शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
6
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
9
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
10
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
11
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
12
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
13
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
14
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
15
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
16
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
17
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
18
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
19
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
20
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...

Ashok Gehlot: “राहुल गांधी एक जननायक आहेत, पंतप्रधान मोदींसमोर केवळ तेच असल्याचे देशाने मान्य केलेय”

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2023 18:07 IST

Ashok Gehlot: संपूर्ण विरोधक एकवटले आहेत. राहुल गांधींच्या रुपात एक अद्भुत नेता काँग्रेसकडे आहे, अशी स्तुती करण्यात आली आहे.

Ashok Gehlot:काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेची अलीकडेच सांगता झाली. यानंतर राहुल गांधी यांनी संसदेत अदानी समूहासंदर्भात हिंडेनबर्ग संस्थेने दिलेल्या अहवालावरून केंद्रातील मोदी सरकार आणि भाजपवर सडकून टीका केली. यानंतर अनेक काँग्रेस नेत्यांनी तसेच विरोधी पक्षातील नेत्यांनी राहुल गांधी यांचे कौतुक केले. यातच राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी राहुल गांधी यांच्यावर स्तुतिसुमने उधळली आहेत. राहुल गांधी एक जननायक आहेत. पंतप्रधान मोदींसमोर केवळ तेच सक्षम असल्याचे देशाने मान्य केले आहे, असा दावा अशोक गहलोत यांनी केला आहे. 

मोदींसमोर केवळ राहुल गांधीच आहेत. आमच्या नेत्यांबद्दल माझ्या मनात आदर आहे. मात्र वस्तुस्थिती ही आहे की, काँग्रेसच एकमेव राष्ट्रीय पक्ष आहे आणि राहुल गांधींच्या रुपात एक अद्भुत नेता काँग्रेसकडे आहे. भारत जोडो यात्रेनंतर राहुल गांधी हे एक जननायक म्हणून सर्वांसमोर आले आहेत, असे अशोक गहलोत म्हणाले. काँग्रेस एक अखिल भारतीय आणि खरी राष्ट्रीय पार्टी आहे. ती प्रत्येक गावात आहे, असेही गहलोत यांनी सांगितले. 

जेव्हा जनता ठरवते, तेव्हा काहीही होऊ शकते

भाजप आता सत्तेत आहे, मात्र एक काळ होता जेव्हा त्यांच्याकडे संसदेत केवळ दोन जागा होत्या. म्हणून जागांच्या संख्येवर नाही गेले पाहिजे, जेव्हा जनता ठरवते तेव्हा काहीही होऊ शकते. मुद्दे सर्वच पक्षांसाठी समान आहेत. अदानी तर सोडा. अहिंसा, महागाई, बेरोजगारीचे मुद्दे आहेत. पंतप्रधान बोलण्यात चतुर आहेत, तर चतुराई कधीपर्यंत चालणार? अशी विचारणा अशोक गहलोत यांनी केली. तसेच संपूर्ण विरोधक एकवटले आहेत. तुम्ही जनतेचा मूड कधीच ओळखू शकत नाहीत. इंदिरा गांधींच्या काळात पाहिला आहे. अटल बिहारी वाजपेयींच्या काळातही इंडिया शायनिंग अॅण्ड फील गुडची चर्चा व्हायची. कुणालाही वाटत नव्हते की, वाजपेयी सरकार पराभूत होऊ शकते. मात्र ते पराभूत झाले. देश याचा साक्षीदार आहे, असे गहलोत यांनी नमूद केले. 

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विरोधकांचा दृष्टिकोन समजून घेण्याचा प्रयत्न करायल हवा. तुम्हाला २०१४ मध्ये ३१ टक्के मते मिळाली होती. २०१९ मध्ये ती वाढली. मात्र तुम्हाला १०० टक्के मते मिळालेली नाहीत. जनतेमधील एका मोठ्या वर्गाने तुमच्या विरोधात मतदान केले आहे. त्यांनी विरोधी पक्षांना मत दिले आहे, त्यामुळे पंतप्रधांनांनी विरोधकांचा आदर केला पाहिजे आणि त्यांचे म्हणणे समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे, अशी अपेक्षा अशोक गहलोत यांनी व्यक्त केली. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Ashok Gahlotअशोक गहलोतRahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेस