शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

“आणीबाणीपेक्षाही देशाची वाईट अवस्था, PM मोदींनी...”; KCR यांचा केजरीवालांना पाठिंबा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2023 18:06 IST

Arvind Kejriwal And K Chandrashekar Rao Meet: केंद्राच्या अध्यादेशाविरोधात केसीआर यांनी अरविंद केजरीवाल यांना पाठिंबा जाहीर करताना मोदी सरकारवर टीका केली.

Arvind Kejriwal And K Chandrashekar Rao Meet: एकीकडे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपविरोधी पक्षांना एकत्रित करण्यासाठी आणि विरोधकांची मोठी फळी उभारण्याचा प्रयत्न केला जात असताना, दुसरीकडे केंद्र सरकारने काढलेल्या एका अध्यादेशासंदर्भात विरोधी पक्षांचा पाठिंबा मिळण्यासाठी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल प्रयत्न करत आहेत. यातच अरविंद केजरीवाल यांनी तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांची भेट घेतली. यावेळी केसीआर यांनी अरविंद केजरीवाल यांना पाठिंबा जाहीर केला. 

अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी मुंबईत येऊन शिवेसना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली. यानंतर आता अरविंद केजरीवाल यांनी तेलंगणची राजधानी हैदराबाद येथे जाऊन केसीआर यांची भेट घेतली. यावेळी बोलताना केसीआर यांनी केंद्रातील मोदी सरकारवर घणाघाती टीका केली आहे. 

आणीबाणीपेक्षाही देशाची वाईट अवस्था

पंतप्रधान मोदींनी अध्यादेश मागे घ्यावा, अशी आमची मागणी आहे. हा काळ आणीबाणीच्या दिवसांपेक्षाही वाईट आहे, केंद्रातील मोदी सरकार जनतेने निवडून दिलेल्या सरकारला काम करू देत नाही. केंद्र सरकार बिगर भाजपशासित सरकारना काम करू देत नाही. आम आदमी पार्टी दिल्लीत खूप लोकप्रिय आहे, असे केसीआर यांनी स्पष्ट केले. तसेच नरेंद्र मोदींनी हा अध्यादेश मागे घ्यावा, अशी आमची मागणी आहे. आम्ही सर्व अरविंद केजरीवाल यांना पाठिंबा देतो. मोदी सरकारने दिल्लीतील जनतेचा अपमान केला आहे. हा जनादेशाचा अपमान आहे. केंद्राने अध्यादेश मागे घ्यावा, अन्यथा आम्ही एकजुटीने लढा देऊ, असा एल्गार केसीआर यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला. 

दरम्यान, दिल्लीत आमचे सरकार स्थापन झाल्यानंतर लगेचच केंद्र सरकारने लगेचच दिल्ली सरकारच्या अधिकारावर नियंत्रण आणणारा अध्यादेश काढला. याविरोधात गेली ८ वर्ष आम्ही लढलो. सर्वोच्च न्यायालयात आमच्या बाजूने निकाल लागला. मात्र, लगेचच परंतु या निर्णयानंतर अवघ्या आठच दिवसात केंद्र सरकारने नवा अध्यादेश काढून आमचे अधिकार हिरावले. हा दिल्लीकरांवर मोठा अन्याय होत आहे. पंतप्रधानांनी सर्वोच्च न्यायालयाचे आदेश पाळले नाहीत तर जनतेला न्याय मिळणार कुठे, असे देशातील जनता म्हणत आहे. पंतप्रधान सर्वोच्च न्यायालयाचा आदेश मानत नाहीत. अध्यादेश आणून कायदा मोडीत काढतात. अशा प्रकारे देशाचा कारभार करणे चुकीचे आहे, अशी टीका अरविंद केजरीवाल यांनी केली.

 

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालK Chandrashekar Raoके चंद्रशेखर रावTelanganaतेलंगणा