शहरं
Join us  
Trending Stories
1
आयटी पार्क पुण्यातून बाहेर चालले..! अजित पवारांनी हिंजवडीच्या सरपंचांनाही सुनावले खडेबोल
2
२६ जुलै हा दिवस मुंबईकर कधीच विसरू शकत नाही! २० वर्षापूर्वी काय घडलं होतं त्या दिवशी?
3
Thailand- Cambodia Conflict :'सीमेवर प्रवास टाळा', थायलंड- कंबोडिया संघर्षादरम्यान भारताच्या पर्यटकांसाठी दूतावासाने सूचना दिल्या
4
विवाहित वर्गमैत्रिणीला भेटला; पत्नीला घटस्फोट देत तिच्यासोबत लिव्ह इनमध्ये राहिला, मग जे घडलं...
5
कॉलेजला जाण्यापूर्वी हवी होती लीन बॉडी; ऑनलाईन ट्रेंड, लिक्विड डाएट बेतलं जीवावर, मुलाचा मृत्यू
6
आता सैनिकांसाठी अरबी भाषा आणि इस्लाम शिकणे अनिवार्य, इस्रायलचा मोठा निर्णय! कारण काय?
7
अरेरे! 'सैयारा' पाहून तुफान राडा; गर्लफ्रेंडसाठी थिएटरबाहेर भिडले २ तरुण, लाथा-बुक्क्यांनी मारहाण
8
Rain Update : ठाणे, रायगड, मुंबईत मुसळधार, ऑरेंज अलर्ट, पालघरसाठी रेड अलर्ट, भरती-ओहोटीबाबतही इशारा
9
५ वर्षांत १० पट वाढला TATA Sons चा नफा; समूहाच्या 'या' कंपनीनं केली सर्वाधिक कमाई, तुमच्याकडे स्टॉक आहे का?
10
'मला बुटाने मारा', सिद्धरामय्या अन् शिवकुमार यांच्या विशेष अधिकाऱ्यांमध्ये दिल्लीत हाणामारी; कारण काय?
11
शाहरुख फिटनेससाठी कोणते पदार्थ खात नाही? किती वाजता झोपतो? काय जेवतो? जाणून घ्या एका क्लिकवर
12
पहिल्यांदा नोकरी करणाऱ्यांना सरकार देणार १५ हजार रुपये; फक्त पूर्ण कराव्या लागतील 'या' २ अटी
13
"तुम्हाला आनंद देणाऱ्या गोष्टींवरदेखील खर्च करा..," राधिका गुप्ता यांनी दिला हृदयस्पर्शी सल्ला
14
आमदार रोहित पवारांच्या अडचणीत वाढ; मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीकडून मोठी कारवाई
15
महायुतीत २ मंत्र्यांमध्ये रंगलं मानापमान नाट्य; शिंदेसेनेचे मंत्री नाराज, भाजपा मंत्र्यांचा पलटवार
16
सुनील शेट्टीने 'हेरा फेरी ३'मधील परेश रावलच्या एंट्रीवर दिली प्रतिक्रिया, म्हणाली- "नजर लागते..."
17
२ मुलांना विष पाजलं, पत्नीचा गळा दाबला अन् मग पतीने...; एकाच कुटुंबातील चौघांची जीवनयात्रा संपली
18
धक्कादायक घटना! एक वर्षाच्या मुलाने नागाचा चावा घेतला, कोब्राचा मृत्यू झाला; पण मुलगाही...
19
पाकिस्तानने अमेरिकेसमोर TRF'वर सूर बदलला! म्हणाले, आम्हाला काही हरकत नाही', हुशारीही दाखवली
20
₹३० वरुन ₹३००० पार गेला हा शेअर; आता कंपनीनं मोठ्या गुंतवणुकीची केली घोषणा, तुमच्याकडे आहे का?

Mamata Banerjee: “दिल्लीत आल्यावर सोनिया गांधींना भेटलंच पाहिजे असा नियम आहे का”; ममता दीदी संतापल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2021 11:32 IST

मी केवळ पंतप्रधान मोदींकडे भेटीसाठी वेळ मागितली होती, असे ममता बॅनर्जी यांनी स्पष्ट केले.

