शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

“मणिपूरमध्ये आदिवासींवर अत्याचार होताना गप्प का होता?”; ममतादीदींचा राष्ट्रपतींवर पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2026 20:37 IST

CM Mamata Banerjee Replied To President Draupadi Murmu: राष्ट्रपती भाजपाच्या अजेंड्याला बळी पडल्या आहेत. ५० वेळा कोणी येत असेल, तर प्रत्येक कार्यक्रमाला उपस्थित राहणे शक्य नाही, अशी टीका ममता बॅनर्जी यांनी केली.

CM Mamata Banerjee Replied To President Draupadi Murmu: नवव्या आंतरराष्ट्रीय संथाल परिषदेत सहभागी होण्यासाठी पश्चिम बंगालमध्ये आलेल्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी लहान जागेबद्दल नाराजी व्यक्त केली. प्रस्थापित प्रोटोकॉलनुसार मुख्यमंत्री किंवा राज्य सरकारचा कोणताही मंत्री त्यांचे स्वागत करण्यासाठी उपस्थित नव्हता, याबद्दलही त्यांनी दुःख व्यक्त केले. यावर कोणताही वैयक्तिक आक्षेप नाही, परंतु देशाच्या राष्ट्रपतींसाठी निर्धारित प्रोटोकॉलचे पालन केले पाहिजे, अशी अपेक्षा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी व्यक्त केली होती. यावर आता मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी जोरदार पलटवार केला आहे. 

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू म्हणाल्या की, परिषदेसाठी निवडलेले ठिकाण खूप लहान होते, त्यामुळे मोठ्या संख्येने लोक उपस्थित राहू शकले नाहीत. या ठिकाणी पाच हजार लोकांसाठी पुरेशी जागाही नव्हती. ममता बॅनर्जी मला लहान बहिणीसारख्या आहेत, ममता बॅनर्जी माझ्यावर नाराज आहेत, असे मला वाटत नाही. परंतु तरीही इतके लहान ठिकाण का देण्यात आले, हे समजत नाही. यातून असे दिसून येते की, कार्यक्रमाला उपस्थित राहावे आणि नंतर निघून जावे, असा त्यांचा हेतू होता. बिधाननगर मैदान मोठे आहे. या मोठ्या मैदानात आंतरराष्ट्रीय संथाल परिषद झाली असती तर सुमारे पाच लाख लोक उपस्थित राहू शकले असते. एवढे मोठे मैदान उपलब्ध असताना परिषदेसाठी एवढी लहान जागा का निवडली गेली, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. यावरून ममता बॅनर्जी यांनी प्रत्युत्तर दिले.

५० वेळा भेट दिली तर प्रत्येक कार्यक्रमाला उपस्थित राहणे शक्य नाही

मी राष्ट्रपतींचा आदर करते, पण जर कोणी ५० वेळा भेट दिली तर प्रत्येक कार्यक्रमाला उपस्थित राहणे शक्य नाही. मी सध्या आंदोलन करत आहे. तसेच राष्ट्रपती सांगत आहेत, त्या कार्यक्रमाबाबत मला काहीच माहिती नाही. राज्य सरकारला या कार्यक्रमाच्या आयोजकांबद्दल, निधीबद्दल किंवा त्याच्या संघटनेबद्दल माहिती देण्यात आली नव्हती. राष्ट्रपती जेव्हा राज्याला भेट देतात, तेव्हा त्यांना सूचित केले जाते. परंतु त्यांना संबंधित आंतरराष्ट्रीय परिषदेची माहिती नव्हती किंवा राज्य सरकार त्यात सहभागी नव्हते, असे ममता बॅनर्जी यांनी स्पष्ट केले.

मणिपूरमध्ये आदिवासींवर अत्याचार होताना गप्प का होता?

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राष्ट्रपतींवर टीका करताना म्हटले की, त्यांना भाजपचा अजेंडा पुढे नेण्यासाठी पाठवण्यात आले आहे. राष्ट्रपती भाजपाच्या धोरणांना बळी पडल्या आहेत. भाजपाची प्राथमिकता राजकारण आहे, पण माझी प्राथमिकता जनता आहे. मणिपूरमध्ये आदिवासींवर अत्याचार होत असताना राष्ट्रपती गप्प का होत्या? राजस्थान आणि महाराष्ट्रात आदिवासींवर होणाऱ्या कथित अत्याचारांबद्दल राष्ट्रपतींनी प्रश्न का उपस्थित केले नाहीत, असा प्रश्नही ममता बॅनर्जी यांनी विचारला.

दरम्यान, निवडणुकीपूर्वी राजकारण करू नका. राज्य सरकारने कोणताही कार्यक्रम थांबवण्याचा प्रयत्न केला नाही आणि त्याचा त्याच्याशी कोणताही संबंध नाही. माझ्या सरकारची प्राथमिकता राज्यातील जनतेचे कल्याण आहे, असे ममता बॅनर्जी यांनी सांगितले.

 

English
हिंदी सारांश
Web Title : Mamata Banerjee Counters President on Manipur; Questions Tribal Neglect

Web Summary : Mamata Banerjee criticized President Murmu, questioning her silence on Manipur tribal issues. She refuted claims of protocol breaches during Murmu's Bengal visit, stating lack of event details. Banerjee accused the President of furthering a BJP agenda and neglecting tribal welfare in other states.
टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीwest bengalपश्चिम बंगालPresidentराष्ट्राध्यक्षDraupadi Murmuद्रौपदी मुर्मू