शहरं
Join us  
Trending Stories
1
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
2
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
3
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
4
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
5
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
6
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
7
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
8
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
9
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
10
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
11
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

राजीव बॅनर्जी भ्रष्टाचारी, चोरी करून भाजपमध्ये पळाले; ममता बॅनर्जींचे टीकास्त्र

By देवेश फडके | Updated: February 3, 2021 19:45 IST

आता राजीव बॅनर्जी भ्रष्टाचारी असल्याचे सांगत त्यांच्याविरोधात कारवाई करण्याचा निर्णय ममता बॅनर्जी यांनी घेतला आहे. 

ठळक मुद्देराजीव बॅनर्जी यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप ममता बॅनर्जी यांचा तपास करण्याचा निर्णयममता बॅनर्जी यांच्या आरोपावर भाजपचा पलटवार

कोलकाता :ममता बॅनर्जी यांच्या सरकारमध्ये वनमंत्री असलेल्या राजीव बॅनर्जी यांनी केवळ मंत्रीपदाचा राजीनामा दिला नाही, तर तृणमूल काँग्रेसला सोडचिठ्ठी देत थेट भारतीय जनता पक्षात (भाजप) प्रवेश केला. राजीव बॅनर्जी यांचे हा निर्णय ममता बॅनर्जींसाठी खूपच धक्कादायक होता, असे मानले जात आहे. यातच आता राजीव बॅनर्जी भ्रष्टाचारी असल्याचे सांगत त्यांच्याविरोधात कारवाई करण्याचा निर्णय ममता बॅनर्जी यांनी घेतला आहे. 

राजीव बॅनर्जी यांनी मंत्री असताना भ्रष्टाचार केल्याचा आरोप ममता बॅनर्जी यांनी केला आहे. उत्तर बंगाल येथील अलीपूरद्वार जिल्ह्यात पक्ष कार्यकर्त्यांना संबोधित करत असताना ममता बॅनर्जी यांनी राजीव बॅनर्जी यांच्यावर टीका केली आहे. 

चोरी केली आणि भाजपमध्ये गेले

ती व्यक्ती आपल्यासोबत होती, जी आता आपल्याला सोडून गेली आहे. त्या व्यक्तीने सहाय्यक पदाच्या भरती प्रक्रियेत काहीतरी गडबड केली आहे. त्याने चोरी केली आणि भाजपमध्ये गेला. मला अनेकांच्या तक्रारी आल्या आहे. याचा तपास केला जात आहे. आगमी तीन ते चार दिवसांत निवडणुकांची घोषणा होऊ शकते. तरीही तपास सुरू राहील, असे ममता बॅनर्जी यांनी सांगितले.

 

दिल्ली हिंसाचाराच्या तपासात दखल देणार नाही; सुप्रीम कोर्टाकडून स्पष्ट

भाजपचा ममता बॅनर्जींवर पलटवार

ममता बॅनर्जी यांना त्यांचे वनमंत्री राजीव बॅनर्जी भ्रष्ट आहे, तर त्यांना भाजपमध्ये जाण्यापासून परावृत्त करण्यासाठी दूत का पाठवला होता, अशी विचारणा भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष प्रकाश मुजुमदार यांनी केली आहे. राजीव बॅनर्जी एक चांगली व्यक्ती आहे. ते एका चांगल्या कुटुंबातून आले आहेत. पश्चिम बंगालच्या जनता मुर्ख नाही. जनतेला सगळ्या गोष्टी ठाऊक आहेत. राजीव बॅनर्जी यांनी मंत्रिपदाचा राजीनामा आणि तृणमूल काँग्रेसला रामराम करत भाजपमध्ये प्रवेश केला, त्यामुळे त्यांना आता भ्रष्टाचारी ठरवले जात आहे, असा दावाही त्यांनी यावेळी केला. 

आम्हाला केंद्रात, राज्यात भाजपचे सरकार हवे

दरम्यान, पश्चिम बंगालमध्ये आम्हाला डबल इंजिन असलेले सरकार हवे आहे. सोनार बांगलासाठी केंद्रात आणि राज्यात म्हणजेच पश्चिम बंगालमध्ये भाजपचेच सरकार असणे गरजेचे आहे, असे भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर राजीव बॅनर्जी यांनी सांगितले. राजीव बॅनर्जी यांच्यानंतर दोनवेळा आमदार म्हणून निवडून आलेल्या दीपक हलदर यांनीही तृणमूल काँग्रेस सोडण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगितले.

 

टॅग्स :Politicsराजकारणwest bengalपश्चिम बंगालMamata Banerjeeममता बॅनर्जीtmcठाणे महापालिका