ्या प्रमाणावर रोजगार देणाऱ्या योजनेचे महत्त्व पंतप्रधानांच्या लक्षातच आले नाही. मोदी हे उद्योगपती अनिल अंबानी यांचे चौकीदार आहेत.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक