शहरं
Join us  
Trending Stories
1
Nashik: नाशिकमधील एका खाजगी शाळेला बॉम्बने उडवण्याची धमकी!
2
महात्मा फुले योजनेत अवयव प्रत्यारोपणासह आता २,३९९ व्याधींवर होणार उपचार
3
जळगाव जिल्ह्यात ढगफुटी? गावांमध्ये शिरले पुराचे पाणी; लोकांनी रात्र काढली जागून, शाळांना सुट्टी
4
"...त्यांची जीभ इतरांना जाब विचारताना अडखळत कशी नाही?"; भाजपाची शरद पवारांवर बोचरी टीका
5
ITR: इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची आज अखेरची संधी! आयकर विभागाने एका दिवसाने मुदत वाढवली
6
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
7
आजचे राशीभविष्य- १६ सप्टेंबर २०२५: मित्रांचा सहवास लाभेल, पण घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
8
पोलिस ठाण्यांत सीसीटीव्ही का नाहीत?, ही बेफिकिरीच; सर्वोच्च न्यायालय २६ सप्टेंबर रोजी आदेश देणार
9
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
10
'पूरग्रस्तांना प्रत्येकाने शक्य ती सर्व मदत करावी', राहुल गांधींच्या सूचना, प्रत्यक्ष गेले बांधावर
11
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
12
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
13
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
14
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
15
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
16
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
17
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
18
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
19
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
20
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?

ममतांचं मोदी सरकारला पत्र; नेताजी सुभाषचंद्र बोसांसंदर्भात केली मोठी मागणी

By श्रीकृष्ण अंकुश | Updated: January 4, 2021 19:59 IST

ममता बॅनर्जी यांनी सोमवारी यासंदर्भात आपले पत्र आणि राज्य सरकारच्या निर्णयांशी संबंधित माहिती दिली. एवढेच नाही, तर यावेळी त्यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर एक मोठी घोषणाही केली.

कोलकाता -पश्चिम बंगालमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्ष वेगवेगळ्या पद्धतीचे मुद्दे उपस्थित करत आहे. याच बरोबर राजकीय वक्तव्यांशिवाय  राजकीय हिंसाचाराच्या घटनाही समोर येत आहेत. यात मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आज केंद्रातील मोदी सरकारला पत्र लिहिले आहे. या पत्रात ममतांनी मोदी सरकारकडे नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याशी संबंधित सर्व महत्वाचे दस्तऐवज सार्वजनिक करण्याची मागणी केली आहे.

ममता बॅनर्जी यांनी सोमवारी यासंदर्भात आपले पत्र आणि राज्य सरकारच्या निर्णयांशी संबंधित माहिती दिली. एवढेच नाही, तर यावेळी त्यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर एक मोठी घोषणाही केली. त्या म्हणाल्या, नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त राज्यात 'देश नायक दिवस' साजरा केला जाईल.

ममता म्हणाल्या, वैयक्तिकपणे मला असे वाटते, की देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपण नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्यासाठी काहीही महत्वाचे कार्य केलेले नाही. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त 23 जानेवारी ही राष्ट्रीय सुट्टी घोषित करावी, यासाठी मी केंद्र सरकारला पत्र लिहिले आहे आणि ही माझी मागणी आहे. याच बरोबर, अनिवासी भारतीयांसह देशातील सर्व नागरिकांना मी आवाहन करते, की नेताजींच्या जयंतीनिमित्त म्हणजेच 23 जानेवारीला दुपारी 12:15 वाजता सर्वांनी शंख नाद करावा, असेही ममता म्हणाल्या. 

शेतकऱ्यांना समर्थन - यावेळी ममता म्हणाल्या, मी शेतकऱ्यांच्या बाजूने आहे आणि हे तीनही कृषी कायदे परत घेण्याची मागणी करते. तसेच भाजपची राजकीय इच्छा स्पष्ट आहे, म्हणूनच ते हे कायदे मागे घेत नाहीत, असेही ममता म्हणाल्या.

अंतर्गत सर्वेक्षणात TMCचं नुकसान -तृणमूल काँग्रेसने बंगालच्या जनतेची नस जाणून घेण्याचा प्रयत्न केला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, टीएमसी 190 च्या जवळपास जागा जिंकू शकते, असे पक्षाच्या अतर्गत सर्वेक्षणातून समोर आले आहे. 2016च्या विधानसभा निवडणुकीत टीएमसीने 211 जागांवर विजय मिळवला होता.

टीएमसीच्या अतर्गत सर्वेक्षणानुसार, राज्यात भाजपला 98 जागा मिळू शकतात. तर काँग्रेसला केवळ 6 जागांवरच समाधान मानावे लागणार असल्याची शक्यता आहे. या सर्वेक्षणानुसार, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या पक्षाला 51 टक्क्यांपेक्षा थोडी अधिक मते मिळू शकतात.

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीNetaji Subhashchandra Boseनेताजी सुभाषचंद्र बोसBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदीwest bengalपश्चिम बंगाल