शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
2
कृषिमंत्री कोकाटे किती मिनिटे रमी खेळत होते?, विधिमंडळ चौकशी अहवालात उघड, रोहित पवारांचा दावा
3
दोन मोर्चांवर वेगळे लढले...! विरूच्या निधनानंतर महिन्याभराने जयनेही प्राण सोडले; गीरचे जंगल आता त्यांच्या मैत्रीच्या गोष्टी सांगणार...
4
"हा माझा नवरा"; इन्स्पेक्टरच्या मृत्यूनंतर हायव्होल्टेज ड्रामा; मृतदेहासाठी २ बायका भिडल्या, अखेर...
5
NSDL IPO: ८०० रुपये प्राईज बँड, १२७ रुपये GMP; LIC नं केली गुंतवणूक, तुमचा विचार काय?
6
सलमान खानला भेटण्यासाठी ३ अल्पवयीन मुलांनी केला मोठा कांड; २ राज्यांची पोलीस झाली हैराण
7
रश्मिका मंदानाची कॉपी? छत्रपती संभाजीनगरची लेक, विजय देवरकोंडासोबत करणार रोमान्स
8
'ऑपरेशन महादेव'नंतर आता 'ऑपरेशन शिवशक्ती' सुरू! भारतीय सैन्याने दोन दहशतवाद्यांना घातलं कंठस्नान
9
थंडबस्त्यात गेला अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' सिनेमा, रेणुका शहाणे म्हणाल्या - "मला धक्काच बसला.."
10
कमाल! स्मार्टफोन App द्वारे आतड्यांतील बॅक्टेरियावर नियंत्रण, आली ओरल कॅप्सूल, कसा होणार फायदा?
11
Kamchatka Earthquake: ५ जुलैचे भविष्य ३० जुलैला खरे होणार? रशियातील भुकंपाच्या उंच लाटा जपानच्या किनाऱ्यावर धडकू लागल्या...
12
"दीड लाख देऊन इथं आलोय, मला बोलू द्या..."; संसदेत हजेरी लावणं खासदार राशीद यांना इतकं महाग का पडलं?
13
Reliance Jio ची आपल्या ग्राहकांना मोठी भेट; फक्त ₹५९९ मध्ये घरच्या TV ला बनवा कॉम्प्यूटर
14
PM किसान योजनेचा २० वा हप्ता जाहीर! २००० रुपये थेट बँक खात्यात, लगेच 'असं' तपासा तुमचं नाव!
15
भीक मागणाऱ्या व्यक्तीच्या दोन बायका, आता त्याची तक्रार तर ऐका; कलेक्टरकडे पोहोचला अन् म्हणाला...
16
Pranjal Khewalkar Arrest : मोबाईलमधून हाऊस पार्टीतील महिलांशी केलेली चॅटिंग व पार्टीचे व्हिडिओ सापडले
17
UPI मध्ये १ ऑगस्टपासून होणार बदल; बॅलन्स चेक ते ऑटो-पे पर्यंत सर्वकाही बदलणार, पाहा तुमच्यासाठी काय नवं?
18
Sonam Raghuvanshi : बेवफा सोनमवर चित्रपट येणार, 'हे' नाव असणार; दिग्दर्शकाने घेतली राजा रघुवंशीच्या भावाची भेट
19
Share Market Today: तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात; Sensex १९० अंकांपेक्षा जास्त वधारला, 'या' शेअर्समध्ये तेजी
20
शेजारी राहणाऱ्या महिलेवर केले वार, गुप्तांगावरही ओरबाडलं अन् जंगलात फेकून दिलं! तरुण का झाला हैवान?

मुख्य निवडणूक आयुक्तांच्या नियुक्ती प्रक्रियेवरून संघर्ष; कोर्ट निर्णय देणार असताना घाई का? काँग्रेसचा प्रश्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2025 05:18 IST

मुख्य निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीच्या प्रक्रियेवर काँग्रेसने प्रश्न उपस्थित केले आहेत.

आदेश रावल

नवी दिल्ली : मुख्य निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीच्या प्रक्रियेवर काँग्रेसने प्रश्न उपस्थित केले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची सोमवारी बैठक झाली. या बैठकीनंतर लगेचच काँग्रेसचे कोषाध्यक्ष अजय माकन आणि काँग्रेसचे राज्यसभा सदस्य अभिषेक मनू सिंघवी यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितले की, या प्रकरणाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असून १९ फेब्रुवारीला सर्वोच्च न्यायालय त्यावर निर्णय देणार आहे.

केंद्र सरकारने एक नियम केला होता. यात मुख्य निवडणूक आयुक्तांना निवडण्याच्या प्रक्रियेतून सरन्यायाधीशांना बाजूला ठेवले होते. यानंतर राहुल गांधी यांनी संसदेतही या विषयावर अनेक प्रश्न उपस्थित केले होते. केंद्र सरकारच्या या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देखील देण्यात आले आहे.

राहुल गांधी आणि काँग्रेसचे असे म्हणणे आहे की, सरन्यायाधीशांना या समितीतून बाजूला ठेवल्याने ही समिती कमकुवत झाली आहे. आता सरकार त्यांच्या इच्छेनुसार निर्णय घेईल.

ज्ञानेश कुमार नवे मुख्य निवडणूक आयुक्त

निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांची नवे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून सोमवारी रात्री उशिरा नियुक्ती करण्यात आली. याचबरोबर १९८९ च्या बॅचचे व हरियाणा कॅडरचे आयएएस अधिकारी विवेक जोशी यांची निवडणूक आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली. विधि मंत्रालयाने ही माहिती दिली आहे.

ज्ञानेश कुमार हे नवीन कायद्यानुसार नियुक्ती होणारे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त असतील. ज्ञानेश कुमार यांना मागील वर्षी मार्च महिन्यात निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्त करण्यात आले होते. ते आता मावळते मुख्य निवडणूक आयुक्त राजीवकुमार यांची जागा घेतील.

सरकारने साेमवारची बैठक स्थगित करायला हवी हाेती...

आव्हान याचिकेवर तीन वेळा सुनावणी झाली असून सर्वाेच्च न्यायालय १९ रोजी निर्णय देणार आहे. सरकारने ही बैठक स्थगित करायला हवी होती, असे काँग्रेसचे म्हणणे आहे. न्यायालय १९ तारखेला कोणत्याही निष्कर्षावर पोहोचले नाही, तर केंद्र सरकारने या विषयावर लवकरात लवकर निष्कर्ष काढण्याची विनंती सर्वोच्च न्यायालयाला करायला हवी. त्यानंतरच ही बैठक घ्यायला हवी, असे काँग्रेसचे मत आहे.

टॅग्स :Election Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगElectionनिवडणूक 2024Narendra Modiनरेंद्र मोदी