शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
3
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
4
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
5
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
6
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
7
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
8
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
9
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
10
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
11
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
12
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
13
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
14
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
15
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
16
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
17
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
18
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
19
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
20
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

राजीव बॅनर्जी भ्रष्टाचारी, चोरी करून भाजपमध्ये पळाले; ममता बॅनर्जींचे टीकास्त्र

By देवेश फडके | Updated: February 3, 2021 19:45 IST

आता राजीव बॅनर्जी भ्रष्टाचारी असल्याचे सांगत त्यांच्याविरोधात कारवाई करण्याचा निर्णय ममता बॅनर्जी यांनी घेतला आहे. 

ठळक मुद्देराजीव बॅनर्जी यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप ममता बॅनर्जी यांचा तपास करण्याचा निर्णयममता बॅनर्जी यांच्या आरोपावर भाजपचा पलटवार

कोलकाता :ममता बॅनर्जी यांच्या सरकारमध्ये वनमंत्री असलेल्या राजीव बॅनर्जी यांनी केवळ मंत्रीपदाचा राजीनामा दिला नाही, तर तृणमूल काँग्रेसला सोडचिठ्ठी देत थेट भारतीय जनता पक्षात (भाजप) प्रवेश केला. राजीव बॅनर्जी यांचे हा निर्णय ममता बॅनर्जींसाठी खूपच धक्कादायक होता, असे मानले जात आहे. यातच आता राजीव बॅनर्जी भ्रष्टाचारी असल्याचे सांगत त्यांच्याविरोधात कारवाई करण्याचा निर्णय ममता बॅनर्जी यांनी घेतला आहे. 

राजीव बॅनर्जी यांनी मंत्री असताना भ्रष्टाचार केल्याचा आरोप ममता बॅनर्जी यांनी केला आहे. उत्तर बंगाल येथील अलीपूरद्वार जिल्ह्यात पक्ष कार्यकर्त्यांना संबोधित करत असताना ममता बॅनर्जी यांनी राजीव बॅनर्जी यांच्यावर टीका केली आहे. 

चोरी केली आणि भाजपमध्ये गेले

ती व्यक्ती आपल्यासोबत होती, जी आता आपल्याला सोडून गेली आहे. त्या व्यक्तीने सहाय्यक पदाच्या भरती प्रक्रियेत काहीतरी गडबड केली आहे. त्याने चोरी केली आणि भाजपमध्ये गेला. मला अनेकांच्या तक्रारी आल्या आहे. याचा तपास केला जात आहे. आगमी तीन ते चार दिवसांत निवडणुकांची घोषणा होऊ शकते. तरीही तपास सुरू राहील, असे ममता बॅनर्जी यांनी सांगितले.

 

दिल्ली हिंसाचाराच्या तपासात दखल देणार नाही; सुप्रीम कोर्टाकडून स्पष्ट

भाजपचा ममता बॅनर्जींवर पलटवार

ममता बॅनर्जी यांना त्यांचे वनमंत्री राजीव बॅनर्जी भ्रष्ट आहे, तर त्यांना भाजपमध्ये जाण्यापासून परावृत्त करण्यासाठी दूत का पाठवला होता, अशी विचारणा भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष प्रकाश मुजुमदार यांनी केली आहे. राजीव बॅनर्जी एक चांगली व्यक्ती आहे. ते एका चांगल्या कुटुंबातून आले आहेत. पश्चिम बंगालच्या जनता मुर्ख नाही. जनतेला सगळ्या गोष्टी ठाऊक आहेत. राजीव बॅनर्जी यांनी मंत्रिपदाचा राजीनामा आणि तृणमूल काँग्रेसला रामराम करत भाजपमध्ये प्रवेश केला, त्यामुळे त्यांना आता भ्रष्टाचारी ठरवले जात आहे, असा दावाही त्यांनी यावेळी केला. 

आम्हाला केंद्रात, राज्यात भाजपचे सरकार हवे

दरम्यान, पश्चिम बंगालमध्ये आम्हाला डबल इंजिन असलेले सरकार हवे आहे. सोनार बांगलासाठी केंद्रात आणि राज्यात म्हणजेच पश्चिम बंगालमध्ये भाजपचेच सरकार असणे गरजेचे आहे, असे भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर राजीव बॅनर्जी यांनी सांगितले. राजीव बॅनर्जी यांच्यानंतर दोनवेळा आमदार म्हणून निवडून आलेल्या दीपक हलदर यांनीही तृणमूल काँग्रेस सोडण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगितले.

 

टॅग्स :Politicsराजकारणwest bengalपश्चिम बंगालMamata Banerjeeममता बॅनर्जीtmcठाणे महापालिका