शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

तेलंगणातील ११ लाख शेतकऱ्यांचे कर्ज होणार माफ; शेतकरी कर्जमाफी योजना सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2024 00:25 IST

Telangana : राज्य सचिवालयात आयोजित कार्यक्रमात रेड्डी यांनी काही शेतकऱ्यांना धनादेश सुपूर्द केले. काही शेतकऱ्यांशी त्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे चर्चाही केली.

हैदराबाद: तेलंगणाचे मुख्यमंत्री ए. रेवंत रेड्डी यांनी गुरुवारी शेतकरी कर्जमाफी योजनेचा शुभारंभ केला. पहिल्या टप्प्यात या योजनेअंतर्गत १ लाख रुपयांपर्यंत कर्ज असलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात ६,०९८ कोटी रुपये जमा करण्यात आले. राज्य सचिवालयात आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री ए. रेवंत रेड्डी यांनी काही शेतकऱ्यांना धनादेश सुपूर्द केले. काही शेतकऱ्यांशी त्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे चर्चाही केली.

मुख्यमंत्र्यांच्या म्हणण्यानुसार, ११ लाख शेतकऱ्यांना लाभ देण्यासाठी बँकेला ६,०९८ कोटी रुपये देण्यात आले आहेत. कृषी कर्जमाफी योजना तीन टप्प्यात पूर्ण केली जाणार आहे.  दुसऱ्या टप्प्यात १.५ लाख रुपयांपर्यंतचे पीक कर्ज जुलै अखेरीस माफ केले जाईल, तर तिसऱ्या टप्प्यात २ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज ऑगस्टमध्ये माफ केले जाईल, असे मुख्यमंत्री ए. रेवंत रेड्डी  यांनी सांगितले. 

या कार्यक्रमाला संबोधित करताना मुख्यमंत्री म्हणाले की, ३१ हजार कोटी रुपयांची कर्जमाफी योजना तीन टप्प्यात राबविण्यात येणार असून ती ऑगस्टपर्यंत पूर्ण केली जाईल. तसेच, मागील भारत राष्ट्र समिती (BRS) सरकारने दोन टर्म सत्तेत असूनही शेतकरी कर्जमाफीचे आश्वासन योग्यरित्या राबवले नाही, असा आरोप मुख्यमंत्री ए. रेवंत रेड्डी यांनी केला. मागील सरकारच्या काळात घेतलेल्या सात लाख कोटींच्या कर्जावर काँग्रेस सरकार दरमहा जवळपास सात हजार कोटी रुपये व्याज देत असल्याचा दावा मुख्यमंत्री ए. रेवंत रेड्डी यांनी केला.

याचबरोबर,लोकसभेतील विद्यमान विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी २०२२ मध्ये तेलंगणातील जाहीर सभेत आणि नंतर काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी २०२३ मध्ये राज्यातील एका मेळाव्यात दिलेल्या आश्वासनानुसार काँग्रेस सरकार कर्जमाफी सुरू करत आहे, असे मुख्यमंत्री ए. रेवंत रेड्डी म्हणाले. तसेच, लवकरच दिल्लीला जाणार असून राहुल गांधी यांना या महिन्याच्या अखेरीस राज्यात होणाऱ्या जाहीर सभेत उपस्थित राहण्यासाठी आमंत्रित करणार आहे, कारण त्यांचे आभार व्यक्त करता येईल, असेही मुख्यमंत्री ए. रेवंत रेड्डी यांनी सांगितले. 

टॅग्स :TelanganaतेलंगणाFarmerशेतकरी