शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
2
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
3
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
4
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
5
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
6
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
7
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
8
विशेष लेख: एका परिवर्तनशील, सहृदय नेतृत्वाचा अमृतमहोत्सव
9
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
10
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
11
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
12
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
13
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
14
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
15
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
16
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
17
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
18
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
19
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
20
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...

गोरक्षकांच्या हिंसाचारातील पीडितांना नुकसानभरपाई द्या - सुप्रीम कोर्ट 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2017 20:50 IST

देशातील गोरक्षकांच्या हिंसाचारात ज्या पीडित व्यक्तींचे नुकसान झाले आहे, त्यांची नुकसान भरपाई संबंधीत राज्यांनी करावी, असे सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे. यासंदर्भात दाखल करण्यात आलेल्या जनहित याचिकेवर सुनावणी करताना सुप्रीम कोर्टाने हा निर्णय दिला.  

नवी दिल्ली, दि. 22 - देशातील गोरक्षकांच्या हिंसाचारात ज्या पीडित व्यक्तींचे नुकसान झाले आहे, त्यांची नुकसान भरपाई संबंधीत राज्यांनी करावी, असे सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे. यासंदर्भात दाखल करण्यात आलेल्या जनहित याचिकेवर सुनावणी करताना सुप्रीम कोर्टाने हा निर्णय दिला.  गोरक्षकांचे हल्ले रोखण्यासाठी कोणत्या उपायोजना केल्या आहेत, याबाबत राज्य सरकारांना म्हणणे मांडण्यासाठी कोर्टाने 31 ऑक्टोंबरपर्यंत मुदत दिली आहे. तसेच, हल्ले करणा-या गोरक्षकांवर कायदेशीर कारवाई केली जावी, असेही कार्टाने म्हटले आहे. सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश न्या. दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने हा निर्णय दिला. 

सुप्रीम कोर्टाने याप्रकरणी गुजरात, राजस्थान, झारखंड, कर्नाटक आणि उत्तर प्रदेश या राज्यांना प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले होते. आज या राज्यांनी प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. तसेच अन्य राज्यांनी लवकरात लवकर प्रतिज्ञापत्र सादर करावे, असे सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे. तसेच, याप्रकरणी पुढील सुनावणी 31 ऑक्टोंबरला होणार आहे. 

दरम्यान, गोरक्षणाच्या नावाखाली गोरक्षकांकडून हिंसाचार केल्याप्रकरणी तहसीन पूनावाल यांनी याचिका दाखल केली आहे. त्यांनी याचिकेत गोरक्षक संघटनांना गोरक्षणाबाबत मिळालेल्या कायदेशीर अधिकारावर या याचिकेतून आक्षेप घेतला आहे. गोरक्षक या अधिकाराच्या माध्यमातून कायदाच हाती घेत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, गुजरात आणि कर्नाटकमध्ये असा कायदा असल्याचे त्यांनी याचिकेत म्हटले आहे. 

टॅग्स :Courtन्यायालय