शहरं
Join us  
Trending Stories
1
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
2
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
3
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
4
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
5
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
6
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
7
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
8
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
9
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
10
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
11
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
12
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
13
VIDEO: पाहावं ते नवलंच... मुलीने चक्क केली ख्रिसमस ट्री हेअरस्टाईल, नेटकऱ्यांना हसू आवरेना
14
बेस प्राईस अवघी ३० लाख, पण लिलावात या ५ खेळाडूंवर पडला पैशांचा पाऊस, बनले करोडपती
15
गीझर-हीटरमुळे तुमचे वीज बिल जास्त येतंय? या स्मार्ट टिप्स वापरून पैसे वाचवा
16
IPL 2026: ऑक्शनमध्ये चेन्नईचा मोठा डाव! १४ कोटी खर्च केले, पण परफेक्ट खेळाडू निवडला, धोनीची जागा घेणार?
17
BJP Assets: 2014 पूर्वी भाजपाच्या तिजोरीत किती पैसा होता? 11 वर्षांत किती वाढला? जाणून थक्क व्हाल!
18
आत्मनिर्भर भारताच्या दिशेने मोठे पाऊल, भारतातील पहिला स्वदेशी 64- बिट मायक्रोप्रोसेसर Dhruv64 लाँच
19
तब्बल ८ कोटी २० लाखांची बोली, दिल्ली कॅपिटल्सने संघात घेतलेला अकीब नबी दार कोण?
20
बाँडी बिचवर हल्ला करणाऱ्या साजिदचं भारताशी कनेक्शन समोर, २७ वर्षांपूर्वी सोडलं होतं हैदराबाद
Daily Top 2Weekly Top 5

Mamata Banerjee: “दिल्लीत आल्यावर सोनिया गांधींना भेटलंच पाहिजे असा नियम आहे का”; ममता दीदी संतापल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2021 11:32 IST

मी केवळ पंतप्रधान मोदींकडे भेटीसाठी वेळ मागितली होती, असे ममता बॅनर्जी यांनी स्पष्ट केले.

नवी दिल्ली: पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) दिल्ली दौऱ्यावर आल्या होत्या. संसदेचे हिवाळी अधिवेशन आणि एकंदरीत देशातील राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर ममता बॅनर्जी यांचा दौरा अतिशय महत्त्वाचा मानला जात आहे. या दौऱ्यादरम्यान ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची भेट घेतली. यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना ममता बॅनर्जी यांना काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांना भेटण्याबाबत प्रश्न विचारण्यात आला. यावेळी ममता बॅनर्जी संतापल्या आणि दिल्लीत आल्यावर सोनिया गांधी यांची भेट घेतलीच पाहिजे असे भारतीय घटनेत लिहिले आहे का, अशी खोचक विचारणा ममता दीदींनी केली. 

दिल्ली दौऱ्यावर असलेल्या ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावेळी ममता बॅनर्जी सीमा सुरक्षा दलाच्या अधिकारक्षेत्रातील वाढ आणि त्रिपुरामध्ये होत असलेल्या अत्याचाराचा मुद्दा उपस्थित केल्याचे सांगितले जात आहे. दुसरीकडे ममता बॅनर्जी तृणमूल काँग्रेसचा पक्षविस्तार करण्याच्या दृष्टीने अनेक योजना आखत असून, त्यादृष्टीने पावले उचचली जात असल्याचे सांगितले जात आहे. यातच दिल्लीतील पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी काँग्रेसबाबत विचारलेल्या प्रश्नावर त्या संतप्त झाल्याचे पाहायला मिळाले. 

सोनिया गांधींना भेटणे घटनात्मकदृष्ट्या बंधनकारक आहे का?

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या भेटीबाबत ममता बॅनर्जी यांना विचारण्यात आले. दिल्लीत आल्यावर मी केवळ पंतप्रधान मोदींकडे भेटीसाठी वेळ मागितली होती. सगळे नेते आगामी पंजाब विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर व्यस्त आहेत. ठरवलेल्या कामांना प्रथम प्राधान्य देऊन ती पूर्ण करण्यावर भर जास्त आहे. दिल्लीत आल्यावर प्रत्येक वेळी सोनिया गांधी यांची भेट का घ्यायची, सोनिया गांधींना भेटणे घटनात्मकदृष्ट्या बंधनकारक आहे का, अशी खोचक विचारणा ममता बॅनर्जी यांनी केली. तसेच उत्तर प्रदेशमधील आगामी निवडणुकांमध्ये भाजपला पराभूत करण्यासाठी काही मदत हवी असल्यास तृणमूल काँग्रेस त्यासाठी तयार आहे. अखिलेश यादव यांना काही मदत हवी असल्यास आवश्य सांगावे, असेही त्या म्हणाल्या. 

मेघालयमध्ये काँग्रेसला भगदाड

ईशान्य भारतातील मेघालयमध्ये तृणमूलने काँग्रेसला खिंडार पाडले आहे. मेघालयमध्ये काँग्रेसच्या १८ आमदारांपैकी तब्बल १२ आमदारांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. काँग्रेस सोडून तृणमूल काँग्रेसमध्ये जाणाऱ्यांमध्ये काँग्रेसचे नेते आणि मेघालयचे माजी मुख्यमंत्री मुकुल संगमा यांचाही समावेश आहे. काँग्रेसमधून तृणमूल काँग्रेसमध्ये  घाऊक प्रमाणात झालेला पक्षप्रवेश हा काँग्रेससाठी मोठा धक्का मानला जात आहे.

दरम्यान, ३० नोव्हेंबरला ममता बॅनर्जी मुंबईत येणार आहेत. १ डिझेंबरला बिझनेस इव्हेंटमध्ये त्या सहभागी होतील. ममता बॅनर्जी या दौऱ्यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचीही भेट घेणार आहेत.  

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीSonia Gandhiसोनिया गांधी