शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
2
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
3
माणिकराव कोकाटेंना साडेसातीची झळ, शनिदेव तारणार की राजकरणातून ‘मुक्ती’ देणार? लवकरच कळेल!
4
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
5
७ तासांपेक्षा कमी किंवा ९ तासांपेक्षा जास्त झोपता? लवकर मृत्यूचा धोका, रिसर्चमध्ये मोठा खुलासा
6
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
7
हायव्होल्टेज ड्रामा! पोराला घेऊन बॉयफ्रेंडच्या घरी गर्लफ्रेंड; बायको म्हणते "माझा नवरा असा नाही, हीच..."
8
"मी एका मोठ्या सिनेमात फेल झालो", फहाद फाजिलने पुन्हा 'पुष्पा'वर केलं भाष्य; पुढे म्हणाला...
9
भयंकर! अचानक लिफ्ट बंद पडली, आवाज देण्यासाठी डोकं बाहेर काढताच...; व्यावसायिकाचा मृत्यू
10
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
11
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!
12
आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार...
13
राजकीय हस्तक्षेपामुळे राज्याचे उद्योगविश्व त्रस्त; विकासकामांना करतात विरोध, दादागिरीही वाढली
14
मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता नाही! निर्णय फक्त कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंबाबतच
15
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार
16
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी मालदीवच्या नेत्यांची लगबग, भेटी अन् चर्चा
17
सूतगिरण्यांच्या अर्थसाहाय्याबाबत आता समान निकष; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
18
अनिल अंबानी यांच्यावर सलग तिसऱ्या दिवशी ईडीचे छापे; विविध कार्यालयांतून कागदपत्रे जप्त
19
विजयदिनी शहीद जवानांच्या शौर्याला सलामी; कारगिलमध्ये २६ जुलै १९९९ रोजी फडकावला तिरंगा
20
‘निसार’ मोहीम पृथ्वी निरीक्षण क्षेत्रात आणणार क्रांती: इस्रो; उपग्रहाची वैशिष्ट्ये काय?

कलम ३७० हटवल्यानंतर काश्मीरमध्ये विकासाला सुरुवात? CM ओमर अब्दुल्ला म्हणाले, "काही संबंध नाही"

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2025 08:17 IST

Arilce 370: जम्मू आणि काश्मीरमधील पायाभूत सुविधा प्रकल्प पूर्ण होण्याचा कलम ३७० रद्द करण्याशी काहीही संबंध नसल्याचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी म्हटलं आहे.

CM Omar Abdullah : पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी जम्मू-काश्मीरल दौऱ्यावर असणार आहेत. यादरम्यान ते सोनमर्ग बोगद्याचे उद्घाटन करतील. कलम ३७० रद्द केल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये पायाभूत सुविधांचा विकास झपाट्याने झाल्याचा समज सामान्यांमध्ये झाला आहे. मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी मात्र हा दावा फेटाळून लावला. या विकासाचा संबंध कलम ३७० च्या राजकारणाशी जोडू नये, असे त्यांचे म्हणणे आहे. काश्मीर खोऱ्यातील पायाभूत सुविधांच्या विकासाला गती देण्याचे कलम ३७० रद्द करण्याशी काहीही संबंध नाही, असं ओमर अब्दुला यांनी म्हटलं.

जम्मू काश्मीरमधील कलम ३७० हटवल्यानंतर केंद्रशासित प्रदेशाच्या विकासाला गती मिळाल्याचा दावा केंद्र सरकार करत असल्याचा सवाल ओमर अब्दुल्ला यानी केला. तुम्ही ५ ऑगस्ट २०१९ नंतर सुरू झालेल्या प्रकल्पांबद्दल सांगितले आहे. हे सर्व मोठे इन्फ्रा प्रकल्प ५ ऑगस्ट २०१९ पूर्वीचे आणि कलम ३७० रद्द करण्याआधीचे आहेत, ज्याची कामे अजूनही सुरू आहेत, असं ओमर अब्दुल्ला म्हणाले. इंडिया टुडेशी बोलताना मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी असेही सांगितले की जम्मू आणि काश्मीरमधील पायाभूत सुविधांचे प्रकल्प कलम ३७० रद्द न करताही पूर्ण होऊ शकले असते

"हे प्रकल्प केव्हा ना केव्हातरी व्हायला हवेच होते. कलम ३७० व्यतिरिक्त, हे सर्व आत्तापर्यंत पूर्ण व्हायला हवे होते. ३७० हे काम पूर्ण न होण्याचे कारण नव्हते. केंद्र सरकारने यापूर्वी यावर भर का दिला नाही? ३७० मध्ये (विकासाच्या कामात) कोणतीही अडचण नव्हती, समस्या ही होती की केंद्राने काश्मीरमध्ये पायाभूत प्रकल्पांवर जोर दिला नाही," असं ओमर अब्दुल्ला म्हणाले.

जम्मू-काश्मीरबाबत केंद्र सरकारने म्हटलं की दगडफेक, सुरक्षा या बाबींमध्ये सुधारणा झाल्या आहेत असं विचारले असता ओमर अब्दु्ल्ला म्हणाले, "बहुतेक पायाभूत सुविधांचे प्रकल्प पाहिल्यास, ते त्या भागात नाहीत जेथे सामान्यतः निषेध दिसून आला. मग तो रेल्वे मार्ग असो, कटरा-बनिहाल, यापैकी एकही अशा भागात नाही जिथे आंदोलने झाली नव्हती."

सोनमर्ग बोगद्याच्या उद्घाटनाबाबतही ओमर अब्दुल्लांनी हा एक उत्तम प्रकल्प आहे, पण काही महिन्यांपूर्वी त्यावर अतिरेकी हल्ल्या झाला होता, असं म्हटलं. गेल्या वर्षी २० ऑक्टोबर रोजी गगनीरमधील सोनमर्ग बोगद्याच्या जागेवर दहशतवाद्यांनी गोळीबार केला होता आणि त्यात सात लोक ठार झाले होते. मृतांमध्ये सहा मजूर आणि एक डॉक्टर यांचा समावेश होता. 

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरOmar Abdullahउमर अब्दुल्लाArticle 370कलम 370