शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

“आणीबाणीपेक्षाही देशाची वाईट अवस्था, PM मोदींनी...”; KCR यांचा केजरीवालांना पाठिंबा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2023 18:06 IST

Arvind Kejriwal And K Chandrashekar Rao Meet: केंद्राच्या अध्यादेशाविरोधात केसीआर यांनी अरविंद केजरीवाल यांना पाठिंबा जाहीर करताना मोदी सरकारवर टीका केली.

Arvind Kejriwal And K Chandrashekar Rao Meet: एकीकडे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपविरोधी पक्षांना एकत्रित करण्यासाठी आणि विरोधकांची मोठी फळी उभारण्याचा प्रयत्न केला जात असताना, दुसरीकडे केंद्र सरकारने काढलेल्या एका अध्यादेशासंदर्भात विरोधी पक्षांचा पाठिंबा मिळण्यासाठी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल प्रयत्न करत आहेत. यातच अरविंद केजरीवाल यांनी तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांची भेट घेतली. यावेळी केसीआर यांनी अरविंद केजरीवाल यांना पाठिंबा जाहीर केला. 

अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी मुंबईत येऊन शिवेसना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली. यानंतर आता अरविंद केजरीवाल यांनी तेलंगणची राजधानी हैदराबाद येथे जाऊन केसीआर यांची भेट घेतली. यावेळी बोलताना केसीआर यांनी केंद्रातील मोदी सरकारवर घणाघाती टीका केली आहे. 

आणीबाणीपेक्षाही देशाची वाईट अवस्था

पंतप्रधान मोदींनी अध्यादेश मागे घ्यावा, अशी आमची मागणी आहे. हा काळ आणीबाणीच्या दिवसांपेक्षाही वाईट आहे, केंद्रातील मोदी सरकार जनतेने निवडून दिलेल्या सरकारला काम करू देत नाही. केंद्र सरकार बिगर भाजपशासित सरकारना काम करू देत नाही. आम आदमी पार्टी दिल्लीत खूप लोकप्रिय आहे, असे केसीआर यांनी स्पष्ट केले. तसेच नरेंद्र मोदींनी हा अध्यादेश मागे घ्यावा, अशी आमची मागणी आहे. आम्ही सर्व अरविंद केजरीवाल यांना पाठिंबा देतो. मोदी सरकारने दिल्लीतील जनतेचा अपमान केला आहे. हा जनादेशाचा अपमान आहे. केंद्राने अध्यादेश मागे घ्यावा, अन्यथा आम्ही एकजुटीने लढा देऊ, असा एल्गार केसीआर यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला. 

दरम्यान, दिल्लीत आमचे सरकार स्थापन झाल्यानंतर लगेचच केंद्र सरकारने लगेचच दिल्ली सरकारच्या अधिकारावर नियंत्रण आणणारा अध्यादेश काढला. याविरोधात गेली ८ वर्ष आम्ही लढलो. सर्वोच्च न्यायालयात आमच्या बाजूने निकाल लागला. मात्र, लगेचच परंतु या निर्णयानंतर अवघ्या आठच दिवसात केंद्र सरकारने नवा अध्यादेश काढून आमचे अधिकार हिरावले. हा दिल्लीकरांवर मोठा अन्याय होत आहे. पंतप्रधानांनी सर्वोच्च न्यायालयाचे आदेश पाळले नाहीत तर जनतेला न्याय मिळणार कुठे, असे देशातील जनता म्हणत आहे. पंतप्रधान सर्वोच्च न्यायालयाचा आदेश मानत नाहीत. अध्यादेश आणून कायदा मोडीत काढतात. अशा प्रकारे देशाचा कारभार करणे चुकीचे आहे, अशी टीका अरविंद केजरीवाल यांनी केली.

 

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालK Chandrashekar Raoके चंद्रशेखर रावTelanganaतेलंगणा