शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड यांच्या राजीनाम्याचं टायमिंग अनेकांना न पटण्यासारखे; 'त्या' ३ तासांत काय घडले?
2
एकदा- दोनदा नाही, एअर इंडियाला सहा महिन्यात ९ कारणे दाखवा नोटीस बजावल्या; सरकारची माहिती
3
जगदीप धनखड यांचा उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा; प्रकृतीच्या कारणास्तव निर्णय
4
आजचे राशीभविष्य, २२ जुलै २०२५: 'या' २ राशींसाठी लाभदायी दिवस, अचानक धनलाभ होईल
5
'आम्ही अणुकार्यक्रम सुरूच ठेवणार', युरोपीय देशांशी चर्चेपूर्वी इराणचा अमेरिकेला संदेश
6
पहिला दिवस गोंधळाचा; विरोधक झाले आक्रमक; पहलगाम हल्ला ते बिहार मतदारयादीवरून गोंधळ 
7
शाळेवर विमान कोसळून २० ठार; बांगलादेशात अहमदाबादची पुनरावृत्ती!
8
एअर इंडिया विमानाचे तीन टायर फुटले; विमानतळावर लँडिंगच्या वेळी पावसामुळे विमानाने धावपट्टी सोडली
9
मुख्यमंत्र्यांनी कोकाटेंना सुनावले; जे काही घडले ते भूषणावह नाही!
10
ब्रिगिट मॅक्रॉन ‘पुरुष’? खटले आणि वादांना ऊत! दाव्याची सत्यता काय?
11
अंधेरी मेट्रो स्थानकात गळती; पाणी गोळा करण्यासाठी बादल्यांचा वापर
12
भाजपचा नवा फॉर्म्युला; प्रत्येक आमदाराची पाच कामे होणार! पालिका निवडणुकीसाठी रणनीती
13
परिचारिकांच्या संपामुळे पाच दिवसांपासून रुग्णांचे हाल; नियमित शस्त्रक्रियाही पूर्णपणे बंद
14
विधवा महिलेस १.२० लाखात गुजरातेत विकले, दोन वर्षांनी पुत्रप्राप्तीनंतर आणून गावात सोडले!
15
सोळावे वरीस... धोक्याचे नव्हे, निवडणुकीत मत देण्याचे! ब्रिटनचा धाडसी निर्णय; युवाशक्ती लोकशाहीत सहभागी!
16
शेअर ट्रेडिंगच्या बहाण्याने वृद्धेसह पायलटला १० कोटींचा गंडा; बनावट ॲपचा वापर करून लावला चुना
17
६३ खासदार म्हणतात, न्या. वर्मांना पदावरून हटवा! कारण काय?
18
संपादकीय : नामुष्कीचा बॉम्ब, १९ वर्षांनंतरही पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह
19
विशेष लेख : कुणी काय खावे, याच्याशी सरकारचा काय संबंध?
20
महाराष्ट्रातील ४ लाख शेतकरी लाभार्थी यादीतून झाले गायब; लाभार्थी १०.२ लाखांवरून केवळ १५ हजारांवर

सिमी संशयितांच्या एन्काउंटरचे राजकारण सुरू

By admin | Updated: November 2, 2016 06:49 IST

मध्यवर्ती कारागृहातून सिमीच्या आठ अतिरेक्यांचे पळून जाणे आणि त्यानंतर काही तासांतच पोलीस चकमकीत ते ठार होणे, याबद्दल संशय व्यक्त केला जात असून, त्यावर आता देशभर राजकारण सुरू झाले आहे.

भोपाळ : येथील मध्यवर्ती कारागृहातून सिमीच्या आठ अतिरेक्यांचे पळून जाणे आणि त्यानंतर काही तासांतच पोलीस चकमकीत ते ठार होणे, याबद्दल संशय व्यक्त केला जात असून, त्यावर आता देशभर राजकारण सुरू झाले आहे.पोलिसांची चकमक खरी होती का, याविषयीच काँग्रेस, मार्क्सवादी कम्युनिस्ट, मजलिस-ए-मुसलमीन तसेच बहुजन समाज पार्टीच्या नेत्यांनी शंका उपस्थित केली आहे. या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करण्यात यावी, अशी मागणीही या नेत्यांनी केली आहे. चकमकीचा जो व्हिडीओ प्रसारित झाला आहे, त्यामुळे अधिकच संशय बळावला आहे. ते आठही जण शरण येण्यास तयार असताना त्यांना ठार करण्यात आले, असे त्यातून दिसत आहे. भाजपा व मध्य प्रदेश सरकारने मात्र या आरोपांचा इन्कार केला आहे. पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक करण्याऐवजी त्यांच्या कारवाईबद्दल विरोधी पक्षांनी याप्रकारे शंका घेणे चुकीचे आहे, असे केंद्रीय गृह राज्यमंत्री किरेन रिजिजू यांनी म्हटले आहे. या अतिरेक्यांनी पळून जाताना तुरुंगातील एका पोलिसाचीही हत्या केली होती.