शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2025 06:48 IST

आज कमांडो तैनात केले, कुणी सीआयएसएफ असल्याचे सांगत आहेत. या कमांडोंनी सदस्यांना सभागृहातील कर्मचाऱ्यांना भेटण्यास मज्जाव केला, असे काँग्रेसने म्हटले आहे.

नवी दिल्ली : बिहार मतदारयाद्या पुनरावलोकनावरून संसदेच्या दोन्ही सभागृहांत सुरू असलेल्या गदारोळाच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी राज्यसभेत सरकारविरुद्ध आक्रमक सदस्यांना रोखण्यासाठी थेट कमांडो बोलावण्यात आल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. हा लोकशाहीच्या इतिहासातील काळा दिवस असल्याचे काँग्रेस खासदार प्रमोद तिवारी म्हणाले.

‘आज कमांडो तैनात केले, कुणी सीआयएसएफ असल्याचे सांगत आहेत. या कमांडोंनी सदस्यांना सभागृहातील कर्मचाऱ्यांना भेटण्यास मज्जाव केला’, असे तिवारी म्हणाले. विरोधी पक्षातील महिला सदस्यांना या जवानांनी बळाचा वापर करून रोखल्याचा आरोपही विरोधी पक्षातील सदस्यांनी केला आहे.

मंत्री रिजिजूंचे स्पष्टीकरण

स्पष्टीकरण देताना सांसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी नमूद केले की, जे खासदार अत्यंत आक्रमक होते आणि बळजबरी सभापतींच्या आसनासमोर येण्याचा प्रयत्न करीत होते त्यांनाच जवानांनी रोखले. 

उपाध्यक्षांना खरगे यांचे पत्र

कमांडो तैनात करण्याचा निषेध करून राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी सभागृहाचे उपाध्यक्ष हरिवंश यांना पत्र लिहून हा प्रकार आक्षेपार्ह असल्याचे म्हटले आहे.

लोकसभेत पुन्हा ‘बिहार’, सोमवारपर्यंत तहकूब

बिहारमधील मतदारयाद्या पुनरावलोकनावरून संसदेत गदरोळ कायम आहे. विरोधी पक्षाचे सदस्य सभापतींच्या आसनासमोर एकत्रित आले. ‘एसआयआर’चा निर्णय मागे घ्यावा म्हणून या सदस्यांनी घोषणाबाजी सुरू केली. यावेळी काही सदस्यांनी बॅनरही फडकावले. इंडिया आघाडीच्या घटक पक्षांनी शुक्रवारीही संसदेबाहेर मकरद्वारवर निदर्शने केली. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी यावेळी उपस्थित होते.

 

टॅग्स :Monsoon Session Of Parliamentसंसेदेचे पावसाळी अधिवेशनlok sabhaलोकसभाParliamentसंसदcongressकाँग्रेस