शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

टीआरपी प्रणालीकडे लक्ष देण्यासाठी समिती, केंद्राचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2020 02:09 IST

TRP system : माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने बुधवारी पत्रक काढून नवी समिती स्थापन केल्याची घोषणा केली.

नवी दिल्ली : टीआरपी घोटाळ्याची चर्चा सुरू असतानाच आता केंद्र सरकारने टीआरपी प्रणालीवर लक्ष देण्यासाठी नव्या समितीची नियुक्ती केली आहे. प्रसारभारतीचे सीईओ शशी शंकर वेम्पती यांच्या अध्यक्षतेखालील चार सदस्यांची ही समिती सध्या अस्तित्वात असलेल्या टीआरपी यंत्रणेचा अभ्यास करून विश्वासार्ह आणि पारदर्शी यंत्रणा उभारण्यासंदर्भातील शिफारशी करेल. मात्र, केंद्राने नेमलेल्या या समितीला न्यूज ब्रॉडकास्टर्स फेडरेशनने (एनबीएफ) आक्षेप घेतला आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने बुधवारी पत्रक काढून नवी समिती स्थापन केल्याची घोषणा केली. वेम्पती यांच्या अध्यक्षतेखालील या समितीत आयआयटी कानपूरचे संख्याशास्त्राचे प्राध्यापक शलभ, डीओटीचे कार्यकारी संचालक राजकुमार उपाध्याय आणि बंगळुरूतील आयआयएमचे प्राध्यापक पुलक घोष यांचा समावेश आहे. पत्रकारांसंदर्भातील गंभीर आरोपांची चौकशी करण्यासाठी देशपातळीवर निष्पक्ष यंत्रणा केंद्र सरकारने उभारावी, अशी मागणी एनबीएफने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे. विशेष म्हणजे, एनबीएफ ही संस्था रिपब्लिक टीव्हीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांनी गेल्या वर्षी स्थापन केली आहे आणि कथित टीआरपी घोटाळ्यात मुंबई पोलिसांकडून रिपब्लिक टीव्हीचीही चौकशी सुरू आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर, कायदामंत्री रविशंकर प्रसाद, पंतप्रधानांचे प्रधान सचिव प्रमोद कुमार मिश्रा, गृह आणि माहिती आणि प्रसारण खात्याचे सचिव यांनाही या पत्राची प्रत पाठविण्यात आली आहे.  

राज्य सरकार, पोलिसांचा दबाव गेल्या काही दिवसांत राज्य सरकारांकडून आणि पोलीस विभागाकडून सातत्याने टीव्ही न्यूज चॅनल्सवर दबाव आणला जात आहे, त्यात केंद्र सरकारने तात्काळ हस्तक्षेप करावा, अशी मागणी या पत्रातून करण्यात आली आहे. यासाठी गेल्या काही आठवड्यांतील दाखलेही पत्रात नमूद करण्यात आले आहेत. महाराष्ट्र सरकारने रिपब्लिक टीव्ही आणि त्यांचे हिंदी चॅनल आर भारत यांना सूडबुद्धीची वागणूक दिली. तसेच ओडिशा सरकारने तेथील ओटीव्हीची छळवणूक केली. तर आंध्र प्रदेश सरकारनेही टीव्ही ५ विरोधात पोलीस कारवाई केली, अशा अनेक उदाहरणांचा उल्लेख पत्रात करण्यात आला आहे. 

टॅग्स :TRP Scamटीआरपी घोटाळाtrp ratingटीआरपी