शहरं
Join us  
Trending Stories
1
"महाराष्ट्रात भाजप कोणाच्याही कुबड्यांवर चालत नाही; सत्तेमुळे तुम्ही समाधानी असाल, पण मी नाही": शाह
2
तुमचे अधिकारी वृत्तपत्र वाचत नाहीत का? देशाची प्रतिमा मलिन होतेय; भटक्या कुत्र्यांवरून भडकले कोर्ट
3
१२ राज्यांमध्ये होणार मतदार याद्यांची पडताळणी; SIR दुसरा टप्पा ४ नोव्हेंबरपासून, महाराष्ट्राचा समावेश नाही
4
सरन्यायाधीश बूटफेक प्रकरण: वकिलावर कारवाई करणार नाही; सर्वोच्च न्यायालयाचे स्पष्टीकरण
5
तातडीने सुनावणीस नकार, पण दोन मागण्या मान्य; मराठा-ओबीसी आरक्षण वादात ओबीसी संघटनेला कोर्टाचा दिलासा
6
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
7
शिवडीतील दागिने लुटीचा सुरक्षारक्षक निघाला सूत्रधार; एकाच घरात राहत होते सर्व आरोपी
8
राम जन्मभूमी मंदिराचे काम पूर्ण, २५ नोव्हेंबरला भव्य सोहळा, ६ ते ८ हजार निमंत्रित येणार
9
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
10
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
11
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
12
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
13
विद्यार्थ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी काय केले? तपशील सादर करण्याचे सुप्रीम कोर्टाचे आदेश
14
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
15
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
16
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
17
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
18
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
19
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
20
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा

तेलंगणातील ११ लाख शेतकऱ्यांचे कर्ज होणार माफ; शेतकरी कर्जमाफी योजना सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2024 00:25 IST

Telangana : राज्य सचिवालयात आयोजित कार्यक्रमात रेड्डी यांनी काही शेतकऱ्यांना धनादेश सुपूर्द केले. काही शेतकऱ्यांशी त्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे चर्चाही केली.

हैदराबाद: तेलंगणाचे मुख्यमंत्री ए. रेवंत रेड्डी यांनी गुरुवारी शेतकरी कर्जमाफी योजनेचा शुभारंभ केला. पहिल्या टप्प्यात या योजनेअंतर्गत १ लाख रुपयांपर्यंत कर्ज असलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात ६,०९८ कोटी रुपये जमा करण्यात आले. राज्य सचिवालयात आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री ए. रेवंत रेड्डी यांनी काही शेतकऱ्यांना धनादेश सुपूर्द केले. काही शेतकऱ्यांशी त्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे चर्चाही केली.

मुख्यमंत्र्यांच्या म्हणण्यानुसार, ११ लाख शेतकऱ्यांना लाभ देण्यासाठी बँकेला ६,०९८ कोटी रुपये देण्यात आले आहेत. कृषी कर्जमाफी योजना तीन टप्प्यात पूर्ण केली जाणार आहे.  दुसऱ्या टप्प्यात १.५ लाख रुपयांपर्यंतचे पीक कर्ज जुलै अखेरीस माफ केले जाईल, तर तिसऱ्या टप्प्यात २ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज ऑगस्टमध्ये माफ केले जाईल, असे मुख्यमंत्री ए. रेवंत रेड्डी  यांनी सांगितले. 

या कार्यक्रमाला संबोधित करताना मुख्यमंत्री म्हणाले की, ३१ हजार कोटी रुपयांची कर्जमाफी योजना तीन टप्प्यात राबविण्यात येणार असून ती ऑगस्टपर्यंत पूर्ण केली जाईल. तसेच, मागील भारत राष्ट्र समिती (BRS) सरकारने दोन टर्म सत्तेत असूनही शेतकरी कर्जमाफीचे आश्वासन योग्यरित्या राबवले नाही, असा आरोप मुख्यमंत्री ए. रेवंत रेड्डी यांनी केला. मागील सरकारच्या काळात घेतलेल्या सात लाख कोटींच्या कर्जावर काँग्रेस सरकार दरमहा जवळपास सात हजार कोटी रुपये व्याज देत असल्याचा दावा मुख्यमंत्री ए. रेवंत रेड्डी यांनी केला.

याचबरोबर,लोकसभेतील विद्यमान विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी २०२२ मध्ये तेलंगणातील जाहीर सभेत आणि नंतर काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी २०२३ मध्ये राज्यातील एका मेळाव्यात दिलेल्या आश्वासनानुसार काँग्रेस सरकार कर्जमाफी सुरू करत आहे, असे मुख्यमंत्री ए. रेवंत रेड्डी म्हणाले. तसेच, लवकरच दिल्लीला जाणार असून राहुल गांधी यांना या महिन्याच्या अखेरीस राज्यात होणाऱ्या जाहीर सभेत उपस्थित राहण्यासाठी आमंत्रित करणार आहे, कारण त्यांचे आभार व्यक्त करता येईल, असेही मुख्यमंत्री ए. रेवंत रेड्डी यांनी सांगितले. 

टॅग्स :TelanganaतेलंगणाFarmerशेतकरी