शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

राजीव बॅनर्जी भ्रष्टाचारी, चोरी करून भाजपमध्ये पळाले; ममता बॅनर्जींचे टीकास्त्र

By देवेश फडके | Updated: February 3, 2021 19:45 IST

आता राजीव बॅनर्जी भ्रष्टाचारी असल्याचे सांगत त्यांच्याविरोधात कारवाई करण्याचा निर्णय ममता बॅनर्जी यांनी घेतला आहे. 

ठळक मुद्देराजीव बॅनर्जी यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप ममता बॅनर्जी यांचा तपास करण्याचा निर्णयममता बॅनर्जी यांच्या आरोपावर भाजपचा पलटवार

कोलकाता :ममता बॅनर्जी यांच्या सरकारमध्ये वनमंत्री असलेल्या राजीव बॅनर्जी यांनी केवळ मंत्रीपदाचा राजीनामा दिला नाही, तर तृणमूल काँग्रेसला सोडचिठ्ठी देत थेट भारतीय जनता पक्षात (भाजप) प्रवेश केला. राजीव बॅनर्जी यांचे हा निर्णय ममता बॅनर्जींसाठी खूपच धक्कादायक होता, असे मानले जात आहे. यातच आता राजीव बॅनर्जी भ्रष्टाचारी असल्याचे सांगत त्यांच्याविरोधात कारवाई करण्याचा निर्णय ममता बॅनर्जी यांनी घेतला आहे. 

राजीव बॅनर्जी यांनी मंत्री असताना भ्रष्टाचार केल्याचा आरोप ममता बॅनर्जी यांनी केला आहे. उत्तर बंगाल येथील अलीपूरद्वार जिल्ह्यात पक्ष कार्यकर्त्यांना संबोधित करत असताना ममता बॅनर्जी यांनी राजीव बॅनर्जी यांच्यावर टीका केली आहे. 

चोरी केली आणि भाजपमध्ये गेले

ती व्यक्ती आपल्यासोबत होती, जी आता आपल्याला सोडून गेली आहे. त्या व्यक्तीने सहाय्यक पदाच्या भरती प्रक्रियेत काहीतरी गडबड केली आहे. त्याने चोरी केली आणि भाजपमध्ये गेला. मला अनेकांच्या तक्रारी आल्या आहे. याचा तपास केला जात आहे. आगमी तीन ते चार दिवसांत निवडणुकांची घोषणा होऊ शकते. तरीही तपास सुरू राहील, असे ममता बॅनर्जी यांनी सांगितले.

 

दिल्ली हिंसाचाराच्या तपासात दखल देणार नाही; सुप्रीम कोर्टाकडून स्पष्ट

भाजपचा ममता बॅनर्जींवर पलटवार

ममता बॅनर्जी यांना त्यांचे वनमंत्री राजीव बॅनर्जी भ्रष्ट आहे, तर त्यांना भाजपमध्ये जाण्यापासून परावृत्त करण्यासाठी दूत का पाठवला होता, अशी विचारणा भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष प्रकाश मुजुमदार यांनी केली आहे. राजीव बॅनर्जी एक चांगली व्यक्ती आहे. ते एका चांगल्या कुटुंबातून आले आहेत. पश्चिम बंगालच्या जनता मुर्ख नाही. जनतेला सगळ्या गोष्टी ठाऊक आहेत. राजीव बॅनर्जी यांनी मंत्रिपदाचा राजीनामा आणि तृणमूल काँग्रेसला रामराम करत भाजपमध्ये प्रवेश केला, त्यामुळे त्यांना आता भ्रष्टाचारी ठरवले जात आहे, असा दावाही त्यांनी यावेळी केला. 

आम्हाला केंद्रात, राज्यात भाजपचे सरकार हवे

दरम्यान, पश्चिम बंगालमध्ये आम्हाला डबल इंजिन असलेले सरकार हवे आहे. सोनार बांगलासाठी केंद्रात आणि राज्यात म्हणजेच पश्चिम बंगालमध्ये भाजपचेच सरकार असणे गरजेचे आहे, असे भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर राजीव बॅनर्जी यांनी सांगितले. राजीव बॅनर्जी यांच्यानंतर दोनवेळा आमदार म्हणून निवडून आलेल्या दीपक हलदर यांनीही तृणमूल काँग्रेस सोडण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगितले.

 

टॅग्स :Politicsराजकारणwest bengalपश्चिम बंगालMamata Banerjeeममता बॅनर्जीtmcठाणे महापालिका