शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
8
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

'कमांडो' कुत्रा करणार नामिबियातून आणलेल्या आठ चित्त्यांचे रक्षण

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2022 19:59 IST

नामिबियातून आणलेल्या आठ चित्त्यांचे रक्षण 'कमांडो' कुत्रा करणार आहे. 

नवी दिल्ली : देशात 17 सप्टेंबर रोजी आफ्रिकेतील देश नामिबियातून 8 चित्ते आणण्यात आले. भारताच्या भूमीवर तब्बल 74 वर्षांनंतर चित्ता प्राणी वावरत आहेत. 74 वर्षांपूर्वी चित्ता प्राणी भारतातून नामशेष झाला होता. नामिबियातून आणलेले हे आठ चित्ते मध्य प्रदेशातील श्योपूर येथील कुनो राष्ट्रीय उद्यानात सोडण्यात आले आहेत. सन 1952 मध्ये भारत देशातून चित्ता नामशेष झाल्याचे सरकारकडून घोषित करण्यात आले होते. चित्ता नामशेष झाल्यानंतर भारतीय गवताळ प्रदेशातील याचा परिसंस्थेवरही परिणाम झाला. म्हणूनच पंतप्रधान मोदींनी ग्रासलँड इकोसिस्टम राखण्यासाठी हे चित्ते बाहेरून आणले आहेत. चित्त्यांच्या आगमनामुळे त्यांच्या सुरक्षेची जबाबदारीही सरकारची आहे. अशा परिस्थितीत या चित्त्यांच्या सुरक्षेसाठी सरकार विशेष कमांडो कुत्र्यांची मदत घेणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, यासाठी खास स्नायफर डॉग्सना विशेष प्रशिक्षण देण्यात आले आहे. हा कुत्रा चित्तांचे रक्षण करणार आहे. या 8 चित्त्यांना शिकारीपासून वाचवण्यासाठी कमांडोकुत्रा सज्ज झाला आहे. खरं तर असे कमांडो कुत्रे या प्रकारच्या कामासाठीच असतात. त्यांना याचे विशेष प्रशिक्षण दिले जाते.

दरम्यान, 1952 साली देशात चित्ते नामशेष झाल्याचे घोषित करण्यात आले होते. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी भारत सरकारने नामिबियातून 8 चित्त्यांची ऑर्डर दिली होती. या चित्त्यांच्या सुरक्षेसाठी खास स्नायफर डॉग्स मागवण्यात आले आहेत. या विशेष कमांडो कुत्र्यांचे काम सर्व चित्त्यांना सुरक्षित ठेवणे आणि शिकारीपासून त्यांचे संरक्षण करणे आहे.

पाच मादी व तीन नर चित्तेनामिबियातून भारतात आणलेल्या आठ चित्त्यांमध्ये पाच मादी व तीन नर आहेत. त्यापैकी पाच मादी चित्त्यांचे वय दोन ते पाच वर्षे दरम्यान तर तीन नर चित्त्यांचे वय 4.5 ते 5.5 वर्षे दरम्यान आहे, अशी माहिती चित्ता कॉन्झर्व्हेशन फंड (CCF) या स्वयंसेवी संस्थेने दिली. 

 

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशcommandoकमांडोdogकुत्रा