शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
'संबंध ठेवण्यापूर्वी कुंडली जुळवायची होती!'; पोलिस अधिकाऱ्यांच्या हायप्रोफाईल प्रकरणावर सुप्रीम कोर्टाची उपरोधिक टिप्पणी
3
"माझ्यापेक्षा मोठा गुंड नाही"; भाजपाच्या आजी-माजी खासदारांमध्येच जुंपली, एकमेकांना भिडले अन्...
4
Zohrab Mamdani: न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
5
“स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीमध्ये समन्वय साधून अंतिम निर्णय”: सुनील तटकरे
6
'जप्त केलेल्या मालमत्ता आणि थकीत कर्जाची माहिती द्या,' विजय माल्ल्यानं न्यायालयात काय म्हटलं?
7
Astrology: नशिबात नसलेल्या गोष्टीही स्वामीकृपेने मिळवता येतात का? ज्योतिष शास्त्र काय सांगते? पाहू
8
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
9
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
10
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
11
“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी
12
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
13
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
14
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
15
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
16
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
17
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
18
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
19
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
20
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी

Ashok Gehlot: “राहुल गांधी एक जननायक आहेत, पंतप्रधान मोदींसमोर केवळ तेच असल्याचे देशाने मान्य केलेय”

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2023 18:07 IST

Ashok Gehlot: संपूर्ण विरोधक एकवटले आहेत. राहुल गांधींच्या रुपात एक अद्भुत नेता काँग्रेसकडे आहे, अशी स्तुती करण्यात आली आहे.

Ashok Gehlot:काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेची अलीकडेच सांगता झाली. यानंतर राहुल गांधी यांनी संसदेत अदानी समूहासंदर्भात हिंडेनबर्ग संस्थेने दिलेल्या अहवालावरून केंद्रातील मोदी सरकार आणि भाजपवर सडकून टीका केली. यानंतर अनेक काँग्रेस नेत्यांनी तसेच विरोधी पक्षातील नेत्यांनी राहुल गांधी यांचे कौतुक केले. यातच राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी राहुल गांधी यांच्यावर स्तुतिसुमने उधळली आहेत. राहुल गांधी एक जननायक आहेत. पंतप्रधान मोदींसमोर केवळ तेच सक्षम असल्याचे देशाने मान्य केले आहे, असा दावा अशोक गहलोत यांनी केला आहे. 

मोदींसमोर केवळ राहुल गांधीच आहेत. आमच्या नेत्यांबद्दल माझ्या मनात आदर आहे. मात्र वस्तुस्थिती ही आहे की, काँग्रेसच एकमेव राष्ट्रीय पक्ष आहे आणि राहुल गांधींच्या रुपात एक अद्भुत नेता काँग्रेसकडे आहे. भारत जोडो यात्रेनंतर राहुल गांधी हे एक जननायक म्हणून सर्वांसमोर आले आहेत, असे अशोक गहलोत म्हणाले. काँग्रेस एक अखिल भारतीय आणि खरी राष्ट्रीय पार्टी आहे. ती प्रत्येक गावात आहे, असेही गहलोत यांनी सांगितले. 

जेव्हा जनता ठरवते, तेव्हा काहीही होऊ शकते

भाजप आता सत्तेत आहे, मात्र एक काळ होता जेव्हा त्यांच्याकडे संसदेत केवळ दोन जागा होत्या. म्हणून जागांच्या संख्येवर नाही गेले पाहिजे, जेव्हा जनता ठरवते तेव्हा काहीही होऊ शकते. मुद्दे सर्वच पक्षांसाठी समान आहेत. अदानी तर सोडा. अहिंसा, महागाई, बेरोजगारीचे मुद्दे आहेत. पंतप्रधान बोलण्यात चतुर आहेत, तर चतुराई कधीपर्यंत चालणार? अशी विचारणा अशोक गहलोत यांनी केली. तसेच संपूर्ण विरोधक एकवटले आहेत. तुम्ही जनतेचा मूड कधीच ओळखू शकत नाहीत. इंदिरा गांधींच्या काळात पाहिला आहे. अटल बिहारी वाजपेयींच्या काळातही इंडिया शायनिंग अॅण्ड फील गुडची चर्चा व्हायची. कुणालाही वाटत नव्हते की, वाजपेयी सरकार पराभूत होऊ शकते. मात्र ते पराभूत झाले. देश याचा साक्षीदार आहे, असे गहलोत यांनी नमूद केले. 

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विरोधकांचा दृष्टिकोन समजून घेण्याचा प्रयत्न करायल हवा. तुम्हाला २०१४ मध्ये ३१ टक्के मते मिळाली होती. २०१९ मध्ये ती वाढली. मात्र तुम्हाला १०० टक्के मते मिळालेली नाहीत. जनतेमधील एका मोठ्या वर्गाने तुमच्या विरोधात मतदान केले आहे. त्यांनी विरोधी पक्षांना मत दिले आहे, त्यामुळे पंतप्रधांनांनी विरोधकांचा आदर केला पाहिजे आणि त्यांचे म्हणणे समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे, अशी अपेक्षा अशोक गहलोत यांनी व्यक्त केली. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Ashok Gahlotअशोक गहलोतRahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेस