शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदार यादीचे देशव्यापी पुनरावलोकन का गरजेचे? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
2
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
3
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यालयात 'वाजले की बारा' लावणी; सुनेत्रा पवारांचा थेट शहराध्यक्षांना कॉल
5
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सेमीफायनलपूर्वी भारतीय महिला संघाला मोठा धक्का, दुखापतीमुळे आघाडीची फलंदाज स्पर्धेबाहेर 
6
निवडणूक आयोगाने देशात SIR ची घोषणा केली; या १२ राज्यांमध्ये होणार सुरुवात, असे असणार वेळापत्रक
7
घराणेशाहीचं राजकारण आता चालणार नाही; ठाकरे बंधूंवर अमित शाहांचा निशाणा, म्हणाले...
8
शेअर बाजार 'रॉकेट'! PSU बँक, रियल्टी आणि ऑटो स्टॉक्सला मागणी; पहा सेन्सेक्सच्या टॉप ५ कंपन्या
9
दोन जणांची आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये लैंगिक छळ अन् 'HIV'चा उल्लेख...! अरुणाचल पोलिसांकडून फरार IAS अधिकाऱ्याला अटक 
10
कंगना रणौत भटिंडा न्यायालयात हजर, शेतकरी आंदोलनादरम्यान केलेल्या 'त्या' टिप्पणीबद्दल मागितली माफी
11
धक्कादायक! तूप, दारू आणि स्फोट...UPSC विद्यार्थ्याच्या लिव्ह-इन पार्टनरकडून भीषण हत्या
12
३ दिवसांपासून रॉकेट बनलाय 'हा' शेअर; सातत्यानं लागतंय अपर सर्किट, आता डिविडेंड देण्याचीही तयारी
13
Phaltan Doctor Death: रिलेशनशिप, भांडणं, प्रशांतला डेंग्यू झाल्याने पुन्हा आले एकत्र; कॉल्स, मेसेजचे स्क्रीनशॉट्स पोलिसांकडे
14
IND vs AUS: भारत की ऑस्ट्रेलिया, टी२० मध्ये कोणाचं पारडं जड? पाहा हेड टू हेड रेकॉर्ड!
15
VIDEO: 'तारेवरची कसरत'! मांजर विजेच्या तारेवरून चालत होती, अचानक लागली आग अन् पुढे...
16
"या हॉटेलवर डॉक्टर तरुणीला का बोलावलं होतं?"; सुषमा अंधारे रणजितसिंह नाईक निंबाळकरांचे नाव घेत काय म्हणाल्या?
17
"फलटणच्या घटनेत माजी खासदाराला मुख्यमंत्र्यांकडून क्लिन चिट म्हणजे कटात सहभाग असल्याचा पुरावाच’’, काँग्रेसचा आरोप 
18
Orkla India IPO च्या जीएमपीमध्ये मोठी तेजी; 'या' तारखेपासून लावू शकणार बोली, केव्हा होणार लिस्टिंग?
19
वादग्रस्त इस्लामिक धर्मगुरू झाकीर नाईकसाठी बांगलादेशात 'पायघड्या'; भारतात आहे MOST WANTED
20
ढासू परतावा...! ₹100 पेक्षाही कमी किंमतीच्या शेअरची कमाल, 5 वर्षांती दिला 6455% परतावा; आता रेल्वेकडून मिळाली मोठी ऑर्डर

भाजपवाले जगातील सर्वात मोठा पक्ष असल्याचं म्हणतात आणि आम्हाला घाबरतात; केजरीवालांचा निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2022 18:02 IST

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गुरुवारी विधानसभेत भाषण करताना भाजपवर जोरदार निशाणा साधला.

नवी दिल्ली-

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गुरुवारी विधानसभेत भाषण करताना भाजपवर जोरदार निशाणा साधला. "काल शहीद दिनी आम्ही शहीदांना आदरांजली वाहिली. आम्ही सर्व स्वातंत्र्यसैनिकांचा आदर करतो, पण त्यापैकी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि शहीद भगतसिंग यांची छायाचित्रे सर्व सरकारी कार्यालयांमध्ये लावण्याचा निर्णय घेत. आम्ही घोषणा केल्यापासून खूप टीका होत आहे. भाजपवाले म्हणाले सावरकर आणि हेडगेवारांची प्रतिमा का नाही? आम्ही म्हणालो तुम्ही लावा की. तर इंदिरा आणि सोनिया गांधी का नाहीत, असं काँग्रेसवाले म्हणत आहेत, आम्ही त्यांनाही तेच म्हणालो", असं अरविंद केजरीवाल म्हणाले. 

"डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि शहीद भगतसिंग का? याचं कारण आम्ही सांगतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान बनवलं, त्यांची स्वप्नं आम्ही पूर्ण करत आहोत, मात्र भाजपवाल्यांना महापालिकेच्या निवडणुका नको आहेत, ते निवडणुका पुढे ढकलत आहेत. त्यांच्या भ्रष्टाचारावर गिनीज बुक ऑफ रेकॉर्डची बैठक सुरू आहे. कालच एका नेत्यानं सांगितलं की, मी माझ्या भाजप नेत्यांना निवडणुकीची भानगडच संपवायला सांगितली आहे असं म्हटलं. NDMC प्रमाणे उमेदवारी द्या. निवडणूक आयोग महापालिका निवडणुकीची तारीख जाहीर करणार होतं, पण पंतप्रधान कार्यालयातून फोन आला आणि तारीख पुढे ढकलली गेली. त्यांना पराभवाच्या भीतीनं निवडणुका घ्यायच्या नाहीत. त्यांना आंबेडकरांचा द्वेष आहे", असा हल्लाबोल अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीच्या विधानसभेत केला. ते म्हणाले की, "अशा प्रकारे हे लोक उद्या गुजरातमध्ये निवडणूकच नको म्हणून प्रयत्न करतील, मग देशात निवडणुका होऊ नयेत यासाठीही पावलं उचलली जातील. पण मला म्हणायचं आहे की उद्या आपण असू किंवा नसू, भाजप जिंको किंवा आम आदमी पार्टी. मात्र देश आणि लोकशाही कायम राहणार आहे हे लक्षात घ्यायला हवं"

अरविंद केजरीवालांनी यावेळी भाजपा जगातील सर्वात मोठा पक्ष असल्याच्या दाव्यावरही हल्लाबोल केला. "भाजपावाले म्हणतात की ते जगातील सर्वात मोठा आमचा पक्ष आहेत. आम्ही तर सर्वात छोटा पक्ष आहोत, तरीही तुम्ही आम्हाला इतके का घाबरता? निवडणूक जिंकून दाखवा. 'बंटी और बबली' हा चित्रपट होता, या चित्रपटात एक सीन आहे की लोक 'आमच्या मागण्या पूर्ण झाल्या'च्या घोषणा देत घरासमोर आले, पण मागणी काय आहे ते कळत नव्हतं", असं केजरीवाल म्हणाले. "मी भाजपाच्या समर्थकांना आजही सांगू इच्छितो की, ही आंधळी वाटचाल सोडा, आम आदमी पक्षात सामील व्हा, आम्ही तुम्हाला सन्मान देऊ. काल उपराज्यपाल म्हणाले की दिल्लीचा जीडीपी 5 वर्षांत 50% वाढला आहे आणि कोणत्याही राज्यामध्ये वाढ झाली नाही, मी उपराज्यपालांच्या अभिभाषणाचे आभार मानतो", असंही केजरीवाल म्हणाले. 

 

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालAAPआपBJPभाजपा