शहरं
Join us  
Trending Stories
1
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
2
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
3
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
4
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
5
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
6
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
7
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
8
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
9
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
10
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
11
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
12
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
13
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
14
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
15
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
16
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
17
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
18
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
19
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
20
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...

रामनवमीच्या दिवशी मध्य प्रदेशपासून बंगालपर्यंत हिंसाचार, यूपीत शांतता; CM योगींनी सांगितलं कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2022 11:30 IST

योगी आदित्यनाथ म्हणाले, रामनवमीच्या दिवशी राज्यात 800 हून अधिक ठिकाणी मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. एकीकडे रमजानचा महिनाही सुरू आहे. मात्र, तरीही कुठेही कसल्याही प्रकारचे तू-तू मी-मी नाही.

रामनवमीच्या दिवशी मध्य प्रदेशपासून ते पश्चिम बंगालपर्यंत देशातील अनेक राज्यांत हिंसाचाराच्या घटना घडल्या. पण सांप्रदायिक दृष्ट्या अत्यंत संवेदनशील म्हणवल्या जाणाऱ्या उत्तर प्रदेशातून मात्र, अशी एकही घटना समोर आली नाही. यासंदर्भात आता उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मोठे वक्तव्य केले आहे.

योगी आदित्यनाथ म्हणाले, रामनवमीच्या दिवशी राज्यात 800 हून अधिक ठिकाणी मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. एकीकडे रमजानचा महिनाही सुरू आहे. मात्र, तरीही कुठेही कसल्याही प्रकारचे तू-तू मी-मी नाही. दंगली तर दूरचा विषय, उत्तर प्रदेशात शांतता आहे. येथे गुंडगिरी आणि अराजकतेला कुठलेही स्थान नाही.

लखनौ येथे मंगळवारी सायंकाळी एका कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले, "परवा रामनवमी होती.  उत्तर प्रदेशात एकूण 25 कोटी लोक राहतात. येथे 800 ठिकाणी रामनवमीनिमित्त शोभायात्रा अथवा मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. याच बरोबर सध्या रमजानचा महिनाही सुरू आहे. यामुळे रोजा इफ्तारचे कार्यक्रमही होतच असतील. पण, दंगलींचा विषय तर सोडच, कुठे साधे तू-तू-मी-मीही झाले नाही."

योगी पुढे म्हणाले, ''यवरून उत्तर प्रदेश आता विकासाचा विचार करत असल्याचे दिसून येते. आता गुंडगिरी, अराजकता आणि अफवांना कुठलेही स्थान नाही. हे उत्तर प्रदेशने रामनवमीला, मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्री रामांच्या जयंतीनिमित्त सिद्ध केले आहे.'' तत्पूर्वी, देशातील गुजरात, मध्य प्रदेश, झारखंड, कर्नाटक आणि पश्चिम बंगाल आदी राज्यांत अनेक ठिकाणी हिंसाचाराच्या घटना घडल्या आहेत.

टॅग्स :yogi adityanathयोगी आदित्यनाथUttar Pradeshउत्तर प्रदेशRam Navamiराम नवमी