शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
2
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
3
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
4
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
5
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
6
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
7
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
8
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
9
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
10
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
11
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
12
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
13
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
14
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
15
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
16
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
17
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
18
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
19
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
20
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7 लाख कोटींची कमाई

गॅझेट कुठेही दुरुस्त करा, संपणार नाही वाॅरंटी; सरकार ‘राईट टू रिपेअर’ आणणार कायदा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2022 09:20 IST

सरकारने घरगुती उपकरणे बनविणाऱ्या २३ कंपन्यांना यासंदर्भात एक पत्र लिहिले आहे.

नवी दिल्ली : यापुढे कंपन्या वस्तू विकून जबाबदारीतून मुक्त होऊ शकणार नाहीत. उपकरण खराब झाल्यास कंपन्यांना त्याची सर्व्हिसिंग करून द्यावीच लागेल. नंतर कंपनीने संबंधित वस्तूचे उत्पादन बंद केले तरी सर्व्हिसिंगच्या जबाबदारीतून कंपनीला सुटता येणार नाही. त्यासाठी सरकार ‘राईट टू रिपेअर’ कायदा आणण्याच्या तयारीत आहे.

सरकारने घरगुती उपकरणे बनविणाऱ्या २३ कंपन्यांना यासंदर्भात एक पत्र लिहिले आहे. उत्पादनांचे दुरुस्ती धोरण सामायिक करण्याच्या सूचना या पत्रात कंपन्यांना देण्यात आल्या आहेत. ग्राहक व्यवहार मंत्रालयाने हे पत्र पाठविले आहे.  तुमचे वस्तूंच्या दुरुस्तीचे धोरण काय आहे, हे कळविण्यात यावे तसेच देखभाल व दुरुस्तीसाठी येणाऱ्या खर्चाबाबतची माहिती देण्यात यावी, अशा सूचना मंत्रालयाने कंपन्यांना दिल्या आहेत. 

वॉरंटीवर काय परिणाम?‘राईट टू रिपेअर’नुसार, ग्राहकांनी उपकरणे स्वत: अथवा बाहेरच्या मेकॅनिककडून दुरुस्त केली, तरी कंपनीकडून मिळालेल्या वॉरंटीवर त्याचा परिणाम होणार नाही.भारत सरकार याबाबतीत असा नियम बनवू इच्छित आहे की, ज्यानुसार लोकांना कंपनीकडून खरेदी केलेल्या वस्तूवर नेहमी सर्व्हिस मिळत राहावी.

कंपन्यांचा नकार का ?सध्या अनेक कंपन्या नवीन पार्ट्स येण्याचे बंद झाले असल्याचे कारण देत दुरुस्तीला नकार देतात.  त्यांना दणका बसणार आहे.

असा कायदा सध्या कुठे आहे? असा कायदा आणणारा भारत हा पहिलाच देश नसून, यापूर्वी अमेरिका, ब्रिटन आणि युरोपीय देशांमध्ये हा कायदा लागू केला आहे. 

टॅग्स :Central Governmentकेंद्र सरकार