शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
2
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
3
आता 'या' देशात पर्यटकही धूम्रपान करू शकणार नाहीत! सेलिब्रेटींमध्ये लोकप्रिय असणाऱ्या देशाचे नियम बदलले
4
भारताला डिवचण्याचा प्रयत्न; मोहम्मद युनूस यांनी पाकिस्ताननंतर तुर्कीला दिला वादग्रस्त नकाशा
5
Viral Video: लग्नात स्वयंपाक बनवताना तरुणाचं घाणेरडं कृत्य; व्हिडिओ समोर येताच अटक!
6
३०, ४० आणि ५० व्या वर्षी 'कोट्यधीश' व्हायचेय? तुमच्या वयानुसार निवडा गुंतवणुकीची योग्य स्ट्रॅटेजी!
7
Maharashtra Local Body Elections: २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक जाहीर; 'असा' आहे कार्यक्रम, 'दुबार मतदार'ही समजणार
8
ICC Rankings : हातात विश्वचषकाचा 'दागिना'; पण जाता जाता लॉरानं 'वनडे क्वीन’ स्मृतीचा मुकूट हिसकावला!
9
दुबार मतदारांच्या नावासमोर 'डबल स्टार' येणार; राज्य निवडणूक आयोगाचं मोठं पाऊल, कशी असेल नवी मोहीम?
10
सलग चौथ्या दिवशी बाजारात घसरण! गुंतवणूकदारांचे २.६ लाख कोटी पाण्यात; 'ही' आहेत ५ कारणे
11
लग्नात का येताहेत समस्या? कोणत्या सुधारणा आवश्यक? न्यायालयानं स्पष्टच सांगितलं
12
मंदिराच्या गर्भगृहाची दुरुस्ती करताना सापडलं घबाड, कलशात होती सोन्याची एवढी नाणी...  
13
माणुसकीचा जमानाच राहीला नाही! ओला रायडरची मदत केली अन् तो तरुणीसोबत 'असा' वागला
14
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा शिंदेंना धक्का, रायगडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेशी आघाडी
15
महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणातील मुख्य आरोपी दुबईतून बेपत्ता, भारताच्या प्रत्यार्पणाच्या आशेला धक्का
16
'या' योजनेत गुंतवणूक केल्यास मिळेल दुहेरी फायदा आणि तगडा परतावा, निवृत्तीनंतरचे टेन्शन होईल 'गायब'!
17
सप्तपदीनंतर दोन तासांत लग्न मोडलं, वधू पक्षाने वराला झोड झोड झोडलं, नेमकं काय घडलं?  
18
कॅनडाने भारतीय विद्यार्थ्यांना दिला मोठा धक्का, ७४% विद्यार्थी व्हिसा अर्ज नाकारले
19
उद्योग जगताला मोठा धक्का! हिंदुजा ग्रुपचे अध्यक्ष गोपीचंद पी. हिंदुजा यांचे लंडनमध्ये निधन
20
चॅटजीपीटी आता तुम्हाला 'या' मुद्द्यांवर सल्ला देणार नाही! कंपनीने का बदलले नियम?

Ayodhya Ram Mandir: १५५ देशांतील नद्यांचे पाणी, अयोध्येत रामलल्लावर महाजलाभिषेक; २०२०पासूनची मोहीम सुफल-संपूर्ण!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2023 12:44 IST

Ayodhya Ram Mandir: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ रामलल्लांवर महाजलाभिषेक करणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

Ayodhya Ram Mandir: प्रभू श्रीरामांची जन्मभूमी असलेल्या अयोध्येत रामलल्लाचे भव्य मंदिर उभारण्यात येत आहे. मंदिराचे बांधकाम युद्ध पातळीवर सुरू आहे. हळूहळू राम मंदिर आकारास येत आहे. आगामी वर्षभरात राम मंदिर भाविकांसाठी खुले होईल, असा दावा केला जात आहे. यातच आता जगभरातील पवित्र नद्यांचे पाणी भारतात आणण्यात आले असून, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ रामलल्लावर महाजलाभिषेक करणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, रशिया, युक्रेन, पाकिस्तानसह जगभरातील सुमारे १५५ देशांतील पवित्र नद्यांचे पाणी भारतात आणण्यात आले आहे. याने प्रभू श्रीरामांवर महाजलाभिषेक करण्यात येणार आहे. २३ एप्रिल रोजी योगी आदित्यनाथ विशेष कार्यक्रमात हा जलाभिषेक करणार असल्याचे सांगितले जात आहे. अयोध्येच्या श्री रामजन्मभूमी मंदिरात देशातीलच नव्हे तर जगातील नद्यांच्या पाण्याने अभिषेक केला जाणार आहे. यासाठी एका भव्य आणि संस्मरणीय कार्यक्रमाचे आयोजन केले जात आहे. 

२०२० पासून नद्यांचे पाणी एकत्र करण्याची मोहीम

श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी सांगितले की, विजय जौली यांच्या नेतृत्वाखाली एक टीम १५५ देशांतील नद्यांचे पाणी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे सुपूर्द करेल. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ २३ एप्रिल रोजी मणिराम दास छावणी सभागृहात 'जल कलश' पूजन करतील. सन २०२० मध्ये गैर-सरकारी संस्थेने दिल्ली स्टडी ग्रुपने पाणी गोळा करण्यासाठी ही मोहीम सुरू केली. या संघटनेचे अध्यक्ष दिल्लीतील भाजपचे माजी आमदार विजय जौली आहेत. आता जगभरातील नद्यांचे पाणी जमा करण्यात आले असून, विजय जौली अयोध्येत परतले आहेत.

रशिया, युक्रेनसह १५५ देशांतून जमा केले पाणी

माजी आमदार विजय जॉली यांनी श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांच्याशी चर्चा केली. ते म्हणाले की, दिवंगत अशोक सिंघल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासून प्रेरणा घेऊन प्रतिज्ञा घेतली होती की, जगभरातील नद्या आणि समुद्राचे पाणी जमा करून त्या पाण्याने राम मंदिरात प्रभू श्रीरामांवर जलाभिषेक करू. पाकिस्तानच्या राबी नदीसह जगभरातून वाहणाऱ्या नद्यांमधील पाणी मोठ्या कष्टाने गोळा करण्यात आले आहे. युद्धाच्या काळातही रशिया आणि युक्रेनच्या नद्यांचे पाणी जमा झाले आहे. पाकिस्तानातून पाणी आणणे कठीण होते. मात्र, तेथील हिंदू बांधवांनी मेहनतीने दुबईमार्गे पाणी पाठवण्याची व्यवस्था केल्याचे सांगितले जात आहे. 

दरम्यान, या कार्यक्रमात धार्मिक, अध्यात्मिक गुरुंसह देशातीलच नव्हे तर परदेशातील मान्यवरांना आमंत्रित करण्याची तयारी सुरू आहे. श्रीराम मंदिराच्या भूमिपूजनाच्या वेळी देशातील पवित्र नद्यांचे पाणी आणि पवित्र स्थळांची माती आणून पायाभरणी करण्यात आली होती. आता पुन्हा एकदा श्र राम मंदिरात पवित्र नद्यांच्या पाण्याने अभिषेक करण्याची तयारी सुरू आहे.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :Ram Mandirराम मंदिरAyodhyaअयोध्याyogi adityanathयोगी आदित्यनाथ