शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

भाजपवाले जगातील सर्वात मोठा पक्ष असल्याचं म्हणतात आणि आम्हाला घाबरतात; केजरीवालांचा निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2022 18:02 IST

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गुरुवारी विधानसभेत भाषण करताना भाजपवर जोरदार निशाणा साधला.

नवी दिल्ली-

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गुरुवारी विधानसभेत भाषण करताना भाजपवर जोरदार निशाणा साधला. "काल शहीद दिनी आम्ही शहीदांना आदरांजली वाहिली. आम्ही सर्व स्वातंत्र्यसैनिकांचा आदर करतो, पण त्यापैकी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि शहीद भगतसिंग यांची छायाचित्रे सर्व सरकारी कार्यालयांमध्ये लावण्याचा निर्णय घेत. आम्ही घोषणा केल्यापासून खूप टीका होत आहे. भाजपवाले म्हणाले सावरकर आणि हेडगेवारांची प्रतिमा का नाही? आम्ही म्हणालो तुम्ही लावा की. तर इंदिरा आणि सोनिया गांधी का नाहीत, असं काँग्रेसवाले म्हणत आहेत, आम्ही त्यांनाही तेच म्हणालो", असं अरविंद केजरीवाल म्हणाले. 

"डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि शहीद भगतसिंग का? याचं कारण आम्ही सांगतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान बनवलं, त्यांची स्वप्नं आम्ही पूर्ण करत आहोत, मात्र भाजपवाल्यांना महापालिकेच्या निवडणुका नको आहेत, ते निवडणुका पुढे ढकलत आहेत. त्यांच्या भ्रष्टाचारावर गिनीज बुक ऑफ रेकॉर्डची बैठक सुरू आहे. कालच एका नेत्यानं सांगितलं की, मी माझ्या भाजप नेत्यांना निवडणुकीची भानगडच संपवायला सांगितली आहे असं म्हटलं. NDMC प्रमाणे उमेदवारी द्या. निवडणूक आयोग महापालिका निवडणुकीची तारीख जाहीर करणार होतं, पण पंतप्रधान कार्यालयातून फोन आला आणि तारीख पुढे ढकलली गेली. त्यांना पराभवाच्या भीतीनं निवडणुका घ्यायच्या नाहीत. त्यांना आंबेडकरांचा द्वेष आहे", असा हल्लाबोल अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीच्या विधानसभेत केला. ते म्हणाले की, "अशा प्रकारे हे लोक उद्या गुजरातमध्ये निवडणूकच नको म्हणून प्रयत्न करतील, मग देशात निवडणुका होऊ नयेत यासाठीही पावलं उचलली जातील. पण मला म्हणायचं आहे की उद्या आपण असू किंवा नसू, भाजप जिंको किंवा आम आदमी पार्टी. मात्र देश आणि लोकशाही कायम राहणार आहे हे लक्षात घ्यायला हवं"

अरविंद केजरीवालांनी यावेळी भाजपा जगातील सर्वात मोठा पक्ष असल्याच्या दाव्यावरही हल्लाबोल केला. "भाजपावाले म्हणतात की ते जगातील सर्वात मोठा आमचा पक्ष आहेत. आम्ही तर सर्वात छोटा पक्ष आहोत, तरीही तुम्ही आम्हाला इतके का घाबरता? निवडणूक जिंकून दाखवा. 'बंटी और बबली' हा चित्रपट होता, या चित्रपटात एक सीन आहे की लोक 'आमच्या मागण्या पूर्ण झाल्या'च्या घोषणा देत घरासमोर आले, पण मागणी काय आहे ते कळत नव्हतं", असं केजरीवाल म्हणाले. "मी भाजपाच्या समर्थकांना आजही सांगू इच्छितो की, ही आंधळी वाटचाल सोडा, आम आदमी पक्षात सामील व्हा, आम्ही तुम्हाला सन्मान देऊ. काल उपराज्यपाल म्हणाले की दिल्लीचा जीडीपी 5 वर्षांत 50% वाढला आहे आणि कोणत्याही राज्यामध्ये वाढ झाली नाही, मी उपराज्यपालांच्या अभिभाषणाचे आभार मानतो", असंही केजरीवाल म्हणाले. 

 

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालAAPआपBJPभाजपा