शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
3
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
4
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
5
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
6
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
7
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
8
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
11
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
12
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
13
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
14
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
15
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
16
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
17
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
18
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
19
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
20
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान

५० टक्के लोकांना कोरोनाची बाधा व्हायला हवी, तरच...; WHO चा अंदाज

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2020 04:22 IST

जागतिक आरोग्य संघटना । प्रक्रियेसाठी लागणार बराच कालावधी, ५० टक्के लोकांना बाधा झाल्यानंतरच होईल प्रक्रिया

जिनिव्हा : एखाद्या रोगाचा प्रतिकार करण्यासाठी पुरेशा संख्येने लोक सक्षम होतात, त्यावेळी तयार होणारी सामूहिक रोगप्रतिकारशक्ती कोरोनासंदर्भात अद्याप निर्माण झाली नाही. त्यासाठी आणखी बराच वेळ लागेल असे जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. सौम्या स्वामीनाथन यांनी सांगितले.

जागतिक आरोग्य संघटनेतर्फे सोशल मीडियाच्या माध्यमातून आयोजित कार्यक्रमात डॉ. स्वामीनाथन म्हणाल्या, ५० ते ६० टक्के लोकांना कोरोनाची बाधा होऊन ते त्याचा सामना करतील, त्यानंतर सामूहिक रोगप्रतिकारशक्ती निर्माण होईल. कोरोना साथीच्या आणखी काही फेऱ्या आल्यानंतर या प्रक्रियेला सुरुवात होऊ शकेल. त्यामुळे कोरोना प्रतिबंधक लस शोधून काढेपर्यंत पुढील वर्षभर ही साथ आटोक्यात ठेवण्याचा सर्वांनीच प्रयत्न करायला हवा.त्या म्हणाल्या, सामूहिक रोगप्रतिकारशक्ती निर्माण झाल्यानंतर विषाणूंकडून इतरांना होणाºया संसर्गाची साखळी तुटते. त्यामुळे त्या रोगाचा फैलाव बंद होतो. प्रतिबंधक लसीमुळे सामूहिक रोगप्रतिकारशक्ती निर्माण होण्याची प्रक्रिया आणखी वेगाने होते.

नैसर्गिकरित्या सामूहिक रोगप्रतिकारशक्ती निर्माण होण्यापेक्षा तेच काम लसीच्या माध्यमातून पार पाडलेले केव्हाही चांगले असते. नाहीतर तोवर आणखी असंख्य बळी जाण्याचा धोका निर्माण होऊ शकतो, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

डॉ. स्वामीनाथन म्हणाल्या, साथ आटोक्यात ठेवण्यासाठी योग्य उपचार व आवश्यक बंधने पाळणे हेच उपाय आहेत. काही लसींच्या मानवी चाचण्या यशस्वी झाल्या तर या वर्षअखेरीस त्या सर्वांसाठी उपलब्ध होऊ शकतील. कोरोना प्रतिबंधक लस बनविण्यासाठी २०० ठिकाणी प्रयत्न सुरू आहेत. जितके जास्त पर्याय तितकी अधिक परिणामकारक लस शोधण्यास मदत होईल.५ ते १० टक्के लोकांमध्येच तयार झाल्या अँटिबॉडीजकोरोना साथीचा प्रादूर्भाव झालेल्या काही देशांतील ५ ते १० टक्के लोकांमध्ये अँटिबॉडीज तयार झाल्या आहेत. काही देशांमध्ये हेच प्रमाण २० टक्के इतके आहे. या लोकांमुळे ही साथ पसरण्याचा वेग कमी होणार आहे, असेही डॉ. सौम्या स्वामीनाथन यांनी सांगितले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याWorld health organisationजागतिक आरोग्य संघटना