शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
4
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
5
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
6
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
7
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
8
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
9
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
10
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
11
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
12
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
13
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
14
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
15
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
16
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
17
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
18
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
19
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
20
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
Daily Top 2Weekly Top 5

अविवाहित महिलांमध्ये वाढतेय कंडोमची मागणी, दहा वर्षात 6 टक्क्यांनी वाढला वापर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2018 10:33 IST

आरोग्य मंत्रालयाकडून करण्यात आलेल्या राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्व्हेक्षण 2015-16 नुसार, 15 ते 49 वर्षीय अविवाहित महिला ज्या सेक्शुअली अॅक्टिव्ह आहेत त्यांच्यात गेल्या 10 वर्षात कॉन्डमच्या वापर वाढला असून 2 टक्क्यांवरुन 12 टक्क्यांवर पोहोचला आहे

नवी दिल्ली - भारतात अविवाहित आणि सेक्शुअली अॅक्टिव्ह महिला सुरक्षित सेक्सला महत्व देत आहेत. आरोग्य मंत्रालयाकडून करण्यात आलेल्या राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्व्हेक्षण 2015-16 नुसार, 15 ते 49 वर्षीय अविवाहित महिला ज्या सेक्शुअली अॅक्टिव्ह आहेत त्यांच्यात गेल्या 10 वर्षात कंडोमचा वापर वाढला असून 2 टक्क्यांवरुन 12 टक्क्यांवर पोहोचला आहे. 20 ते 24 वर्षीय वयोगटातील सेक्शुअली अॅक्टिव्ह अविवाहित तरुणींमध्ये कंडोमचा जास्तीत जास्त वापर केला जात आहे. सर्व्हेक्षणनुसार, आठपैकी तीन पुरुषांचं म्हणणं आहे की गर्भधारणा महिलांची जबाबदारी आहे आणि याच्याशी पुरुषांचं काही देणं घेणं नाही.

कुटुंब नियोजनासाठी महिलांची नसबंदीराष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्व्हेक्षणानुसार 25 ते 49 वर्ष वयोगटातील महिला गर्भधारणा होऊ नये यासाठी नसबंदीला प्राथमिकता देत आहेत. सर्व्हेक्षणानुसार, फक्त एक टक्का महिलांनी आपण इमरजन्सी कॉन्ट्रसेप्टिव्ह पिलचा वापर केल्याचं मान्य केलं आहे. 

गर्भनिरोधकांच्या वापरात पंजाब सर्वात पुढे देशभरात गर्भनिरोधकाच्या पद्धतींचा सर्वात कमी वापर मणिपूर, बिहार आणि मेघालयात केला जातो. या राज्यांमध्ये ही टक्केवारी फक्त 24 टक्के आहे. गर्भनिरोधकांचा वापर करण्याच्या यादीत पंजाब पहिल्या क्रमांकावर असून येथे ही टक्केवारी 76 टक्के इतकी आहे. केंद्रशासित राज्यांबद्दल बोलायचं गेल्यास, 30 टक्क्यांसोबत लक्ष्यद्वीप सर्वात मागे असून चंदिगड 74 टक्क्यांसहित पहिल्या क्रमांकावर आहे. 

गोळ्यांच्या वापरात घट मात्र कंडोमच्या वापरात वाढसर्व्हेत हेदेखील समोर आलं आहे की, देशभरात अत्याधुनिक गर्भनिरोधाच्या पद्धतींचा वापर करण्यात 65 टक्क्यांसोबत शिख आणि बौद्ध धर्मातील महिला सर्वात पुढे असून, मुस्लिम महिलांमध्ये हे प्रमाणत फक्त 38 टक्के आहे. गर्भनिरोधकांच्या वापराचा संबंध आर्थिक परिस्थितीशीदेखील आहे. गरिब घरातील फक्त 36 टक्के महिला गर्भनिरोधकांचा वापर करत असताना, श्रीमंत कुटुबांमधील 53 टक्के महिला कॉन्ट्रसेप्टिव्हचा वापर करतात. राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्व्हेक्षणात एकूण 6 लाख 1 हजार 509 घरांमध्ये जाऊन मुलाखती घेण्यात आल्या. यामधील 98 टक्के लोकांनी आपल्या प्रतिक्रिया नोंदवल्या.