शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! "मुंबईत १० हजार कोटींचं बजेट, प्रत्येक उमेदवाराला शिंदेसेना देणार १० कोटी"
2
माजी आमदार प्रज्ञा सातव यांचा भाजपमध्ये प्रवेश! काँग्रेसचं काय चुकतंय विचारताच, म्हणाल्या...
3
Donald Trump :"टॅरिफ माझा फेव्हरीट, मी 10 महिन्यांत...!" डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा
4
"विश्वविख्यात बोलले म्हणजे त्यांचे 29 महापालिकांत पराभव पक्के", भाजपाने संजय राऊतांना डिवचलं
5
Car 360 Degree Camera: कारमध्ये ३६० डिग्री कॅमेरा असणं किती फायद्याचं? नेमकं कसं आणि काय काम करतो?
6
Mumbai: खड्ड्यात दुचाकी आदळून तरुणाचा मृत्यू, पण पोलिसांनी मृतावरच नोंदवला गुन्हा!
7
"आम्ही काही मैत्रिणी नाही आहोत...", लारा दत्तासोबत काम केल्यावर रिंकू राजगुरुची प्रतिक्रिया
8
Supriya Sule: "धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रिमंडळात घेतले तर...", खासदार सुप्रिया सुळेंचा इशारा!
9
मोठी बातमी! प्रज्ञा सातव यांचा काँग्रेसच्या विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा
10
अर्टिगाचे काही खरे नाही...! ७-सीटर 'ग्रॅव्हाईट' लाँच होणार, ६ लाखांत मिळणार हाय-टेक फीचर्स...
11
निष्काळजीपणाचा कळस! 'A' पॉझिटिव्ह ऐवजी 'B+' रक्त अन्...; ७५ वर्षीय रुग्णाच्या जीवाशी खेळ
12
Ola Electric च्या शेअर्समध्ये मोठी घसरण! भाविश अग्रवाल यांनी हिस्सा विकून फेडलं कर्ज; पण गुंतवणूकदारांची चिंता वाढली
13
"हा माझा शेवटचा व्हिडीओ आहे, मला रशियाने बळजबरी युद्धात..."; भारतीय तरुणाचा मृत्यू, आईवडिलांवर आघात
14
तुम्हाला क्युट वाटणारा 'सांताक्लॉज' म्हणजे कोका-कोलाचा बिझनेस मास्टरस्ट्रोक! सत्य वाचून बसेल धक्का
15
Bike Taxi: मुंबईत बाईक टॅक्सी बंद होणार? रॅपिडो, ओला, उबेरवर कारवाईची टांगती तलवार!
16
"हा माझा शेवटचा Video, मला जबरदस्तीने..."; रशिया-युक्रेन युद्धात अजयचा मृत्यू; पालकांचा टाहो
17
Success Story: आठवीपर्यंत शिक्षण ते ८,००० कोटींचे मालक! जबलपूरच्या सतीश सनपाल यांचा 'बुर्ज खलिफा'पर्यंतचा थक्क करणारा प्रवास
18
भारताच्या 'या' मित्र राष्ट्रात मुस्लीमांची संख्या वेगाने वाढतेय; २०३० पर्यंत हा आकडा जवळपास...
19
२०२६ ची गोड सुरुवात! CNG आणि घरगुती गॅसच्या किमती कमी होणार, किती पैसे वाचणार?
20
मार्गशीर्ष अमावस्या २०२५: १९ डिसेंबरला तळहातावर काढा 'फुली', नशिबाची दारं होतील खुली!
Daily Top 2Weekly Top 5

“आणीबाणीपेक्षाही देशाची वाईट अवस्था, PM मोदींनी...”; KCR यांचा केजरीवालांना पाठिंबा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2023 18:06 IST

Arvind Kejriwal And K Chandrashekar Rao Meet: केंद्राच्या अध्यादेशाविरोधात केसीआर यांनी अरविंद केजरीवाल यांना पाठिंबा जाहीर करताना मोदी सरकारवर टीका केली.

Arvind Kejriwal And K Chandrashekar Rao Meet: एकीकडे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपविरोधी पक्षांना एकत्रित करण्यासाठी आणि विरोधकांची मोठी फळी उभारण्याचा प्रयत्न केला जात असताना, दुसरीकडे केंद्र सरकारने काढलेल्या एका अध्यादेशासंदर्भात विरोधी पक्षांचा पाठिंबा मिळण्यासाठी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल प्रयत्न करत आहेत. यातच अरविंद केजरीवाल यांनी तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांची भेट घेतली. यावेळी केसीआर यांनी अरविंद केजरीवाल यांना पाठिंबा जाहीर केला. 

अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी मुंबईत येऊन शिवेसना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली. यानंतर आता अरविंद केजरीवाल यांनी तेलंगणची राजधानी हैदराबाद येथे जाऊन केसीआर यांची भेट घेतली. यावेळी बोलताना केसीआर यांनी केंद्रातील मोदी सरकारवर घणाघाती टीका केली आहे. 

आणीबाणीपेक्षाही देशाची वाईट अवस्था

पंतप्रधान मोदींनी अध्यादेश मागे घ्यावा, अशी आमची मागणी आहे. हा काळ आणीबाणीच्या दिवसांपेक्षाही वाईट आहे, केंद्रातील मोदी सरकार जनतेने निवडून दिलेल्या सरकारला काम करू देत नाही. केंद्र सरकार बिगर भाजपशासित सरकारना काम करू देत नाही. आम आदमी पार्टी दिल्लीत खूप लोकप्रिय आहे, असे केसीआर यांनी स्पष्ट केले. तसेच नरेंद्र मोदींनी हा अध्यादेश मागे घ्यावा, अशी आमची मागणी आहे. आम्ही सर्व अरविंद केजरीवाल यांना पाठिंबा देतो. मोदी सरकारने दिल्लीतील जनतेचा अपमान केला आहे. हा जनादेशाचा अपमान आहे. केंद्राने अध्यादेश मागे घ्यावा, अन्यथा आम्ही एकजुटीने लढा देऊ, असा एल्गार केसीआर यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला. 

दरम्यान, दिल्लीत आमचे सरकार स्थापन झाल्यानंतर लगेचच केंद्र सरकारने लगेचच दिल्ली सरकारच्या अधिकारावर नियंत्रण आणणारा अध्यादेश काढला. याविरोधात गेली ८ वर्ष आम्ही लढलो. सर्वोच्च न्यायालयात आमच्या बाजूने निकाल लागला. मात्र, लगेचच परंतु या निर्णयानंतर अवघ्या आठच दिवसात केंद्र सरकारने नवा अध्यादेश काढून आमचे अधिकार हिरावले. हा दिल्लीकरांवर मोठा अन्याय होत आहे. पंतप्रधानांनी सर्वोच्च न्यायालयाचे आदेश पाळले नाहीत तर जनतेला न्याय मिळणार कुठे, असे देशातील जनता म्हणत आहे. पंतप्रधान सर्वोच्च न्यायालयाचा आदेश मानत नाहीत. अध्यादेश आणून कायदा मोडीत काढतात. अशा प्रकारे देशाचा कारभार करणे चुकीचे आहे, अशी टीका अरविंद केजरीवाल यांनी केली.

 

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालK Chandrashekar Raoके चंद्रशेखर रावTelanganaतेलंगणा