शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
2
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
3
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
4
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
5
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
6
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
7
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
8
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
9
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
10
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
11
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
12
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
13
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
14
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
15
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
16
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
17
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
18
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
19
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
20
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय

Ashok Gehlot: “राहुल गांधी एक जननायक आहेत, पंतप्रधान मोदींसमोर केवळ तेच असल्याचे देशाने मान्य केलेय”

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2023 18:07 IST

Ashok Gehlot: संपूर्ण विरोधक एकवटले आहेत. राहुल गांधींच्या रुपात एक अद्भुत नेता काँग्रेसकडे आहे, अशी स्तुती करण्यात आली आहे.

Ashok Gehlot:काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेची अलीकडेच सांगता झाली. यानंतर राहुल गांधी यांनी संसदेत अदानी समूहासंदर्भात हिंडेनबर्ग संस्थेने दिलेल्या अहवालावरून केंद्रातील मोदी सरकार आणि भाजपवर सडकून टीका केली. यानंतर अनेक काँग्रेस नेत्यांनी तसेच विरोधी पक्षातील नेत्यांनी राहुल गांधी यांचे कौतुक केले. यातच राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी राहुल गांधी यांच्यावर स्तुतिसुमने उधळली आहेत. राहुल गांधी एक जननायक आहेत. पंतप्रधान मोदींसमोर केवळ तेच सक्षम असल्याचे देशाने मान्य केले आहे, असा दावा अशोक गहलोत यांनी केला आहे. 

मोदींसमोर केवळ राहुल गांधीच आहेत. आमच्या नेत्यांबद्दल माझ्या मनात आदर आहे. मात्र वस्तुस्थिती ही आहे की, काँग्रेसच एकमेव राष्ट्रीय पक्ष आहे आणि राहुल गांधींच्या रुपात एक अद्भुत नेता काँग्रेसकडे आहे. भारत जोडो यात्रेनंतर राहुल गांधी हे एक जननायक म्हणून सर्वांसमोर आले आहेत, असे अशोक गहलोत म्हणाले. काँग्रेस एक अखिल भारतीय आणि खरी राष्ट्रीय पार्टी आहे. ती प्रत्येक गावात आहे, असेही गहलोत यांनी सांगितले. 

जेव्हा जनता ठरवते, तेव्हा काहीही होऊ शकते

भाजप आता सत्तेत आहे, मात्र एक काळ होता जेव्हा त्यांच्याकडे संसदेत केवळ दोन जागा होत्या. म्हणून जागांच्या संख्येवर नाही गेले पाहिजे, जेव्हा जनता ठरवते तेव्हा काहीही होऊ शकते. मुद्दे सर्वच पक्षांसाठी समान आहेत. अदानी तर सोडा. अहिंसा, महागाई, बेरोजगारीचे मुद्दे आहेत. पंतप्रधान बोलण्यात चतुर आहेत, तर चतुराई कधीपर्यंत चालणार? अशी विचारणा अशोक गहलोत यांनी केली. तसेच संपूर्ण विरोधक एकवटले आहेत. तुम्ही जनतेचा मूड कधीच ओळखू शकत नाहीत. इंदिरा गांधींच्या काळात पाहिला आहे. अटल बिहारी वाजपेयींच्या काळातही इंडिया शायनिंग अॅण्ड फील गुडची चर्चा व्हायची. कुणालाही वाटत नव्हते की, वाजपेयी सरकार पराभूत होऊ शकते. मात्र ते पराभूत झाले. देश याचा साक्षीदार आहे, असे गहलोत यांनी नमूद केले. 

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विरोधकांचा दृष्टिकोन समजून घेण्याचा प्रयत्न करायल हवा. तुम्हाला २०१४ मध्ये ३१ टक्के मते मिळाली होती. २०१९ मध्ये ती वाढली. मात्र तुम्हाला १०० टक्के मते मिळालेली नाहीत. जनतेमधील एका मोठ्या वर्गाने तुमच्या विरोधात मतदान केले आहे. त्यांनी विरोधी पक्षांना मत दिले आहे, त्यामुळे पंतप्रधांनांनी विरोधकांचा आदर केला पाहिजे आणि त्यांचे म्हणणे समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे, अशी अपेक्षा अशोक गहलोत यांनी व्यक्त केली. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Ashok Gahlotअशोक गहलोतRahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेस