शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
2
Ahmedabad Plane Crash Live Updates: हृदयद्रावक! मृत्यूंचे शब्दात वर्णन करता येणार नाही; अपघातस्थळ पाहून पंतप्रधान मोदी भावुक
3
मुलाला वाचवण्यासाठी आगीशी झुंजत होती आई; अहमदाबाद विमान अपघाताचा हादरवून टाकणारा VIDEO
4
'मला माहित नाही मी कसा वाचलो', विमान अपघातात वाचलेला एकमेव प्रवासी; PM मोदींनी घेतली भेट
5
Sunjay Kapur: "या पृथ्वीवर तुमची वेळ निश्चित आहे...", मृत्यूनंतर संजय कपूर यांची 'ती' पोस्ट व्हायरल
6
अपघातग्रस्त विमान Boeing कंपनीचं होतं, माहिती समोर येताच शेअर बाजारात झाली बिकट स्थिती 
7
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
8
विशेष लेख: ‘देवा’ की ‘भाऊ’? - राज ठाकरे कुठे जाणार?
9
आजचा अग्रलेख: आकाशातील आक्रोश
10
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
11
एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानाची नुकसान भरपाई कोण देणार? इन्शुरन्स कंपनीचा नियम काय सांगतो?
12
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
13
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
14
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
15
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
16
Sunjay Kapur : एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
17
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
18
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही
19
होत्याचं नव्हतं झालं..!! विमान अपघातात जोडप्याचा मृत्यू; भावाला शेवटचा फोन, म्हणाले होते...
20
Nagpur Murder: गुटखा न देण्यावरून पेटला वाद, रागाच्या भरात मित्रालाच संपवलं, दोघांना अटक!

वारसांच्या दस्तऐवजात ज्येष्ठांना सांभाळण्याची अट- मद्रास उच्च न्यायालय

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2021 01:11 IST

दस्त नोंदणी अधिकाऱ्यांनी खात्री करून घ्यावी

खुशालचंद बाहेतीचेन्नई : ज्येष्ठ नागरिकांची मालमत्तेची मालकी आपल्या वारसांचे नावावर करणाऱ्या दस्तऐवजात वारस ज्येष्ठांच्या आवश्यक त्या गरजा पूर्ण करतील, अशी अट असल्याची खात्री दस्त नोंदणी अधिकाऱ्यांनी करावी, असे आदेश मद्रास उच्च न्यायालयाने दिले आहेत.मद्रास उच्च न्यायालयात मालमत्ता हस्तांतरणाचे करार रद्द ठरविण्याची विनंती करणाऱ्या अनेक याचिका दाखल आहेत. यापैकी बहुतेक याचिकेत ज्येष्ठ नागरिकांनी आपली मालमत्ता वारसाचे नावाने गिफ्ट डीड, विक्री किंवा अन्य प्रकारे हस्तांतरित केली आहे.

मालमत्ता मिळाल्यानंतर वारसांनी त्यांना वाऱ्यावर सोडून दिले. त्यांना ही स्वत:ची  मालमत्ता परत मिळण्यासाठी न्यायालयात याचिका दाखल कराव्या लागल्या.उच्च न्यायालयाने हस्तांतरणाच्या दस्तऐवजात ज्येष्ठ नागरिक कल्याण कायद्याच्या कलम २३मध्ये नमूदप्रमाणे मालमत्ता नावावर करून घेणारा वारसदार ज्येष्ठ नागरिकाची काळजी घेईल. 

पालकांच्या मूलभूत आणि शारीरिक गरजा पूर्ण करेल असे लिहून घ्यावे. यामुळे पुढे वारसाने याअटीचे पालन केले नाही तर दस्तऐवज फसवणूक करून किंवा चुकीची माहिती देऊन तयार करून घेतल्याच्या मुद्द्यावरून रद्द ठरवता येऊ शकेल. या शिवाय फसवणूक करून मालमत्ता हडपल्याबद्दल गुन्हा नोंदवता येऊ शकेल. मद्रास उच्च न्यायालयाने सर्व दस्त नोंदणी अधिकाऱ्यांनी ही अट असल्याची खात्री करावील, असे आदेश दिले आहेत. याच निर्णयात उच्च न्यायालयाने ज्येष्ठ नागरिक कल्याण कायद्याच्या अंमलबजावणीबद्दल महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत.

पाल्यांना दंड किंवा कारावासाची तरतूद

ज्येष्ठ नागरिक कल्याण कायद्यात वृद्ध पालकांची काळजी न घेणाऱ्या पाल्यांना दंड किंवा कारावासाची तरतूद आहे. यात शिक्षा देणाऱ्यास दंड करावा किंवा शिक्षा अशी तरतूद असली तरीही शक्यतो कारावासाची शिक्षा दिली पाहिजे व दंड दुय्यम ठरवला पाहिजे.

जोपर्यंत नाठाळ तरुणांच्या डोक्यावर शिक्षेची तलवार राहणार नाही, तोपर्यंत वृद्धाश्रमांची संख्या वाढतच राहाणार.-न्या.एस. वैद्यनाथन,मद्रास उच्च न्यायालय

टॅग्स :Chennaiचेन्नईCourtन्यायालय