शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
7
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
8
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
9
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
10
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
11
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
12
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
13
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
14
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
15
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
16
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
17
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
18
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
19
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
20
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या

CoronaVirus News : दिल्लीत कोरोनाची चौथी लाट, अद्याप लॉकडाऊनचा विचार नाही - अरविंद केजरीवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2021 18:49 IST

Arvind Kejriwal : कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. ही चिंतेची बाब आहे. मात्र, घाबरून जाण्याची गरज नाही. सरकार संपूर्ण परिस्थितीवर नजर ठेवून आहे, असे अरविंद केजरीवाल म्हणाले.

ठळक मुद्देभविष्यात लॉकडाऊन आवश्यक असल्यास चर्चा केली जाईल, असे अरविंद केजरीवाल यांनी सांगितले.

नवी दिल्ली : देशात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (CM Arvind Kejriwal) यांनी आपल्या निवासस्थानी तातडीची बैठक बोलाविली होती. या बैठकीतनंतर दिल्लीत लॉकडाऊन केले जाणार नाही, असे संकेत अरविंद केजरीवाल यांनी दिले आहेत. कोरोनाची देशातील दुसरी लाट असू शकते, पण दिल्लीसाठी कोरोनाची चौथी लाट आहे. कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. ही चिंतेची बाब आहे. मात्र, घाबरून जाण्याची गरज नाही. सरकार संपूर्ण परिस्थितीवर नजर ठेवून आहे, असे अरविंद केजरीवाल म्हणाले. (cm arvind kejriwal said fourth wave of corona in delhi not considering lockdown yet)

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जी काही पावले उचलली पाहिजेत, ती उचलली जात आहेत. कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहेत, परंतु यावेळी पूर्वीच्या प्रकरणांपेक्षा ही कोरोनाची प्रकरणे कमी गंभीर आहेत. मृत्यू कमी होत आहेत आणि आयसीयूमध्येही रुग्णांना कमी दाखल केले जाते. आज जवळपास 50 टक्के रुग्ण रुग्णालयात जात आहेत. होम आयसोलेशनमध्ये लोक चांगले उपचार घेत आहेत. सरकार कोणत्याही प्रकारचे लॉकडाऊन करण्याचा विचार करत नाही. भविष्यात लॉकडाऊन आवश्यक असल्यास चर्चा केली जाईल, असे अरविंद केजरीवाल यांनी सांगितले.

आज झालेल्या बैठकीत रुग्णालयांमध्ये किती व्यवस्था आवश्यक आहे. रुग्णवाहिका, रुग्णालये, व्हेंटिलेटर, ऑक्सिजन आणि आयसीयू यावर चर्चा केली. संपूर्ण योजना तयार आहे. खाजगी व सरकारी रुग्णालयात बेड कधी वाढवल्या जातील. कोरोनाचा प्रसार होण्यापासून कसा रोखावा. चाचण्या, ट्रेसिंग आणि आयसोलेशन वेगाने केले जात आहे. कंटेनमेंट झोन तयार करुन रोगाचा प्रतिबंध करण्याचा प्रयत्न केला जाईल, असे अरविंद केजरीवाल म्हणाले.

केंद्र सरकारने 1 एप्रिलपासून 45 वर्षांच्या पुढील लोकांना लस घेण्यास परवानगी दिली आहे. मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, कम्युनिटी सेंटर, शाळांमध्ये मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहीम सुरू करू शकतो. त्याबाबत योग्य ती व्यवस्था करेल. जिथे आपण ही लस द्याल तिथे रूग्णवाहिका, प्रथमोपचाराची व्यवस्था केली जाईल. आता 4 महिने झाले आहेत, फारसा त्रास होत नाही. केंद्र सरकार याकडे लक्ष देईल, केंद्र सरकार राज्य सरकारांना त्यांच्या स्तरावर लसीकरण करण्यास परवानगी देईल, अशी आशा अरविंद केजरीवाल यांनी व्यक्त केली.

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालcorona virusकोरोना वायरस बातम्याdelhiदिल्ली