शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News : दिल्लीत कोरोनाची चौथी लाट, अद्याप लॉकडाऊनचा विचार नाही - अरविंद केजरीवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2021 18:49 IST

Arvind Kejriwal : कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. ही चिंतेची बाब आहे. मात्र, घाबरून जाण्याची गरज नाही. सरकार संपूर्ण परिस्थितीवर नजर ठेवून आहे, असे अरविंद केजरीवाल म्हणाले.

ठळक मुद्देभविष्यात लॉकडाऊन आवश्यक असल्यास चर्चा केली जाईल, असे अरविंद केजरीवाल यांनी सांगितले.

नवी दिल्ली : देशात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (CM Arvind Kejriwal) यांनी आपल्या निवासस्थानी तातडीची बैठक बोलाविली होती. या बैठकीतनंतर दिल्लीत लॉकडाऊन केले जाणार नाही, असे संकेत अरविंद केजरीवाल यांनी दिले आहेत. कोरोनाची देशातील दुसरी लाट असू शकते, पण दिल्लीसाठी कोरोनाची चौथी लाट आहे. कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. ही चिंतेची बाब आहे. मात्र, घाबरून जाण्याची गरज नाही. सरकार संपूर्ण परिस्थितीवर नजर ठेवून आहे, असे अरविंद केजरीवाल म्हणाले. (cm arvind kejriwal said fourth wave of corona in delhi not considering lockdown yet)

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जी काही पावले उचलली पाहिजेत, ती उचलली जात आहेत. कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहेत, परंतु यावेळी पूर्वीच्या प्रकरणांपेक्षा ही कोरोनाची प्रकरणे कमी गंभीर आहेत. मृत्यू कमी होत आहेत आणि आयसीयूमध्येही रुग्णांना कमी दाखल केले जाते. आज जवळपास 50 टक्के रुग्ण रुग्णालयात जात आहेत. होम आयसोलेशनमध्ये लोक चांगले उपचार घेत आहेत. सरकार कोणत्याही प्रकारचे लॉकडाऊन करण्याचा विचार करत नाही. भविष्यात लॉकडाऊन आवश्यक असल्यास चर्चा केली जाईल, असे अरविंद केजरीवाल यांनी सांगितले.

आज झालेल्या बैठकीत रुग्णालयांमध्ये किती व्यवस्था आवश्यक आहे. रुग्णवाहिका, रुग्णालये, व्हेंटिलेटर, ऑक्सिजन आणि आयसीयू यावर चर्चा केली. संपूर्ण योजना तयार आहे. खाजगी व सरकारी रुग्णालयात बेड कधी वाढवल्या जातील. कोरोनाचा प्रसार होण्यापासून कसा रोखावा. चाचण्या, ट्रेसिंग आणि आयसोलेशन वेगाने केले जात आहे. कंटेनमेंट झोन तयार करुन रोगाचा प्रतिबंध करण्याचा प्रयत्न केला जाईल, असे अरविंद केजरीवाल म्हणाले.

केंद्र सरकारने 1 एप्रिलपासून 45 वर्षांच्या पुढील लोकांना लस घेण्यास परवानगी दिली आहे. मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, कम्युनिटी सेंटर, शाळांमध्ये मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहीम सुरू करू शकतो. त्याबाबत योग्य ती व्यवस्था करेल. जिथे आपण ही लस द्याल तिथे रूग्णवाहिका, प्रथमोपचाराची व्यवस्था केली जाईल. आता 4 महिने झाले आहेत, फारसा त्रास होत नाही. केंद्र सरकार याकडे लक्ष देईल, केंद्र सरकार राज्य सरकारांना त्यांच्या स्तरावर लसीकरण करण्यास परवानगी देईल, अशी आशा अरविंद केजरीवाल यांनी व्यक्त केली.

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालcorona virusकोरोना वायरस बातम्याdelhiदिल्ली