शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
4
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
5
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
6
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
7
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
8
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
9
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
10
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
11
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
12
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
13
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
14
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
15
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
16
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
17
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
18
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
19
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
20
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 

मोठं संकट! पुढच्या आठवड्यात बत्ती गुल? देश अंधारात बुडण्याची भीती; चिंता वाढली

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2021 15:55 IST

देशातील निम्म्या वीज प्रकल्पांमध्ये केवळ तीन दिवस पुरेल इतकात कोळसा शिल्लक

नवी दिल्ली: कोळशापासून वीज निर्मिती करणाऱ्या प्रकल्पांमधील काम ठप्प होण्याच्या मार्गावर आहे. वीज निर्मिती करणाऱ्या प्रकल्पांमध्ये कोळशाची मोठी कमतरता निर्माण झाली आहे. त्यामुळे पुढील आठवड्यात देशातील बराचसा भाग अंधारात बुडून जाण्याची शक्यता आहे. 

केंद्रीय वीज प्राधिकरणानं दिलेल्या माहितीनुसार, देशात कोळशापासून वीज निर्मिती करणारे १३५ प्रकल्प आहेत. यातील १६ प्रकल्पांमधील कोळशाचा साठा पूर्णपणे संपला आहे. तर जवळपास निम्म्या प्रकल्पांमध्ये (७२ प्रकल्पांमध्ये) केवळ ३ दिवस पुरेल इतकाच कोळसा साठा शिल्लक आहे. उर्वरित प्रकल्पांमध्ये एक आठवडा पुरेल इतका साठा बाकी आहे. देशात निर्माण होणाऱ्या एकूण वीजेपैकी ७० टक्के वीज कोळशापासून तयार केली जाते. कोळशापासून निर्माण होणारी उर्जा स्वस्त असते. त्यामुळे भारतात याच उर्जेचा वापर होतो.

वीज प्रकल्पात कोळशाची टंचाई; नेमकं कारण काय?कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर अर्थचक्र सुरळीत होऊ लागलं आहे. औद्योगिक उर्जेची मागणी वाढली आहे. त्यामुळे कोळशाच्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय किमतींमध्ये खूप मोठी तफावत निर्माण झाली आहे. त्याचा थेट परिणाम कोळशाच्या आयातीवर झाला आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात कोळशाचे दर वाढले आहेत. त्यामुळे वीज प्रकल्पांनी आयात कमी केली आहे. त्याचा थेट परिणाम भारतातील कोळसा खाणींवर दिसू लागला आहे. कोळसा खाणींवरील दबाव वाढला आहे. देशातील कोळशाची किंमत कोल इंडियाकडून निश्चित केली जाते. गेल्या काही महिन्यांत आंतरराष्ट्रीय बाजारात कोळशाची किंमत वाढली आहे. पण कोल इंडियानं देशातील कोळशाचा दर फारसा वाढवलेला नाही. कोळशाची किंमत वाढल्यास त्याचा थेट परिणाम वीजेच्या दरांवर आणि पर्यायानं अन्य उत्पादनांवर होईल.

टॅग्स :electricityवीजCoal Shortageकोळसा संकटCentral Governmentकेंद्र सरकार