शहरं
Join us  
Trending Stories
1
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
2
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
3
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
4
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
5
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
6
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
7
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
8
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
9
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
10
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
11
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
12
पितृपक्ष २०२५: ‘ही’ ५ कामे अवश्य करा, लक्ष्मी देवीची कालातीत कृपा होईल; लाभच लाभ मिळतील!
13
शेअर असावा तर असा...! 5 दिवस अन् ₹40000 कोटींची कमाई, रिलायन्स-टीसीएसलाही टाकलं मागे; गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
सतत मोबाईलचा वापर म्हणजे मृत्यूला आमंत्रण; मेंदू आणि शरीरावर होतो जीवघेणा परिणाम
15
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
16
‘ते म्हणतील चंद्रावर सर्वप्रथम मारुती गेला होता’, इंडिया आघाडीतील नेत्या कनिमोळींचं विधान  
17
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
18
'संजय राऊतांसारखा बिनडोक राजकारणी महाराष्ट्रात होणे नाही', राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची टीका
19
Smriti Mandhana Run Out : चुकली अन् फसली! शतकी भागीदारीनंतर स्मृती-प्रतिका हिट जोडी फुटली!
20
ITR भरण्यासाठी फक्त एक दिवस उरला; पण, 'या' कारणांमुळे करदाते टेन्शनमध्ये; मुदतवाढीसाठी सोशल मीडियावर ट्रेंड

CoronaVirus News : दिल्लीत कोरोनाची चौथी लाट, अद्याप लॉकडाऊनचा विचार नाही - अरविंद केजरीवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2021 18:49 IST

Arvind Kejriwal : कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. ही चिंतेची बाब आहे. मात्र, घाबरून जाण्याची गरज नाही. सरकार संपूर्ण परिस्थितीवर नजर ठेवून आहे, असे अरविंद केजरीवाल म्हणाले.

ठळक मुद्देभविष्यात लॉकडाऊन आवश्यक असल्यास चर्चा केली जाईल, असे अरविंद केजरीवाल यांनी सांगितले.

नवी दिल्ली : देशात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (CM Arvind Kejriwal) यांनी आपल्या निवासस्थानी तातडीची बैठक बोलाविली होती. या बैठकीतनंतर दिल्लीत लॉकडाऊन केले जाणार नाही, असे संकेत अरविंद केजरीवाल यांनी दिले आहेत. कोरोनाची देशातील दुसरी लाट असू शकते, पण दिल्लीसाठी कोरोनाची चौथी लाट आहे. कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. ही चिंतेची बाब आहे. मात्र, घाबरून जाण्याची गरज नाही. सरकार संपूर्ण परिस्थितीवर नजर ठेवून आहे, असे अरविंद केजरीवाल म्हणाले. (cm arvind kejriwal said fourth wave of corona in delhi not considering lockdown yet)

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जी काही पावले उचलली पाहिजेत, ती उचलली जात आहेत. कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहेत, परंतु यावेळी पूर्वीच्या प्रकरणांपेक्षा ही कोरोनाची प्रकरणे कमी गंभीर आहेत. मृत्यू कमी होत आहेत आणि आयसीयूमध्येही रुग्णांना कमी दाखल केले जाते. आज जवळपास 50 टक्के रुग्ण रुग्णालयात जात आहेत. होम आयसोलेशनमध्ये लोक चांगले उपचार घेत आहेत. सरकार कोणत्याही प्रकारचे लॉकडाऊन करण्याचा विचार करत नाही. भविष्यात लॉकडाऊन आवश्यक असल्यास चर्चा केली जाईल, असे अरविंद केजरीवाल यांनी सांगितले.

आज झालेल्या बैठकीत रुग्णालयांमध्ये किती व्यवस्था आवश्यक आहे. रुग्णवाहिका, रुग्णालये, व्हेंटिलेटर, ऑक्सिजन आणि आयसीयू यावर चर्चा केली. संपूर्ण योजना तयार आहे. खाजगी व सरकारी रुग्णालयात बेड कधी वाढवल्या जातील. कोरोनाचा प्रसार होण्यापासून कसा रोखावा. चाचण्या, ट्रेसिंग आणि आयसोलेशन वेगाने केले जात आहे. कंटेनमेंट झोन तयार करुन रोगाचा प्रतिबंध करण्याचा प्रयत्न केला जाईल, असे अरविंद केजरीवाल म्हणाले.

केंद्र सरकारने 1 एप्रिलपासून 45 वर्षांच्या पुढील लोकांना लस घेण्यास परवानगी दिली आहे. मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, कम्युनिटी सेंटर, शाळांमध्ये मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहीम सुरू करू शकतो. त्याबाबत योग्य ती व्यवस्था करेल. जिथे आपण ही लस द्याल तिथे रूग्णवाहिका, प्रथमोपचाराची व्यवस्था केली जाईल. आता 4 महिने झाले आहेत, फारसा त्रास होत नाही. केंद्र सरकार याकडे लक्ष देईल, केंद्र सरकार राज्य सरकारांना त्यांच्या स्तरावर लसीकरण करण्यास परवानगी देईल, अशी आशा अरविंद केजरीवाल यांनी व्यक्त केली.

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालcorona virusकोरोना वायरस बातम्याdelhiदिल्ली