शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

राजीव बॅनर्जी भ्रष्टाचारी, चोरी करून भाजपमध्ये पळाले; ममता बॅनर्जींचे टीकास्त्र

By देवेश फडके | Updated: February 3, 2021 19:45 IST

आता राजीव बॅनर्जी भ्रष्टाचारी असल्याचे सांगत त्यांच्याविरोधात कारवाई करण्याचा निर्णय ममता बॅनर्जी यांनी घेतला आहे. 

ठळक मुद्देराजीव बॅनर्जी यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप ममता बॅनर्जी यांचा तपास करण्याचा निर्णयममता बॅनर्जी यांच्या आरोपावर भाजपचा पलटवार

कोलकाता :ममता बॅनर्जी यांच्या सरकारमध्ये वनमंत्री असलेल्या राजीव बॅनर्जी यांनी केवळ मंत्रीपदाचा राजीनामा दिला नाही, तर तृणमूल काँग्रेसला सोडचिठ्ठी देत थेट भारतीय जनता पक्षात (भाजप) प्रवेश केला. राजीव बॅनर्जी यांचे हा निर्णय ममता बॅनर्जींसाठी खूपच धक्कादायक होता, असे मानले जात आहे. यातच आता राजीव बॅनर्जी भ्रष्टाचारी असल्याचे सांगत त्यांच्याविरोधात कारवाई करण्याचा निर्णय ममता बॅनर्जी यांनी घेतला आहे. 

राजीव बॅनर्जी यांनी मंत्री असताना भ्रष्टाचार केल्याचा आरोप ममता बॅनर्जी यांनी केला आहे. उत्तर बंगाल येथील अलीपूरद्वार जिल्ह्यात पक्ष कार्यकर्त्यांना संबोधित करत असताना ममता बॅनर्जी यांनी राजीव बॅनर्जी यांच्यावर टीका केली आहे. 

चोरी केली आणि भाजपमध्ये गेले

ती व्यक्ती आपल्यासोबत होती, जी आता आपल्याला सोडून गेली आहे. त्या व्यक्तीने सहाय्यक पदाच्या भरती प्रक्रियेत काहीतरी गडबड केली आहे. त्याने चोरी केली आणि भाजपमध्ये गेला. मला अनेकांच्या तक्रारी आल्या आहे. याचा तपास केला जात आहे. आगमी तीन ते चार दिवसांत निवडणुकांची घोषणा होऊ शकते. तरीही तपास सुरू राहील, असे ममता बॅनर्जी यांनी सांगितले.

 

दिल्ली हिंसाचाराच्या तपासात दखल देणार नाही; सुप्रीम कोर्टाकडून स्पष्ट

भाजपचा ममता बॅनर्जींवर पलटवार

ममता बॅनर्जी यांना त्यांचे वनमंत्री राजीव बॅनर्जी भ्रष्ट आहे, तर त्यांना भाजपमध्ये जाण्यापासून परावृत्त करण्यासाठी दूत का पाठवला होता, अशी विचारणा भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष प्रकाश मुजुमदार यांनी केली आहे. राजीव बॅनर्जी एक चांगली व्यक्ती आहे. ते एका चांगल्या कुटुंबातून आले आहेत. पश्चिम बंगालच्या जनता मुर्ख नाही. जनतेला सगळ्या गोष्टी ठाऊक आहेत. राजीव बॅनर्जी यांनी मंत्रिपदाचा राजीनामा आणि तृणमूल काँग्रेसला रामराम करत भाजपमध्ये प्रवेश केला, त्यामुळे त्यांना आता भ्रष्टाचारी ठरवले जात आहे, असा दावाही त्यांनी यावेळी केला. 

आम्हाला केंद्रात, राज्यात भाजपचे सरकार हवे

दरम्यान, पश्चिम बंगालमध्ये आम्हाला डबल इंजिन असलेले सरकार हवे आहे. सोनार बांगलासाठी केंद्रात आणि राज्यात म्हणजेच पश्चिम बंगालमध्ये भाजपचेच सरकार असणे गरजेचे आहे, असे भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर राजीव बॅनर्जी यांनी सांगितले. राजीव बॅनर्जी यांच्यानंतर दोनवेळा आमदार म्हणून निवडून आलेल्या दीपक हलदर यांनीही तृणमूल काँग्रेस सोडण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगितले.

 

टॅग्स :Politicsराजकारणwest bengalपश्चिम बंगालMamata Banerjeeममता बॅनर्जीtmcठाणे महापालिका