शहरं
Join us  
Trending Stories
1
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
2
"पार्थ पवारांकडून खुलासा घेणे गरजेचे; उद्योग विभागाचा या प्रकरणाशी संबंध नाही"; शिंदे गटाच्या मंत्र्यांनी स्पष्टच सांगितले
3
जीएसटी कमी पडला की काय...! टाटा, मारुती, होंडापासून सर्व कंपन्यांनी इअर एंड डिस्काऊंट सुरु केले...
4
सुरेश रैना, शिखर धवन यांना ईडीचा झटका; कोट्यवधी रुपयांची संपत्ती जप्त, कोणत्या मालमत्तांचा समावेश?
5
१ कोटींचं घर अवघ्या ११ लाखांत, EWS कोट्यातील ७२ जणांना लॉटरी; योगी आदित्यनाथ यांनी कमाल
6
बाजार 'लाल' रंगात बंद! निफ्टी २५,५२० च्या खाली, IT वगळता सर्वच क्षेत्रांत दबाव; 'या' कारणांचा झाला परिणाम
7
बिहारमध्ये राडा! उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर हल्ला; दुसरीकडे सीपीएम आमदाराला मारहाण, गाडी फोडली
8
Ravi Shastri On Shubman Gill : शुभमन गिल आधीच होतोय ट्रोल, त्यात शास्त्रींच्या कमेंटची भर, म्हणाले...
9
लॅपटॉपच्या स्क्रीनवर धूळ बसली आहे? टिश्यू पेपर की कापड कशाने साफ कराल? 'या' टिप्स येतील कामी
10
सैनिकी शाळेत १२ वर्षीय मुलाचा गूढ मृत्यू,'त्या' बंद दारामागे काय घडले?; बहिणीचा गंभीर आरोप
11
सोशल मीडियाच्या ट्रॉलिंगचा बळी; माफी मागितली तरी छळ थांबेना, तरुणाने अखेर जीवन संपवले
12
बदल्याची आग! तरुणाने नकार देताच 'ती' संतापली, ११ राज्यांमधील शाळांना दिली बॉम्बची धमकी
13
"14 तारखेला 11 वाजेपर्यंत लालू अँड कंपनीचा..."; अमित शाह स्पष्टच बोलले, घुसखोरांसंदर्भात काय म्हणाले?
14
Anil Ambani ED: अनिल अंबानींची पुन्हा चौकशी होणार, ED नं १४ नोव्हेंबरला बोलावलं; प्रकरण काय?
15
विजय देवराकोंडा-रश्मिका मंदाना 'या' महिन्यात लग्न करणार? काही दिवसांपूर्वीच झालेला साखरपुडा
16
बायकोला ब्रेन ट्युमर, नवऱ्याने मृत्यूच्या दारातून परत आणलं; मराठी रीलस्टार कपलच्या रिअल लाइफ स्टोरीवर येतोय साऊथ मुव्ही
17
भाजप कार्यकर्त्याने आधी दिल्लीत नंतर बिहारमध्ये मतदान केले; राहुल गांधींनंतर आप नेत्याने आरोप केला
18
Canada Visa Rules : कॅनडाने व्हिसा नियमांमध्ये केला मोठा बदल, भारतावर काय परिणाम होईल?
19
SBI नं रचला इतिहास, मार्केट कॅप १०० अब्ज डॉलर्सच्या पार; देशातील दिग्गजांच्या यादीत सामील
20
"माझ्या पप्पांना अडकवण्यात आलंय"; वडील जेलमध्ये, लेकीने अभ्यास सोडून केला प्रचार

मोठं संकट! पुढच्या आठवड्यात बत्ती गुल? देश अंधारात बुडण्याची भीती; चिंता वाढली

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2021 15:55 IST

देशातील निम्म्या वीज प्रकल्पांमध्ये केवळ तीन दिवस पुरेल इतकात कोळसा शिल्लक

नवी दिल्ली: कोळशापासून वीज निर्मिती करणाऱ्या प्रकल्पांमधील काम ठप्प होण्याच्या मार्गावर आहे. वीज निर्मिती करणाऱ्या प्रकल्पांमध्ये कोळशाची मोठी कमतरता निर्माण झाली आहे. त्यामुळे पुढील आठवड्यात देशातील बराचसा भाग अंधारात बुडून जाण्याची शक्यता आहे. 

केंद्रीय वीज प्राधिकरणानं दिलेल्या माहितीनुसार, देशात कोळशापासून वीज निर्मिती करणारे १३५ प्रकल्प आहेत. यातील १६ प्रकल्पांमधील कोळशाचा साठा पूर्णपणे संपला आहे. तर जवळपास निम्म्या प्रकल्पांमध्ये (७२ प्रकल्पांमध्ये) केवळ ३ दिवस पुरेल इतकाच कोळसा साठा शिल्लक आहे. उर्वरित प्रकल्पांमध्ये एक आठवडा पुरेल इतका साठा बाकी आहे. देशात निर्माण होणाऱ्या एकूण वीजेपैकी ७० टक्के वीज कोळशापासून तयार केली जाते. कोळशापासून निर्माण होणारी उर्जा स्वस्त असते. त्यामुळे भारतात याच उर्जेचा वापर होतो.

वीज प्रकल्पात कोळशाची टंचाई; नेमकं कारण काय?कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर अर्थचक्र सुरळीत होऊ लागलं आहे. औद्योगिक उर्जेची मागणी वाढली आहे. त्यामुळे कोळशाच्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय किमतींमध्ये खूप मोठी तफावत निर्माण झाली आहे. त्याचा थेट परिणाम कोळशाच्या आयातीवर झाला आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात कोळशाचे दर वाढले आहेत. त्यामुळे वीज प्रकल्पांनी आयात कमी केली आहे. त्याचा थेट परिणाम भारतातील कोळसा खाणींवर दिसू लागला आहे. कोळसा खाणींवरील दबाव वाढला आहे. देशातील कोळशाची किंमत कोल इंडियाकडून निश्चित केली जाते. गेल्या काही महिन्यांत आंतरराष्ट्रीय बाजारात कोळशाची किंमत वाढली आहे. पण कोल इंडियानं देशातील कोळशाचा दर फारसा वाढवलेला नाही. कोळशाची किंमत वाढल्यास त्याचा थेट परिणाम वीजेच्या दरांवर आणि पर्यायानं अन्य उत्पादनांवर होईल.

टॅग्स :electricityवीजCoal Shortageकोळसा संकटCentral Governmentकेंद्र सरकार