शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
4
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
5
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
6
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
7
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
8
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
9
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
10
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

भाजपवाले जगातील सर्वात मोठा पक्ष असल्याचं म्हणतात आणि आम्हाला घाबरतात; केजरीवालांचा निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2022 18:02 IST

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गुरुवारी विधानसभेत भाषण करताना भाजपवर जोरदार निशाणा साधला.

नवी दिल्ली-

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गुरुवारी विधानसभेत भाषण करताना भाजपवर जोरदार निशाणा साधला. "काल शहीद दिनी आम्ही शहीदांना आदरांजली वाहिली. आम्ही सर्व स्वातंत्र्यसैनिकांचा आदर करतो, पण त्यापैकी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि शहीद भगतसिंग यांची छायाचित्रे सर्व सरकारी कार्यालयांमध्ये लावण्याचा निर्णय घेत. आम्ही घोषणा केल्यापासून खूप टीका होत आहे. भाजपवाले म्हणाले सावरकर आणि हेडगेवारांची प्रतिमा का नाही? आम्ही म्हणालो तुम्ही लावा की. तर इंदिरा आणि सोनिया गांधी का नाहीत, असं काँग्रेसवाले म्हणत आहेत, आम्ही त्यांनाही तेच म्हणालो", असं अरविंद केजरीवाल म्हणाले. 

"डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि शहीद भगतसिंग का? याचं कारण आम्ही सांगतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान बनवलं, त्यांची स्वप्नं आम्ही पूर्ण करत आहोत, मात्र भाजपवाल्यांना महापालिकेच्या निवडणुका नको आहेत, ते निवडणुका पुढे ढकलत आहेत. त्यांच्या भ्रष्टाचारावर गिनीज बुक ऑफ रेकॉर्डची बैठक सुरू आहे. कालच एका नेत्यानं सांगितलं की, मी माझ्या भाजप नेत्यांना निवडणुकीची भानगडच संपवायला सांगितली आहे असं म्हटलं. NDMC प्रमाणे उमेदवारी द्या. निवडणूक आयोग महापालिका निवडणुकीची तारीख जाहीर करणार होतं, पण पंतप्रधान कार्यालयातून फोन आला आणि तारीख पुढे ढकलली गेली. त्यांना पराभवाच्या भीतीनं निवडणुका घ्यायच्या नाहीत. त्यांना आंबेडकरांचा द्वेष आहे", असा हल्लाबोल अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीच्या विधानसभेत केला. ते म्हणाले की, "अशा प्रकारे हे लोक उद्या गुजरातमध्ये निवडणूकच नको म्हणून प्रयत्न करतील, मग देशात निवडणुका होऊ नयेत यासाठीही पावलं उचलली जातील. पण मला म्हणायचं आहे की उद्या आपण असू किंवा नसू, भाजप जिंको किंवा आम आदमी पार्टी. मात्र देश आणि लोकशाही कायम राहणार आहे हे लक्षात घ्यायला हवं"

अरविंद केजरीवालांनी यावेळी भाजपा जगातील सर्वात मोठा पक्ष असल्याच्या दाव्यावरही हल्लाबोल केला. "भाजपावाले म्हणतात की ते जगातील सर्वात मोठा आमचा पक्ष आहेत. आम्ही तर सर्वात छोटा पक्ष आहोत, तरीही तुम्ही आम्हाला इतके का घाबरता? निवडणूक जिंकून दाखवा. 'बंटी और बबली' हा चित्रपट होता, या चित्रपटात एक सीन आहे की लोक 'आमच्या मागण्या पूर्ण झाल्या'च्या घोषणा देत घरासमोर आले, पण मागणी काय आहे ते कळत नव्हतं", असं केजरीवाल म्हणाले. "मी भाजपाच्या समर्थकांना आजही सांगू इच्छितो की, ही आंधळी वाटचाल सोडा, आम आदमी पक्षात सामील व्हा, आम्ही तुम्हाला सन्मान देऊ. काल उपराज्यपाल म्हणाले की दिल्लीचा जीडीपी 5 वर्षांत 50% वाढला आहे आणि कोणत्याही राज्यामध्ये वाढ झाली नाही, मी उपराज्यपालांच्या अभिभाषणाचे आभार मानतो", असंही केजरीवाल म्हणाले. 

 

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालAAPआपBJPभाजपा