शहरं
Join us  
Trending Stories
1
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
2
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
3
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
4
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
5
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
6
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
7
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
8
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
9
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
10
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
11
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
12
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
13
Nagpur Rains : अंदाज खरा ठरला ! मुसळधार पावसाने नागपूरकरांना झाेडपले; अजून किती दिवस असाच बरसणार?
14
Shalarth ID Scam : 'ते' ६३२ शिक्षक, मुख्याध्यापक तुरुंगात जाणार? शिक्षण क्षेत्रातील सर्वात माेठा घोटाळ्याची झाडाझडती सुरु
15
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
16
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
17
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
18
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
19
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
20
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?

आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2025 06:48 IST

आज कमांडो तैनात केले, कुणी सीआयएसएफ असल्याचे सांगत आहेत. या कमांडोंनी सदस्यांना सभागृहातील कर्मचाऱ्यांना भेटण्यास मज्जाव केला, असे काँग्रेसने म्हटले आहे.

नवी दिल्ली : बिहार मतदारयाद्या पुनरावलोकनावरून संसदेच्या दोन्ही सभागृहांत सुरू असलेल्या गदारोळाच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी राज्यसभेत सरकारविरुद्ध आक्रमक सदस्यांना रोखण्यासाठी थेट कमांडो बोलावण्यात आल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. हा लोकशाहीच्या इतिहासातील काळा दिवस असल्याचे काँग्रेस खासदार प्रमोद तिवारी म्हणाले.

‘आज कमांडो तैनात केले, कुणी सीआयएसएफ असल्याचे सांगत आहेत. या कमांडोंनी सदस्यांना सभागृहातील कर्मचाऱ्यांना भेटण्यास मज्जाव केला’, असे तिवारी म्हणाले. विरोधी पक्षातील महिला सदस्यांना या जवानांनी बळाचा वापर करून रोखल्याचा आरोपही विरोधी पक्षातील सदस्यांनी केला आहे.

मंत्री रिजिजूंचे स्पष्टीकरण

स्पष्टीकरण देताना सांसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी नमूद केले की, जे खासदार अत्यंत आक्रमक होते आणि बळजबरी सभापतींच्या आसनासमोर येण्याचा प्रयत्न करीत होते त्यांनाच जवानांनी रोखले. 

उपाध्यक्षांना खरगे यांचे पत्र

कमांडो तैनात करण्याचा निषेध करून राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी सभागृहाचे उपाध्यक्ष हरिवंश यांना पत्र लिहून हा प्रकार आक्षेपार्ह असल्याचे म्हटले आहे.

लोकसभेत पुन्हा ‘बिहार’, सोमवारपर्यंत तहकूब

बिहारमधील मतदारयाद्या पुनरावलोकनावरून संसदेत गदरोळ कायम आहे. विरोधी पक्षाचे सदस्य सभापतींच्या आसनासमोर एकत्रित आले. ‘एसआयआर’चा निर्णय मागे घ्यावा म्हणून या सदस्यांनी घोषणाबाजी सुरू केली. यावेळी काही सदस्यांनी बॅनरही फडकावले. इंडिया आघाडीच्या घटक पक्षांनी शुक्रवारीही संसदेबाहेर मकरद्वारवर निदर्शने केली. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी यावेळी उपस्थित होते.

 

टॅग्स :Monsoon Session Of Parliamentसंसेदेचे पावसाळी अधिवेशनlok sabhaलोकसभाParliamentसंसदcongressकाँग्रेस