शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

गणेश विसर्जन मिरवणुकीला गालबोट; दोन गटांत राडा, दगडफेक-जाळपोळीच्या घटनेनंतर तणाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2024 08:47 IST

समाजकंटकांकडून काही दुकाने आणि वाहने जाळण्यात आली.  या ठिकाणी तणाव वाढल्यामुळे पोलिसांनी कलम १४४ लागू केलं असून वरिष्ठ पोलीस अधिकारी देखील घटनास्थाळी दाखल झाले आहेत.

सध्या देशात गणेशोत्सवाची धामधूम सुरू आहे. दरम्यान कर्नाटकात गणेशोत्सवाला गालबोट लागल्याची घटना घडली आहे. कर्नाटकातील मांड्या येथे गणेश विसर्जनाच्यावेळी दोन समुदायांच्या लोकांमध्ये वाद झाला आणि हिंसाचाराची घटना घडली. यावेळी दगडफेक, तोडफोड, जाळपोळ अशा घटनांमुळे परिस्थिती तणावपूर्ण झाली. समाजकंटकांकडून काही दुकाने आणि वाहने जाळण्यात आली. 

ही घटना बुधवारी रात्री म्हैसूर रोडवरील दर्ग्याजवळ घडली. गणेश विसर्जनाच्यावेळी दगडफेक आणि हिंसक हाणामारी झाल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला. या दगडफेकीनंतर काही लोकांनी हिंसा करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करत पोलीस ठाण्याजवळ रात्रभर निदर्शने केली. तसेच, दगडफेक आणि मारामारीत एका पोलिसासह काही जण जखमी झाल्याचं सांगण्यात येत आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच, पोलिसांनी कलम १४४ लागू केलं असून वरिष्ठ पोलीस अधिकारी देखील घटनास्थाळी दाखल झाले आहेत.

नेमकं काय घडलं?बदरिकोप्पलु गावातील तरुण बुधवारी गणपतची विसर्जन मिरवणूक काढत होते. यावेळी मिरवणूक नागमंगलाच्या म्हैसूर रोडवरील दर्ग्याजवळून काढण्यावरून दोन गटातील तरुणांमध्ये बाचाबाची झाली. यामुळे वातावरण बिघडलं आणि वाद वाढला. याचवेळी काही समाजकंटकांनी दुकानांची तोडफोड केली आणि वाहने पेटवली. यानंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. तसेच, जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना सौम्य बळाचा वापर करावा लागला. तर संतापलेल्या लोकांनी पोलीस ठाण्यात आंदोलन करत या प्रकरणात जबाबदार असलेल्या लोकांना अटक करावी अशी मागणी केली.

सूरतमध्येही असाच प्रकार घडला होतागुजरातच्या सूरतमध्येही असाच प्रकार घडला होता. सूरतमध्ये एका गणपती मंडपावर समाजकंटकांनी दगडफेक केली होती. या घटनेनंतर संतापलेले लोक रस्त्यावर उतरले होते. लोकांनी कारवाईची मागणी करत पोलीस ठाण्याला घेराव घातला होता. पोलिसांनी या प्रकरणात सहा जणांना अटक केली होती. त्यानंतर आणखी २७ जणांनाही अटक करण्यात आली होती.

टॅग्स :Karnatakकर्नाटकGanesh Mahotsavगणेशोत्सव 2024