शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
3
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
7
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
8
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
9
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
10
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
11
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
12
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
13
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
14
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
15
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
16
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
17
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
18
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
19
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
20
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

चंद्राबाबूंनी जोडप्यांना दिला अधिकाधिक मुलं जन्माला घालण्याचा सल्ला, नवीन कायदाही आणणार, नेमकं कारण काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2024 14:04 IST

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू यांनी राज्यातील कुटुंबांना अधिक मुले जन्माला घालण्याचे आवाहन केले आहे.

दक्षिणेकडील राज्यांमध्ये प्रजनन दर १.६ वर घसरला आहे, हा दर राष्ट्रीय स्तरावरील दर २.१ पेक्षा कमी आहे. यावरुन आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी राज्यातील नागरिकांना आवाहन केले आहे. जास्त मुले जन्माला घालण्याबाबत राज्य सरकार नवीन कायदा आणू शकते. 

काल एका कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री नायडू यांनी राज्यातील वृद्धांची वाढती लोकसंख्या लक्षात घेता जोडप्यांना अधिक मुले जन्माला घालण्याचा सल्ला दिला आहे. तसेच चंद्राबाबू नायडू यांनी यावेळी वृद्धांच्या वाढत्या संख्येवर चिंता व्यक्त करत वृद्धांची संख्या वाढण्याचा धोकाही नमूद केला. मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी विशेषतः दक्षिणेकडील राज्यामधील कुटुंबांना अधिक मुले जन्माला घालण्याचे आवाहन केले आहे.

काँग्रेस पोटनिवडणुकीतून मागे हटण्याच्या तयारीत? २-५ जागांवरून बिनसले; सपा एकटी लढण्याची शक्यता

मुख्यमंत्री नायडू म्हणाले की, राज्य सरकार असा कायदा आणू शकते ज्याच्या अंतर्गत दोनपेक्षा जास्त अपत्ये असलेल्यांनाच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवता येतील. अधिक मुले असलेल्या कुटुंबांना अतिरिक्त लाभ देऊन मोठ्या कुटुंबांना प्रोत्साहन देणे हा या प्रस्तावाचा उद्देश आहे.

मागील कायद्याने दोनपेक्षा जास्त मुले असलेल्या लोकांना स्थानिक निवडणूक लढविण्यास प्रतिबंध केला होता, परंतु तो रद्द करण्यात आला असल्याचे सांगितले. राज्याच्या लोकसंख्येच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी हा निर्णय मागे घेण्याची सूचना त्यांनी केली.

मुख्यमंत्री नायडू यांनी आंध्र प्रदेशातील परिस्थिती आणि जपान, चीन आणि युरोपमधील काही भाग यांच्यात समांतरता सांगितली, ते आधीच मोठ्या वृद्ध लोकसंख्येशी झगडत आहेत. जन्मदर कमी होत राहिल्यास भारतालाही अशाच आव्हानांना सामोरे जावे लागू शकते, असा इशारा त्यांनी दिला. नायडू यांनी सांगितले की, आंध्र प्रदेश आणि भारताच्या इतर भागांतील अनेक गावांमध्ये वृद्ध लोकांची लोकवस्ती आहे, कारण तरुण पिढी चांगल्या संधींच्या शोधात शहरी भागात स्थलांतरित होत आहे.

कुटुंब नियोजन धोरणांमध्ये बदल करण्याचे मुख्यमंत्री नायडूंचे हे पहिले आवाहन नाही. मुख्यमंत्रिपदाच्या त्यांच्या मागील कार्यकाळात त्यांनी दोन पेक्षा जास्त मुले जन्माला घालू इच्छिणाऱ्या जोडप्यांना प्रोत्साहन दिले होते. 

२०११ मधील जनगणनेच्या आकडेवारीनुसार, आंध्र प्रदेश ८४.६ मिलियन रहिवाशांसह १० वे सर्वाधिक लोकसंख्येचे राज्य आहे. २०१४ मध्ये तेलंगणा वेगळे राज्य झाल्यापासून, आंध्र प्रदेशमध्ये लक्षणीय लोकसंख्याशास्त्रीय बदल झाले आहेत. याबाबत मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांनी चिंता व्यक्त केली आहे.

टॅग्स :Chandrababu Naiduचंद्राबाबू नायडूAndhra Pradeshआंध्र प्रदेश