नवी दिल्ली: पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) दिल्ली दौऱ्यावर आल्या होत्या. संसदेचे हिवाळी अधिवेशन आणि एकंदरीत देशातील राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर ममता बॅनर्जी यांचा दौरा अतिशय महत्त्वाचा मानला जात आहे. या दौऱ्यादरम्यान ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची भेट घेतली. यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना ममता बॅनर्जी यांना काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांना भेटण्याबाबत प्रश्न विचारण्यात आला. यावेळी ममता बॅनर्जी संतापल्या आणि दिल्लीत आल्यावर सोनिया गांधी यांची भेट घेतलीच पाहिजे असे भारतीय घटनेत लिहिले आहे का, अशी खोचक विचारणा ममता दीदींनी केली. 

दिल्ली दौऱ्यावर असलेल्या ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावेळी ममता बॅनर्जी सीमा सुरक्षा दलाच्या अधिकारक्षेत्रातील वाढ आणि त्रिपुरामध्ये होत असलेल्या अत्याचाराचा मुद्दा उपस्थित केल्याचे सांगितले जात आहे. दुसरीकडे ममता बॅनर्जी तृणमूल काँग्रेसचा पक्षविस्तार करण्याच्या दृष्टीने अनेक योजना आखत असून, त्यादृष्टीने पावले उचचली जात असल्याचे सांगितले जात आहे. यातच दिल्लीतील पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी काँग्रेसबाबत विचारलेल्या प्रश्नावर त्या संतप्त झाल्याचे पाहायला मिळाले. 

सोनिया गांधींना भेटणे घटनात्मकदृष्ट्या बंधनकारक आहे का?

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या भेटीबाबत ममता बॅनर्जी यांना विचारण्यात आले. दिल्लीत आल्यावर मी केवळ पंतप्रधान मोदींकडे भेटीसाठी वेळ मागितली होती. सगळे नेते आगामी पंजाब विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर व्यस्त आहेत. ठरवलेल्या कामांना प्रथम प्राधान्य देऊन ती पूर्ण करण्यावर भर जास्त आहे. दिल्लीत आल्यावर प्रत्येक वेळी सोनिया गांधी यांची भेट का घ्यायची, सोनिया गांधींना भेटणे घटनात्मकदृष्ट्या बंधनकारक आहे का, अशी खोचक विचारणा ममता बॅनर्जी यांनी केली. तसेच उत्तर प्रदेशमधील आगामी निवडणुकांमध्ये भाजपला पराभूत करण्यासाठी काही मदत हवी असल्यास तृणमूल काँग्रेस त्यासाठी तयार आहे. अखिलेश यादव यांना काही मदत हवी असल्यास आवश्य सांगावे, असेही त्या म्हणाल्या. 

मेघालयमध्ये काँग्रेसला भगदाड

ईशान्य भारतातील मेघालयमध्ये तृणमूलने काँग्रेसला खिंडार पाडले आहे. मेघालयमध्ये काँग्रेसच्या १८ आमदारांपैकी तब्बल १२ आमदारांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. काँग्रेस सोडून तृणमूल काँग्रेसमध्ये जाणाऱ्यांमध्ये काँग्रेसचे नेते आणि मेघालयचे माजी मुख्यमंत्री मुकुल संगमा यांचाही समावेश आहे. काँग्रेसमधून तृणमूल काँग्रेसमध्ये  घाऊक प्रमाणात झालेला पक्षप्रवेश हा काँग्रेससाठी मोठा धक्का मानला जात आहे.

दरम्यान, ३० नोव्हेंबरला ममता बॅनर्जी मुंबईत येणार आहेत. १ डिझेंबरला बिझनेस इव्हेंटमध्ये त्या सहभागी होतील. ममता बॅनर्जी या दौऱ्यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचीही भेट घेणार आहेत.  

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीSonia Gandhiसोनिया गांधी