शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात आजपासून आचारसंहिता? निवडणूक आयोग दुपारी ४ वाजता घोषणा करणार
2
'घराणेशाहीचे राजकारण लोकशाहीसाठी घातक', गांधी कुटुंबाचे नाव घेत शशी थरुरांचे मोठे वक्तव्य
3
आता सरकारी कार्यालयात खेटे घालण्याची गरज नाही; घरबसल्या मिळेल जीवन प्रमाणपत्र
4
Sandeep Deshpande : "खास अशिशुद्दीन यांच्यासाठी..."; भाजपा नेत्यांचा फोटो शेअर करत मनसेचं 'व्होट जिहाद'ला प्रत्युत्तर
5
MHADA Lottery: पुणेकरांसाठी सुवर्णसंधी! 'म्हाडा'च्या लॉटरीत वाकड-हिंजवडीत फक्त २८ लाखांत घर; ६० लाखांची थेट बचत!
6
त्रिपुरी पौर्णिमा २०२५: त्रिपुरी पौर्णिमेला 'या' राशींवर लक्ष्मीकृपा; व्यापारात लाभ; मालमत्ता खरेदीचे योग
7
रोहित आर्या प्रकरणावर अभिनेता आस्ताद काळेने व्यक्त केला संशय, पोस्ट करत म्हणाला...
8
आता त्यांचे मोजकेच दिवस उरलेत, या देशाच्या राष्ट्रपतींना ट्रम्प यांची उघड धमकी   
9
हवाई प्रवाशांसाठी मोठी बातमी; अतिरिक्त शुल्काशिवाय विमान तिकिटे रद्द करता येणार, कंपन्यांची मनमानी थांबणार!
10
Harmanpreet Kaur: "हरमनप्रीत कौरला कर्णधारपदाच्या ओझ्यातून मुक्त करा", माजी क्रिकेटपटूची मागणी चर्चेत!
11
कारच्या बंद दरवाजात गुदमरले जीव, ५ जणांचा मृत्यू; Tesla कारविरोधात खटला दाखल, काय आहे प्रकरण?
12
Ladki Bahin Yojana: मेसेजची रिंग वाजली? लाडकी बहीण योजनेचे आज पैसे येणार; eKYC न केलेल्या महिलांचे काय?
13
लाडकी बहीण योजना ज्यांनी राबविली, ते म्हणाले 'आम्ही कर्जात आहोत'; MSP वेळी हात वर केले, केंद्राला पत्र
14
"सांगा, ही मतचोरी आहे की व्होट जिहाद?"; भाजपाचा विरोधी पक्षांना खोचक सवाल, दिली आकडेवारी
15
शनी ग्रहाच्या चंद्राने केमिस्ट्रीला देखील फेल केले; तेल आणि पाणी...
16
ट्रम्प यांच्या धमक्यांचा परिणाम; रशियाकडून भारताला होणारा तेल पुरवठा झाला कमी, नव्या पुरवठादाराचा शोध घ्यावा लागणार?
17
वर्षभरापासून सेलिनाचा भाऊ दुबईच्या तुरुंगात कैद, भारत सरकारकडे मागितली मदत; प्रकरण काय?
18
हर'मन' जीत लिया! Will to Win मुळे जगज्जेतेपदाचं स्वप्न साकार, आता थांबायचं नाय...
19
५० लाखांचं पॅकेज असूनही दुःखी; कितीही कमावले तरी 'ते पुरेसे' का वाटत नाही? चार्टर्ड अकाउंटंटची पोस्ट Viral!
20
Tejashwi Yadav : "प्रत्येक महिलेला ३० हजार, शेतकऱ्यांना बोनस, मोफत वीज..."; तेजस्वी यादव यांच्या मोठ्या घोषणा

आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2025 06:48 IST

आज कमांडो तैनात केले, कुणी सीआयएसएफ असल्याचे सांगत आहेत. या कमांडोंनी सदस्यांना सभागृहातील कर्मचाऱ्यांना भेटण्यास मज्जाव केला, असे काँग्रेसने म्हटले आहे.

नवी दिल्ली : बिहार मतदारयाद्या पुनरावलोकनावरून संसदेच्या दोन्ही सभागृहांत सुरू असलेल्या गदारोळाच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी राज्यसभेत सरकारविरुद्ध आक्रमक सदस्यांना रोखण्यासाठी थेट कमांडो बोलावण्यात आल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. हा लोकशाहीच्या इतिहासातील काळा दिवस असल्याचे काँग्रेस खासदार प्रमोद तिवारी म्हणाले.

‘आज कमांडो तैनात केले, कुणी सीआयएसएफ असल्याचे सांगत आहेत. या कमांडोंनी सदस्यांना सभागृहातील कर्मचाऱ्यांना भेटण्यास मज्जाव केला’, असे तिवारी म्हणाले. विरोधी पक्षातील महिला सदस्यांना या जवानांनी बळाचा वापर करून रोखल्याचा आरोपही विरोधी पक्षातील सदस्यांनी केला आहे.

मंत्री रिजिजूंचे स्पष्टीकरण

स्पष्टीकरण देताना सांसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी नमूद केले की, जे खासदार अत्यंत आक्रमक होते आणि बळजबरी सभापतींच्या आसनासमोर येण्याचा प्रयत्न करीत होते त्यांनाच जवानांनी रोखले. 

उपाध्यक्षांना खरगे यांचे पत्र

कमांडो तैनात करण्याचा निषेध करून राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी सभागृहाचे उपाध्यक्ष हरिवंश यांना पत्र लिहून हा प्रकार आक्षेपार्ह असल्याचे म्हटले आहे.

लोकसभेत पुन्हा ‘बिहार’, सोमवारपर्यंत तहकूब

बिहारमधील मतदारयाद्या पुनरावलोकनावरून संसदेत गदरोळ कायम आहे. विरोधी पक्षाचे सदस्य सभापतींच्या आसनासमोर एकत्रित आले. ‘एसआयआर’चा निर्णय मागे घ्यावा म्हणून या सदस्यांनी घोषणाबाजी सुरू केली. यावेळी काही सदस्यांनी बॅनरही फडकावले. इंडिया आघाडीच्या घटक पक्षांनी शुक्रवारीही संसदेबाहेर मकरद्वारवर निदर्शने केली. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी यावेळी उपस्थित होते.

 

टॅग्स :Monsoon Session Of Parliamentसंसेदेचे पावसाळी अधिवेशनlok sabhaलोकसभाParliamentसंसदcongressकाँग्रेस